Posts

Showing posts with the label social news

New Year : जगातील ‘हे’ देश साजरे करत नाही इंग्रजी नवीन वर्ष

Image
  आज संपूर्ण जगामध्ये नवीन वर्षाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. २०२५ या वर्षाला निरोप देऊन सर्वच लोकं २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यास अतिशय उत्सुक आहे. एव्हाना तर जगाच्या विविध कोपऱ्यांमध्ये नवीन वर्ष सुरु देखील झाले असेल. भारतात अजून २०२६ सुरु व्हायला काही तास आहेत. इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने या महिन्याचा शेवट म्हणजे वर्षाचा शेवट समजला असतो. संपूर्ण जगामध्ये आज २०२५ वर्षाला निरोप दिला जात असून, २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. मात्र जगातील काही मोजके देश मात्र आज कोणतेही नवीन वर्ष साजरे करणार नाही. जगभरातील बहुतेक देश ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार १ जानेवारी रोजी नवीन वर्षाचे स्वागत करत असले तरी असेही काही देश आहे, जे हे कॅलेंडर वापरत नाही. त्यामुळे या देशांमध्ये आज कोणतेही सेलिब्रेशन होणार नाही. असे देश कोणते चला जाणून घेऊया. (Happy New Year 2026) नेपाळ नेपाळमध्ये बिक्रम संवत मध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ते एप्रिलच्या मध्यात साजरे केले जाते. कारण नेपाळ विक्रम संवत कॅलेंडरचे पालन करतो, जे ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे 57 ...

Health : तुम्ही पण जेवल्यानंतर लगेचच झोपता….? मग आजच ही सवय बदला

Image
  आजच्या काळात आपण पाहिले तर आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीचा मोठा पगडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपण आपली संस्कृती आणि जुने विचार मागे सोडून आधुनिक विचार आत्मसाद करत आहोत. मात्र हे करताना त्याचे दुष्परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागणार आहेत, हेच आपल्या लक्षात येत नाही. पूर्वी किंवा आजही घरातील वयस्कर मंडळी रात्री लवकर जेवून शतपावली करतात आणि लवकर झोपून सकाळी लवकर उठतात. पण आजकाल याच्या अगदी उलट असते. रात्री उशिरापर्यंत जागणे उशिरा जेवणे, पहाटे उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे. याचा तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होत आहे. (Health) Marathi News आजकाल तर सगळे रात्री उशिरा जेवतात आणि लगेच झोपतात. खाण्याच्या या चुकीच्या पद्धतींमुळे खूपच कमी वयात मोठ्या व्याधी मागे लागताना देखील दिसत आहे. जेवल्यानंतर लगेच झोपणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चुकीचे आणि गंभीर आजारांना आमंत्रण देणारे आहे. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. यामुळे अनेक आजारांची शक्यता वाढते. अनेक लोकं जेवणानंतर बसून राहणं किंवा झोपणं पसंत करतात. ख...

Chandragrahan : चंद्रग्रहणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व

Image
  आज २०२५ वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. मुख्य म्हणजे हे पूर्ण चंद्रग्रहण असून, या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. आजचे चंद्रग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. या स्थितीमध्ये चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत total lunar eclipse. खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. (Marathi) त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असे म्हटले जाते. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११ वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११:४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण फक्त भारतच नाही तर पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, जपान या देशांमध्येही दिसणार आहे. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असून, यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. चंद्रग्रहणाबद्दलची काही खास माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

Andhra Pradesh : श्री यागंती उमा महेश्वर मंदिरातील नंदीचे रहस्य !

