Posts

ITR रिफंड उशीरा आला तरी व्याज मिळालं नाही? करदात्यांचे हक्क

  ITR :   आयकर विवरणपत्र (ITR) भरल्यानंतर अनेक करदाते रिफंडची वाट पाहत असतात. नियमांनुसार रिफंड ठराविक कालावधीत मिळणे अपेक्षित असते. मात्र अनेक वेळा रिफंड उशीरा येतो आणि त्यावर मिळणारे व्याजही खात्यात जमा झालेले दिसत नाही. अशा वेळी करदात्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो—उशीरा रिफंड आल्यास व्याज मिळायलाच हवे का, की काही अटी लागू होतात? आयकर कायद्यानुसार या संदर्भात स्पष्ट नियम आहेत, असे करतज्ज्ञ सांगतात.  (ITR) आयकर कायद्यातील कलम 244A नुसार, करदात्याचा रिफंड उशिरा मिळाल्यास त्यावर व्याज देणे बंधनकारक आहे. साधारणपणे  वार्षिक 6 टक्के दराने  (म्हणजे दरमहा 0.5 टक्के) व्याज दिले जाते. हे व्याज रिफंडची रक्कम देय झालेल्या तारखेपासून ते प्रत्यक्ष रिफंड मिळेपर्यंत मोजले जाते. उदाहरणार्थ, अ‍ॅडव्हान्स टॅक्स किंवा TDS जास्त कापला गेला असल्यास आणि रिफंड देण्यात उशीर झाला, तर करदात्याला व्याज मिळण्याचा हक्क असतो.  (ITR) मात्र प्रत्येक प्रकरणात व्याज मिळेलच असे नाही. काही परिस्थितींमध्ये आयकर विभाग व्याज देत नाही. उदाहरणार्थ, ITR उशिरा भरल्यास किंवा रिटर्नमध्ये चूक असल्या...

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग

  महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. सर्वच मराठी लोकांची आण, बाण आणि शान म्हणजे महाराज. ज्यांनी आपल्याला स्वराजायचे केवळ स्वप्न दाखवले नाही तर ते स्वप्न सत्यात देखील उतरवले आणि स्वराज्यात जगायला शिकवले देखील असा आपला सर्वांचा लाडका राजा म्हणजे शिवाजी महाराज. उत्तम राजा कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले महाराज. १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले.   (Shivaji Maharaj) वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून “हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” असे म्हणत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी आपल्या अफाट बुद्धिमत्ता, शौर्य आणि कुशल प्रशासनाच्या जोरावर गुलामगिरीच्या अंधारात असलेल्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट दाखवली. शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्यच स्थापन केले नाही, तर स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे हित आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला. आज शिव जयंतीच्या निमित्ताने आपण महाराजां...

Pilot : पायलट होण्यासाठी कोणती पात्रता लागते? जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

  आपल्याकडे कायमच लहान मुलांना एक प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे, ‘तुला मोठे होऊन काय व्हायचे आहे’? पूर्वीच्या काळी यावर मुलांचे उत्तर ठरलेले असायचे डॉक्टर, टीचर, इंजिनियर, सायंटिस्ट, वकील आदी. मात्र आता काळ बदलला आजकाल मुलांचे स्वप्न देखील बदलेले आहेत. आजच्या मुलांना हाच प्रश्न विचारला तर स्पेस सायंटिस्ट, डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेयर इंजिनियर, पायलट असे उत्तर येतात. यात पायलट होणे तसे खूपच अवघड आणि कठीण करियर आहे. एक संपूर्ण विमान आकाशात झेपावून ते सुखरूप गंतव्य स्थानी नेणे ही खूपच मोठी जबादारी आहे. अनेक मुलांना पायलट तर व्हायचे असते, मात्र पायलट होण्यासाठी नक्की काय करायचे? याचे ज्ञान नसते. आज आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया.   (Pilot) आजच्या काळात विमान क्षेत्रातील संधी खूपच वाढल्या आहेत. विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या देखील दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काही काळात या क्षेत्रात अत्याधिक संधी उपलब्ध होणार यात शंका नाही. तर पायलट होण्यासाठी तुम्हाला १२ वी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. भौतिकशास्त्र आणि गणि...

