Chardham Yatra : चारधाम यात्रा सुफळ संपूर्ण होण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीया आहे. याच दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री या पहिल्या दोन धामांचे दरवाजे उघडले जातील. तर केदारनाथ मंदिर हे 22 एप्रिल आणि बद्रीनाथ मंदिर 23 एप्रिल रोजी उघडले जाणार आहे. या दिवसांपासून अधिकृतपणे चारधाम यात्रेला सुरुवात होते. २०२५ मध्ये ही यात्रा ३० एप्रिलला सुरू झाली होती. यंदा ११ दिवस आधीच दरवाजे उघडल्यामुळे मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या चार धाम यात्रेला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे. ही यात्रा केल्यानंतर पुण्य प्राप्त होऊन मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. त्यामुळे लाखो लोकं दरवर्षी ही यात्रा करतात. मात्र ही यात्रा करणे वाटते तितके सोपे अजिबातच नाहीये. कारण हिमालयातील अत्यंत कठीण, उंचावर आणि बर्फाच्छादित भागात ही यात्रा पार पडते. साधारणपणे एप्रिल-मे ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात चालणारी ही यात्रा ट्रेकिंग, अनिश्चित हवामान आणि दुर्गम मार्गांमुळे अत्यंत अवघड मानली जाते. या ठिकाणी अनेक लोकांनी विविध प्रकारचे त्रास होतात, ज्यामुळे ही यात्रा पूर्ण करणे देखील अवघड होऊन जाते. ...