Kedarnath : पांडवांनी बांधलेल्या केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे महत्त्व
सनातन धर्मामध्ये भगवान शिवाचे स्थान खूपच उच्च आहे. सृष्टीचे संहारक अशी ओळख असलेल्या भगवान शिवाची पृथ्वीवर अगणित मंदिरं आहेत, मात्र यातल्या 12 ज्योतिर्लिंगांना असलेले महत्त्व औरच आहे. भारतात भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंग असून या बाराही ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच 12 ज्योतिर्लिंगांपैकी अकरावे ज्योतिर्लिंग म्हणजे ‘केदारनाथ’. उत्तराखंड राज्यात वसलेले जगप्रसिद्ध केदारनाथ ज्योतिर्लिंग हे अतिशय जाज्वल्य देवस्थान आहे. केवळ 12 ज्योतिर्लिंगच नाही तर अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेमध्ये देखील केदारनाथ मंदिराला स्थान आहे. अशा या केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आले आहे. आज 22 एप्रिल रोजी मंत्रोत्तचारांच्या गजरात केदारनाथ मंदिराचे सहा महिन्यांपासून बंद असलेले दरवाजे उघडले गेले. आजपासून पुढील सहा महिने अर्थात नोव्हेंबरपर्यंत, केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले राहतील. केदारनाथ मंदिर हे सहा महिने अतिजास्त होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बंद असते. तर उरलेले सहा महिने खुले असते. आज मंदिराचे दरवाजे उघडल्या गेल्याने भाविकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून, ज्यांना ...