USA VS Greenland : अमेरिकन सैन्याला कुत्र्यांचे भय

  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज ग्रीनलॅंड कसे आणि कधी ताब्यात घेणार याचे बेत आखत आहेत. त्यासाठी ते डेन्मार्कला धमकीही देत आहेत. व्हेनेझुएलामध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे ट्रम्प यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र ग्रीनलॅंड आणि व्हेनेझुएलामध्ये खूप मोठा फरक आहे. या सर्वात ग्रीनलॅंडमधील हवामान हा प्रमुख मुद्दा येतो. ग्रीनलँडचे हवामान प्रामुख्याने थंड आणि आर्क्टिक आहे. आजही तिथे -२ एवढे तापमान आहे. या तापमानात कायम घट होते. ग्रीनलॅंडचा मध्य भाग नेहमीच बर्फाने झाकलेला असतो.  ( USA VS Greenland ) अशा भागात सैन्य कारवाई करण्यासाठी अमेरिकन सैन्यही तयारीचे पाठवावे लागणार आहे. या सैन्याला ग्रीनलॅंड आर्मीला तोंड द्यावे लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प या ग्रीनलॅंड आर्मीचा लप्पू म्हणून उल्लेख करतात. पण याच आर्मीनं एकेकाळी हिटलरच्या सैन्यालाही माघारी पाठवले होते. हाडं गोठवणा-या थंडीमध्ये ग्रीनलॅंडचे रक्षण करणारे हे डेन्मार्क एलिट आर्क्टिक युनिट म्हणजे कुत्र्यांचे सैन्य आहे. ग्रीनलॅंडच्या बर्फात हे कुत्रे सहज फिरु शकतात. त्यांना साक्षात मृत्यूचे रुप मानले जाते. कारण या कुत्र्यांच्यामध्ये ...

AIMIM in Maharashtra : एम.आय.एम. धोकादायक की धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेले पक्ष…?

  नुकत्याच महाराष्ट्रात संपन्न झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालाची तीन वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय, दुसरं म्हणजे एम.आय.एम. पक्षाने मारलेली मुसंडी, तिसरं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १९ महानगरपालिकात मिळालेल्या ‘शून्य ‘ जागा. हे तीनही निकाल म्हटले तर स्वतंत्र आहेत आणि म्हटले तर एकाशी एक संबंधित आहेत. भाजपाने आता उघड उघड हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे आणि त्याबद्दल त्यांच्या मनात कुठलाही अपराधीपणा नाही. भाजपच्या या नीतीमुळे हिंदू भाजपच्या झेंड्याखाली एक होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपच्या हिंदुत्वाची प्रतिक्रिया म्हणून मुसलमान एम.आय.एम. प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या मागे एकवटू लागले आहेत किंवा ओवेसींना उत्तर म्हणून हिंदूंचे ध्रुवीकरण भाजपच्या झेंड्याखाली होऊ लागले आहे असेही म्हणता येईल. याच निवडणुकीत पहायला मिळालं की, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षावरून मुसलमानांचा विश्वास आता उडू लागला आहे, कारण त्यांनी मतांसाठी मुसलमानांचा वापर केला, हे या समाजाच्या लक्षात आले आहे. एम. आय. एम. पक्षाला २९ पैकी २५ महानगरपालिकात मिळून १२५ जा...

४० लाख वर्ष पृथ्वीवर राहणाऱ्या प्राण्याला माणसाने ५० वर्षात संपवलं !

DODO …अनेक ठिकाणी तुम्ही या पक्षाचे फोटो बघितलेच असतील, पण दुर्दैव म्हणजे तो आज आपल्यात नाहीये आणि  यापेक्षाही दुःखद गोष्ट म्हणजे माणसामुळे नामशेष होणारा हा पृथ्वीवरचा पहिला जीव होता.  आज तो फक्त चित्रात उरला आहे. त्याला एक वेडा पक्षी म्हटलं गेलं होतं. पण त्याच्याइतका शहाणा तर माणूसपण नव्हता. पण तो पूर्णपणे नामशेष झाला कसा, त्याच्यामागेही एक स्टोरी आहे. आज याच  DODO ची करुण कहाणी आपण जाणून घेणार आहोत. अनेक जण डोडोला वेडगळ वागणारा प्राणी म्हणायचे आणि याच कारणामुळे तो कायमचा संपला, असंही म्हटलं गेल. पण सत्य काहीतरी वेगळच आहे.  डोडोचा पोर्तुगीज भाषेत अर्थ होतो वेडा … आता पोर्तुगीज लोकांशी त्याचं काय कनेक्शन हे पुढे सांगतो. खर तर  DODO  हा कबुतराच्या फॅमिली मधला…म्हणजे कबुतराचाच नातेवाईक पण त्याच्या पेक्षा थोडासा मोठा. जशी मांजर लहान असते, पण आपण वाघ सिंहालाही कॅट फॅमिली मधलं म्हणतो. तसच काहीस डोडोचं होतं.  ४० लाख वर्षांपूर्वी आशिया खंडाच्या एका भागातून उडत हे कबुतरासारखे पक्षी मॉरिशसच्या जमिनीवर उतरले. ही जागा म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्गच होती कारण इथे खा...

