Maharshi Vyas : पांडव आणि कौरव यांच्याशी जवळचा संबंध असलेल्या महर्षी व्यासांची जन्मकथा
आज गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या, अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आध्यात्मिक आणि प्रापंचिक गुरूंचे पूजन केले जाते. आई-वडिलांना मुलांचे पहिले गुरु मानले जाते, त्यामुळे या दिवशी आई-वडिलांचा व मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जातो. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हटले जाते. याच दिवशी द्वापर युगात याच तिथीला महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळेच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. महाभारताचे लेखन केलेले महर्षी व्यास म्हणजे ज्ञानाचा सागर. व्यास ऋषींना भगवान विष्णूचा अवतार देखील मानले जाते. याच महर्षी व्यास यांच्या जन्माची कथा देखील खूपच रंजक आहे. कौरव आणि पांडवांच्या जन्मांच्या अगोदर पासून महाभारतात त्यांचे अस्तित्व आहे. व्यास हे कौरव आणि पांडवांचे आजोबा तर पांडू आणि धृतराष्ट्राचा वडील आहेत. पितामह भीष्म हे आठ शापित वसुंपैकी एक होते. राजा शंतनू आणि गंगा यांना पुत्रप्राप्तीमध्ये भीष्म झाले होते. पुत्रप्राप्ती होताच गंगा त्यांना मारून टाकायची पण शेवटचा वसू उरला...