Posts

Cooler : थंड हवेसाठी तुम्ही देखील कुलर वापरता? मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

  उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, जगातील टॉप 100 उष्ण शहरांपैकी जवळपास 95 उष्ण शहरं केवळ भारतातील आहेत. सध्या भारत आणि भारतातील काही राज्यं उष्णतेच्या मोठ्या लाटेला सामोरे जात आहे. यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील विदर्भ भागातील सर्वच शहरं उष्णतेच्या लाटेमधे होरपळून निघत आहे. या अशा प्रखर उन्हामध्ये सगळ्यांच्याच अंगाची लाही लाही होत असल्याने फॅनची हवा देखील अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये आता कुलर घेण्याची चर्चा होत आहे. मात्र बाजारात कुलरचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नक्की कोणता कुलर घ्यावा आणि कसा घ्यावा असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कुलरचे अनेक पर्याय पाहून लोकांच्या मनात मोठा संभ्रम देखील निर्माण होत आहे. पण तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला कुलर घेण्यासाठी काही उपयुक्त टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही नक्कीच योग्य तो कुलर तुमच्यासाठी निवडू शकता. जाणून घेऊया याबद्दल.   आता दुकानात गेल्यानंतर आपल्याला मेटल आणि प्लास्टिक अशा दोन प्रकारची कुलर पाहायला मिळतात. सुरुवात येथूनच होते की, कुलर मेटलचा घ्यावा की, प्लास्टिकचा....

Health : आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या निळ्या हळदीचे फायदे

  आजही अनेक घरांमध्ये लहान सहान आजारांसाठी लगेच डॉक्टरकडे कधीच नेले जात नाही. घरच्या घरीच आजीच्या बटव्यातील उपाय केले जातात आणि इलाज केला जातो. मुख्य म्हणजे याचा खूपच चांगला फायदा देखील होतो. आपल्या घरातील स्वयंपाक घर हे विविध उपचारांच्या वस्तूने भरलेले आहे. यातलीच एक दररोजच्या वापरातील गोष्ट म्हणजे ‘हळद’. कोणतेही जेवण हे हळदीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. जेवणाला रंग आणि चव आणण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळद ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ती जंतुनाशक असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची अतिशय उत्तम आहे. हळद ही बहुगुणी आहे. सुंदरतेपासून ते आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या बऱ्या करेपर्यंत हळद खूपच उपयुक्त आहे. हळद म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर लगेच पिवळी धमक पावडर किंवा ओल्या हळदीचा कंद येतो.   (Blue turmeric) मात्र अनेकांना माहितीच नसेल की पिवळ्यासोबतच निळ्या रंगाची देखील हळद उपलब्ध आहे. आता बऱ्याच लोकांना निळी हळद एकूण आश्चर्य वाटले असेल, पण हे सत्य आहे. ही निळ्या रंगाची हळद पिवळ्या हळदीपेक्षा अधिक गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबत त्याची शेतीही अधिक फायदेशीर असल्याचेही...

Face : नाक आणि ओठांच्या मधोमध असलेल्या भागाला काय म्हणतात?

  आपले शरीर हे अनेक अवयवांनी बनले आहे. प्रत्येक अवयव आपले शरीर अधिक उत्तम राखण्यासाठी सतत त्याचे योजलेले कार्य करत असतो. पृथ्वीवरील असलेले आपण सर्व मनुष्य हे जरी एकसारखे दिसायला नसले तरी त्यांची ठेवण आणि सर्व अवयव हे एकसारखेच असतात. आता आपल्या शरीरामध्ये अनेक लहान मोठे अवयव काम करतात. काही अवयवांना काम नसले तरी ते नुसते असणे देखील महत्त्वाचे असते. आपल्याला आपल्या मोजक्याच अवयवांची माहिती असते. मोजक्याच अवयवांचे कार्य माहिती असते. मात्र आपल्या शरीरात असे देखील काही अवयव आहेत, ज्याकडे आपण कधी लक्ष देखील देत नाही, आणि जरी लक्ष दिले तरी ते का आहे, असा प्रश्न देखील आपल्याला पडत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला आपल्या शरीरातील एका अशाच अवयवांबद्दल माहिती देणार आहोत, ज्याकडे आपण रोज बघतो मात्र त्याची आपल्याला काहीच माहिती नाहीये. आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक लहान-मोठ्या रेषेला एक शास्त्रीय महत्त्व असते. अशीच एक विशेष रेषा म्हणजे नाक आणि वरच्या ओठाच्या मध्यभागी असणारी उभी खाच. याच खाचेला वैद्यकीय भाषेत फिल्ट्रम असे म्हणतात. याला ओष्ठखात म्हणजेच ओठांच्या खालचा भाग असा होतो. हा शब्द बोलायला थोडा...