Marathi Legends : या तिन्ही मराठी दिग्गजांनी साऊथचं अख्खं मार्केट खाल्लय !

  बॉलिवूडमध्ये एक छोटासा रोल मिळाल्यावर मराठी कलाकारांना मीपणा येतो, अशा कमेंट्स मराठी प्रेक्षक अनेकदा करत असतात. सध्या अनेक मराठी कलाकारांना बॉलिवूडच्या कोणत्या न कोणत्या चित्रपटात काही न काही रोल मिळतोच… यात एक नाव म्हणजे उपेंद्र लिमये… पण मराठीमध्येच असे तीन दिग्गज आहेत, ज्यांनी अख्खं साऊथ मार्केट खाल्लंय. त्यांनी मिळून तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये शंभरपेक्षा अधिक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांची चर्चा होत नाही आणि ते दिग्गज कलाकारसुद्धा ही गोष्ट मिरवत नाहीत. ते म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे, सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी ! तिघांनीही साऊथच्या चित्रपटांमध्ये इतकं काम केलं आहे, की त्या इंडस्ट्रीत त्यांना एक मान एक ओळख मिळाली आहे. अनेक दिग्दर्शकांना ते आपल्या चित्रपटासाठी लकी वाटतात. व्हीलनपासून कित्येक सपोर्टिंग रोल्स त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे टीव्हीवर जेव्हा साऊथचे सिनेमे लागतात, तेव्हा या तिन्ही कलाकारांना पाहून एक वेगळाच अभिमान वाटतो. इथे आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी वाटते की, साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव रामोजीराव गायकवाड हेसुद...

Marathi Cinema : ११० मराठी चित्रपटांनी फक्त ९९ कोटी कमावले…

  २०२५ हे वर्ष तसं मराठी इंडस्ट्रीसाठी फार खास राहिलं नाही. काही आयकॉनिक सिनेमे आले, जसे आता थांबायचं नाय, दशावतार, साबर बोंडं, गोंधळ, उत्तर आणि बरेच… पण बाकीचे नेहमीप्रमाणे आपटले. म्हणजे २०२५ या वर्षात ११० मराठी चित्रपट आले होते. पण या सर्वांची मिळून कमाई फक्त आणि फक्त ९९ कोटी ४६ लाख रुपये इतकीच झाली. त्यातसुद्धा फक्त दहा चित्रपटांनी म्हणजे ९ टक्के चित्रपटांनी जवळपास ७५ टक्के म्हणजे ७४.४६ कोटी रुपये कमाईचा वाटा उचलला. हिंदी आणि साउथच्या चित्रपटसृष्टीशी कमाईच्या बाबतीत आपली तुलना होऊ शकत नाही.  पण रिजनल सिनेमाच्या तुलनेत फक्त महाराष्ट्रात तरी मराठी सिनेमाने चांगली कमाई करणं अपेक्षित होतं, जे होत नाही. दुसरीकडे पुष्पा-२ सारखा सिनेमा एकट्या मुंबई सर्किटमध्ये हो एकट्या मुंबई सर्किटमध्ये तब्बल २०० कोटींची कमाई करू शकतो, पण ११० मराठी चित्रपट मिळून अख्ख्या महाराष्ट्रात १०० कोटींचा आकडा सुद्धा पार करून शकत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रमुख भारतीय भाषांच्या तुलनेत हे ९९ कोटी सर्वात कमी बॉक्स ऑफिस कलेक्शन ठरलं आहे. आज साउथच् सिनेमाच्या मग तमिळ तेलुगु, कन्नड, मल्याळम कोणताही घ्या… त्...