Image
  भारतातील अनेक मंदिरांचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. या मंदिरांमधील गुढ आजही उलगडण्यात यश आलेले नाही. अशा काही निवडक मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे, श्री यागंती उमा महेश्वर स्वामी मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर आंध्रप्रदेशमधील नंदयाल जिल्ह्यात आहे. रहस्यांनी भरलेल्या या मंदिरातील नंदी महाराजांची मूर्ती ही सतत वाढत आहे. काही वर्षापूर्वी या नंदी महाराजांना भगवान शंकराचे भाविक प्रदक्षिणा मारायचे. मात्र आता ही मूर्ती वाढल्यामुळे हा प्रदक्षिणा मार्गही बंद झाला आहे. याशिवाय या मंदिराभोवती अनेक गुहा आहेत. यातील काही गुहांमध्ये प्रशस्त कक्ष असून याची निर्मिती कोणी, कशासाठी आणि कधी केली, हे कोणालाही माहित नाही. या मंदिरासमोर एक तलाव असून याभोवती अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. (Andhra Pradesh) Marathi news याशिवाय या तलावाच्या भोवती अश्वधारी कल्कींचीही मूर्ती कोरण्यात आली आहे. त्यामुळे श्री यागंती उमा महेश्वर मंदिराचे आणि कल्की अवताराचे रहस्य असल्याचे सांगण्यात येते. भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांमधील घटना पाहून भाविक नतमस्तक होतात. या चमत्...

Ashtavinayak : अष्टविनायकांमधील तिसरा गणपती- सिद्धटेकचा सिद्धिविनायक

Image
  गणेशोत्सव सुरु होऊन दोन दिवस झाले आणि आज तिसरा दिवस आहे. आता गणेशोत्सव म्हटला की, सर्वच लोकं विविध ऐतिहासिक, प्रसिद्ध आणि जागृत गणेश मंदिरांमध्ये अवश्य जातो आणि बाप्पाचे दर्शन घेतो. अष्टविनायक गणपती मंदिरं ही अशीच प्रसिद्ध आणि अतिशय जुनी मंदिरं आहेत. सध्या गणेशाचा सर्वत्र जयघोष सुरु आहे. गणेश उत्सवाच्या काळात तर अष्टविनायकाच्या गणेश मंदिरांना यात्रेचे स्वरूप आलेले असते. या काळात ही मंदिरं भाविकांनी तुडुंब भरलेली असतात. या अष्टविनायकांमधील सर्वच मंदिरांचा इतिहास हा खूपच खास आहे. यातलाच तिसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. आज आपण याच गणपतीबद्दल माहिती पाहूया. (Ganesh Chaturthi) Todays Marathi news सिद्धटेक अर्थात सिद्धिविनायक हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा असा हा सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती आहे. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. अष...

Fathers Day : जाणून घ्या फादर्स डे चा इतिहास आणि महत्व

Image
  “कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात, हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात माया बाबांची असते कस्तुरीपरी दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी” या ओळी कुठे तरी वाचनात आल्या होत्या. या ओळींचा मतितार्थ इतका सुंदर आणि मनास भिडणारा आहे की, त्या ओळी थेट मनाच्या भिंतीवर कोरल्याचं गेल्या. आपल्या आयुष्यातील ‘वडील’ रुपी देवाला शब्दात मांडायचा अतिशय उत्तम प्रयत्न आहे हा. कायम आईबद्दल, आईच्या प्रेमाबद्दल, आईच्या त्यागाबद्दल, आईच्या महतीबद्दल बोलले जाते. आईच्या कोणत्याही गोष्टीबद्दल कधीच शंका नसते. मात्र कधी कधी आईच्या पुढे बाप काहीसा मागे पडतो. जरी वडिलांचे प्रेम, कष्ट, माया, त्याग स्पष्ट दिसत नसले तरी त्यांच्या अस्तित्वाशिवाय सर्वच नगण्य असते. प्रत्येक घरातला खरा आधार हे वडीलच असतात. वरवर कितीही कठोर, शिस्तप्रिय दिसणारे वडील प्रत्यक्षात मात्र सर्वात जास्त हळवे आणि प्रेमळ असतात. (Fathers Day) Top Marathi Headlines मात्र जबाबदाऱ्यांमध्ये, कर्तव्यांमध्ये दबलेल्या वडिलांना त्यांची दुसरी बाजू कधी दाखवताच येत नाही. अशा या वडिलांचा आपल्याल...