Posts

Monkeys in China : चीनमध्ये सोन्यापेक्षा महाग माकड

चीनमध्ये होणाऱ्या संशोधनाबाबतचे रहस्य आता लपून राहिलेले नाही.   चीनमध्ये अशा हजारो प्रयोगशाळा आहेत, ज्यामध्ये औषध आणि अन्य प्रकारची संशोधने होत असतात. या सर्वांचे प्रयोग सुरुवातीला प्राण्यांवर केले जातात.   यासाठी चीनमध्ये कुत्रा, मांजर, ससा, गाढव, साप आणि माकड यांचा वापर करण्यात येतो. चीनमध्ये संशोधन आणि प्रयोगांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, आता तिथे चक्क माकडांची किंमत आभाळाला टेकली आहे. एका माकडासाठी या प्रयोगशाळा वीस लाखांहून अधिक रक्कम मोजत आहेत. यामुळे चीनमध्येच माकड पकडून देण्याची स्पर्धा लागली आहे. ही स्पर्धा एवढी तीव्र झाली आहे की आता चीनमधील माकडेही दुर्मिळ होऊ लागली आहेत. त्यामुळे आता चीनमधील प्रयोगशाळा अन्य देशांमधून माकडे मागवत आहेत. यामध्ये श्रीलंका आणि व्हिएतनामसारख्या देशांचा समावेश आहे. चीनमध्ये औषधांच्या संशोधनात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये अलिकडच्या वर्षांत माकडांचा वापर वाढला आहे. यामुळे संशोधनात वापरल्या जाणाऱ्या माकडांना सोन्याच्या दरापेक्षाही अधिक दर देऊन खरेदी केले जात आहे. जवळपास २० लाखांपर्यंत किंमत एका माकडाला मिळत आहे. येथील...

Pratyangira Temple: या ज्योतिर्लिंगाशेजारी आहे रावणाच्या कुलदेवीचे मंदिर

मध्यप्रदेशातील उज्जैन नगरी ही बाबा महाकालांची नगरी म्हणून ओळखली जाते. सोबतच या शहराची ओळख मंदिरांचे शहर म्हणूनही आहे. उज्जैनमध्ये १०० हून अधिक प्रमुख मंदिरे आणि शेकडो लहान तीर्थक्षेत्रे व तीर्थस्थळे आहेत.  या प्रसिद्ध मंदिरांमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, हरसिद्धी माता मंदिर, कालभैरव मंदिर, चिंतामण गणेश मंदिर आणि सांदीपनी आश्रम यांचा समावेश आहे.  राजा विक्रमादित्य यांनी यापैकी काही मंदिरांची स्थापना केल्याची कथा सांगण्यात येते. यापैकी सर्वच मंदिरांचा पौराणिक कथांमध्ये संदर्भ आढळतो. बाबा महाकाल मंदिराप्रमाणेच सांदीपनी आश्रमाचीही मोठी महती आहे. येथेच भगवान कृष्णाचे शिक्षण झाले आहे. त्यामुळेच उज्जैन नगरी ही भगवान शंकरांसोबत भगवान कृष्णाच्या भक्तांसाठीही पूजनीय नगरी आहे. मात्र यासोबत रावणासाठीही उज्जैन नगरी पूजनीय होती. कारण याच नगरीमध्ये रावणाची कुलदेवी असलेल्या माता प्रत्यांगिरा देवीचे मंदिर आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी रावण या देवीची पूजा करत असे. असे मानले जाते की माता प्रत्यांगिरा या निकुंबला देवीचे रूप आहेत. निकुंबला देवीचा जन्म भगवान नरसिंहांना शांत करण्यासाठी झाला होता...

Health Care : बॅड कोलेस्ट्रॉलच्या या 5 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, पडेल महागात

Health Care :  आजच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीत   बॅड कोलेस्ट्रॉल (LDL – Low Density Lipoprotein)   वाढणे ही गंभीर समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक घटक असला तरी त्याचे प्रमाण वाढल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि रक्तवाहिन्यांचे विकार उद्भवू शकतात. विशेष म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात, कारण ती सौम्य किंवा सामान्य वाटू शकतात. मात्र वेळेत लक्ष न दिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. खालील पाच लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. छातीत वेदना किंवा दडपण रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचल्यामुळे त्या अरुंद होतात. त्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि छातीत वेदना, दडपण किंवा जळजळ जाणवू शकते. हे लक्षण विशेषतः चालताना किंवा जिने चढताना अधिक जाणवते. ही स्थिती पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवते. त्यामुळे वारंवार छातीत त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पायात वेदना किंवा मुंग्या येणे रक्ताभिसरण कमी झाल्यास पायात वेदना, मुंग्या येणे किंवा थकवा जाणवतो. चालताना पिंडऱ्यांमध्ये वेदना होणे हे ‘पेर...