Kedarnath : पांडवांनी बांधलेल्या केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे महत्त्व

  सनातन धर्मामध्ये भगवान शिवाचे स्थान खूपच उच्च आहे. सृष्टीचे संहारक अशी ओळख असलेल्या भगवान शिवाची पृथ्वीवर अगणित मंदिरं आहेत, मात्र यातल्या 12 ज्योतिर्लिंगांना असलेले महत्त्व औरच आहे. भारतात भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंग असून या बाराही ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच 12 ज्योतिर्लिंगांपैकी अकरावे ज्योतिर्लिंग म्हणजे ‘केदारनाथ’. उत्तराखंड राज्यात वसलेले जगप्रसिद्ध केदारनाथ ज्योतिर्लिंग हे अतिशय जाज्वल्य देवस्थान आहे. केवळ 12 ज्योतिर्लिंगच नाही तर अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेमध्ये देखील केदारनाथ मंदिराला स्थान आहे. अशा या केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आले आहे.   आज 22 एप्रिल रोजी मंत्रोत्तचारांच्या गजरात केदारनाथ मंदिराचे सहा महिन्यांपासून बंद असलेले दरवाजे उघडले गेले. आजपासून पुढील सहा महिने अर्थात नोव्हेंबरपर्यंत, केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले राहतील. केदारनाथ मंदिर हे सहा महिने अतिजास्त होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बंद असते. तर उरलेले सहा महिने खुले असते. आज मंदिराचे दरवाजे उघडल्या गेल्याने भाविकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून, ज्यांना ...

OCI कार्ड म्हणजे काय? परदेशी नागरिकांना भारतात दीर्घकाळ राहण्यासाठी कसे मिळते हे कार्ड

  OCI Card  : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी भारताशी नातं कायम ठेवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे OCI (Overseas Citizen of India) कार्ड. हे कार्ड भारतीय नागरिकत्व देत नसले तरी भारतात दीर्घकाळ राहणे, काम करणे आणि विविध सुविधा मिळवणे यासाठी मोठी मदत करते. अनेकांना OCI कार्डची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि त्याचे फायदे याबाबत संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे OCI कार्ड नेमके काय आहे आणि ते कसे मिळवायचे, याची सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. OCI कार्ड म्हणजे नेमकं काय? OCI म्हणजे “Overseas Citizen of India” – म्हणजेच भारतीय वंशाचे परदेशी नागरिक. भारत सरकारने 2005 साली नागरिकत्व कायद्यात सुधारणा करून OCI कार्डची संकल्पना सुरू केली. हे कार्ड भारताचे पूर्ण नागरिकत्व देत नाही, मात्र “लाईफटाइम व्हिसा”सारखी सुविधा देते. म्हणजे OCI कार्डधारकांना भारतात कोणत्याही कालमर्यादेशिवाय ये-जा करता येते आणि राहता येते. तसेच त्यांना आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक सुविधा मिळतात. OCI कार्डसाठी पात्रता कोणाला मिळते? OCI कार्डसाठी अर्ज करण्यासाठी काही विशिष्...

Amarnath : अमरनाथ यात्रेची तारीख जाहीर, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया कशी असेल?

हिंदू धर्मामध्ये यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन देवदर्शन घेणे म्हणजेच यात्रा. चारधाम यात्रा हिंदू धर्मात सर्वात मोठी आणि पवित्र यात्रा मानली जाते. मात्र या यात्रेसोबतच अजून एक यात्रा अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि ती यात्रा म्हणजे, अमरनाथ यात्रा. हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमरनाथ यात्रेला जुलैमध्ये सुरुवात होणार आहे. बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अनेक भक्त प्रतिक्षेत आहेत. अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, यावर्षी यात्रा 3 जुलै ते 28 ऑगस्टपर्यंत चालेल. 57 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून पहिला जत्था रवाना होईल. यात्रेसाठी नोंदणी 15 एप्रिलपासून अर्थात आजपासून सुरू झाली आहे. एलजी सिन्हा यांनी यात्रेची माहिती देताना माध्यमांना सांगितले की, 13 ते 70 वयोगटातील लोक ही यात्रा करू शकतात. गुहेत पहिली पूजा 19 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला केली जाईल. यात्रेसाठी अनंतनाग येथून पारंपरिक 48 किमी लांबीचा नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबल येथ...

Parshuram Jayanti : विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांची आज जयंती

  हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. आज संपूर्ण देशात अक्षय्य तृतीया मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस अतिशय शुभ समजला जातो. या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी तर होतेच सोबतच भगवान विष्णू यांचा सहावा अवतारा असलेल्या भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी होते. भगवान परशुराम यांना चिरंजीव मानले जाते. त्यांचा उल्लेख महाभारत आणि विविध पुराणांमध्ये आढळतो. त्यांच्या हाती असलेल्या “परशु (कुऱ्हाड)” या शस्त्रामुळे त्यांना परशुराम म्हटले जाते, हे शस्त्र त्यांना भगवान शिवप्रभूंनी दिले होते अशी मान्यता आहे.   भगवान परशुरामाचे जन्माचे नाव राम होते. त्यांनी आपल्या कठोर तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले. त्यानंतर भगवान शिवाने त्यांना अनेक अस्त्रे आणि शस्त्रे दिली. ज्यात परशु हा देखील मुख्य आहे. त्यांनी परशु धारण केले, त्यानंतर त्यांना परशुराम म्हटले जाऊ लागले. परशुरामाशिवाय ते रामभद्र, भार्गव, भृगुवंशी इत्यादी नावांनी देखील ओळखले जातात. परशुराम हे शंकराचे परम उपासक असल्यामुळे परशुरामजींना रुद्र श...