TFM Awards : टाइम्स फ्युचर ऑफ मॅटरनिटी’ (TFM) अवॉर्ड्स २०२६ साठी प्रवेशिका आमंत्रित

TFM Awards :   मातृत्व, महिलांचे आरोग्य आणि नवजात बाळांच्या काळजीच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, रुग्णालये, स्टार्टअप्स आणि संस्थांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.   Times Future of Maternity Awards   अर्थात ‘टाइम्स फ्युचर ऑफ मॅटरनिटी’ (TFM) अवॉर्ड्स २०२६ साठी अधिकृतपणे प्रवेशिका मागवण्यात येत आहेत. या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या माध्यमातून मातृत्व सेवांमध्ये नावीन्य, दर्जा आणि संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या घटकांचा सन्मान केला जाणार आहे. बदलत्या आरोग्य व्यवस्थेत मातृत्वाशी संबंधित सेवांचे महत्त्व लक्षात घेऊन हे पुरस्कार विशेष महत्त्वाचे मानले जात आहेत. TFM अवॉर्ड्स २०२६ चे उद्दिष्ट केवळ पुरस्कार देणे नसून, मातृत्व क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती देशासमोर आणणे हे आहे. गर्भवती महिलांची काळजी, सुरक्षित प्रसूती, नवजात बाळांचे आरोग्य, स्त्री-आरोग्य तंत्रज्ञान, तसेच मानसिक व भावनिक आधार देणाऱ्या सेवांचा यात समावेश आहे. या पुरस्कारांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, मॅटरनिटी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, हेल्थकेअर प्रोफेशनल्स, डिजिटल हेल्थ स्टार्टअप्स आण...

Morning Routine : दिवसभर उत्साही राहायचंय ? सकाळी उठल्यावर सर्वात आधी करा ‘हे’ काम

  Morning Routine :  आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण सकाळी उठल्यावरच थकलेले, आळशी किंवा तणावग्रस्त वाटतात. याचा परिणाम दिवसभराच्या कामावर, मनःस्थितीवर आणि आरोग्यावरही होतो. तज्ज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने केली तर केवळ ऊर्जा वाढत नाही, तर त्वचेचाही नैसर्गिक ग्लो टिकून राहतो. यासाठी सकाळी उठल्यावर लगेचच  एक सोपी पण प्रभावी सवय  अंगीकारणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. ही सवय म्हणजे – उठताच शरीराला हलकी हालचाल देत  कोमट पाणी पिणे आणि काही मिनिटांची श्वसन-हालचाल  करणे.  सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर टाकण्यास मदत होते. रात्री झोपेत शरीराची डिटॉक्स प्रक्रिया सुरू असते आणि सकाळी पाणी प्यायल्याने ही प्रक्रिया अधिक प्रभावी होते. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि शरीर हलकं वाटू लागतं. तज्ज्ञ सांगतात की शरीर आतून स्वच्छ झालं की त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. पिंपल्स, निस्तेजपणा आणि कोरडेपणा हळूहळू कमी होऊ लागतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते. पाण्यानंतर 5 ते ...

Detox Benefits : बाजारातील Detox प्रॉडक्ट्स फायदेशीर? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

  Detox Benefits :   आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात विषारी पदार्थ साचल्याचे अनेकजण मानतात आणि “Detox” हा शब्द सहज चर्चेत येतो. बाजारात Detox ड्रिंक्स, सप्लिमेंट्स, पावडर आणि खास फूड प्लॅन यांसारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. काही कंपन्या या उत्पादनांना आश्चर्यकारक फायदे देणारे म्हणून जाहिरात करतात—जसे की वजन कमी करणे, पचन सुधारणा, त्वचा निरोगी करणे आणि ऊर्जा वाढवणे. परंतु तज्ज्ञांचे मत आहे की शरीराला Detox करण्याची गरज ही अनेक वेळा   प्रचारामुळे वाढवलेली भ्रांति   आहे, आणि अनेक प्रॉडक्ट्सचा प्रभाव अपेक्षेपेक्षा कमी असू शकतो . (Detox Benefits) Detox म्हणजेच शरीरातून विषारी पदार्थ (toxins) काढून टाकणे ही प्रक्रिया आहे असे सामान्यपणे मानले जाते. आपण जे खातो, पितो आणि सांस घेतो, त्यातून शरीरात बाहेरून चांगले-वाईट दोन प्रकारचे घटक प्रवेश करतात. परंतु जैविक दृष्टिकोनातून पाहता, शरीरात असलेली  लिव्हर, किडनी, फुफ्फुस आणि त्वचा  हे नैसर्गिक Detox सिस्टम म्हणून काम करतात. हे अवयव शरीरातील विषारी पदार्थाचे शुद्धीकरण आणि बाहेर काढण्याचे काम नियमितपणे ...

BJP Maharashtra : महाराष्ट्रात भाजपच नंबर १ !

  दीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाना मुहूर्त लाभला. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान झाले व ९ फेब्रुवारीला निकाल लागले. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांनी दणदणीत विजय मिळवला. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनी मिळून जिल्हा परिषदेच्या एकूण ७३१ जागांपैकी सुमरे ५५० जागा मिळवून प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उबाठा सेना यांना चारी मुंड्या चित केले. या विजयात भाजपचे यश विशेष उठून दिसते. या यशाचे निर्विवाद मानकरी आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कुशल संघटक असलेले महाराष्ट्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण ! २०१४ सालापासून ते आजतागायत भाजपने महाराष्ट्रातील क्रमांक १ चा पक्ष हे स्थान अबाधित राखले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा खूप कमी यश मिळाल्याने महाविकास आघाडीची सरशी झाली होती. पण भाजपने त्वरित आत्मपरीक्षण करून लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची दुरुस्ती केली आणि त्याचा परिणाम २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला. २०२४ च्या विधासभा निवडणुकीत भाजप सहयोगी सदस्यांच्या साथीने १३७ जा...

Bloating : पोट फुगण्याची समस्या का होते? मार्गदर्शन आणि उपाय जाणून घ्या

Bloating :   सध्या अनेकांना वारंवार पोट फुगणे, जड वाटणे किंवा गॅसेसची समस्या जाणवते. ही समस्या किरकोळ वाटली तरी रोजच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होतो. जेवणानंतर पोट ताठर होणे, ढेकर येणे, अपचन, पोटात कुरकुर किंवा अस्वस्थता ही लक्षणे सामान्यपणे दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, पोट फुगण्यामागे चुकीच्या आहारपद्धतीपासून ते पचनसंस्थेतील बिघाडापर्यंत अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे ही समस्या वारंवार होत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. तज्ज्ञ सांगतात की, जलदगतीने जेवणे हे पोट फुगण्याचे एक प्रमुख कारण आहे. घाईघाईत जेवल्यास अन्नासोबत हवा देखील पोटात जाते, ज्यामुळे गॅस तयार होतो. तसेच जास्त प्रमाणात तळलेले, मसालेदार किंवा प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्न खाल्ल्यास पचनावर ताण येतो. काहींना दुधातील लॅक्टोज पचत नाही, तर काहींना गहू किंवा डाळीतील घटकांमुळे त्रास होतो. अशा वेळी अन्नातील विशिष्ट घटकांबद्दल संवेदनशीलता (फूड इंटॉलरन्स) असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्बोनेटेड पेये, जास्त चहा-कॉफी किंवा सतत बसून राहण्याची सवयही पोट फुगण्यास कारणीभूत ठरू शकते.  ( Bloating )...

ITR रिफंड उशीरा आला तरी व्याज मिळालं नाही? करदात्यांचे हक्क

  ITR :   आयकर विवरणपत्र (ITR) भरल्यानंतर अनेक करदाते रिफंडची वाट पाहत असतात. नियमांनुसार रिफंड ठराविक कालावधीत मिळणे अपेक्षित असते. मात्र अनेक वेळा रिफंड उशीरा येतो आणि त्यावर मिळणारे व्याजही खात्यात जमा झालेले दिसत नाही. अशा वेळी करदात्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो—उशीरा रिफंड आल्यास व्याज मिळायलाच हवे का, की काही अटी लागू होतात? आयकर कायद्यानुसार या संदर्भात स्पष्ट नियम आहेत, असे करतज्ज्ञ सांगतात.  (ITR) आयकर कायद्यातील कलम 244A नुसार, करदात्याचा रिफंड उशिरा मिळाल्यास त्यावर व्याज देणे बंधनकारक आहे. साधारणपणे  वार्षिक 6 टक्के दराने  (म्हणजे दरमहा 0.5 टक्के) व्याज दिले जाते. हे व्याज रिफंडची रक्कम देय झालेल्या तारखेपासून ते प्रत्यक्ष रिफंड मिळेपर्यंत मोजले जाते. उदाहरणार्थ, अ‍ॅडव्हान्स टॅक्स किंवा TDS जास्त कापला गेला असल्यास आणि रिफंड देण्यात उशीर झाला, तर करदात्याला व्याज मिळण्याचा हक्क असतो.  (ITR) मात्र प्रत्येक प्रकरणात व्याज मिळेलच असे नाही. काही परिस्थितींमध्ये आयकर विभाग व्याज देत नाही. उदाहरणार्थ, ITR उशिरा भरल्यास किंवा रिटर्नमध्ये चूक असल्या...

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग

  महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. सर्वच मराठी लोकांची आण, बाण आणि शान म्हणजे महाराज. ज्यांनी आपल्याला स्वराजायचे केवळ स्वप्न दाखवले नाही तर ते स्वप्न सत्यात देखील उतरवले आणि स्वराज्यात जगायला शिकवले देखील असा आपला सर्वांचा लाडका राजा म्हणजे शिवाजी महाराज. उत्तम राजा कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले महाराज. १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले.   (Shivaji Maharaj) वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून “हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” असे म्हणत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी आपल्या अफाट बुद्धिमत्ता, शौर्य आणि कुशल प्रशासनाच्या जोरावर गुलामगिरीच्या अंधारात असलेल्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट दाखवली. शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्यच स्थापन केले नाही, तर स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे हित आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला. आज शिव जयंतीच्या निमित्ताने आपण महाराजां...