Babasaheb Ambedkar: म्हणून बाबासाहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत!
मराठी माणूस आजपर्यंत पंतप्रधान झाला नाही… भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत अनेकदा हे म्हटलं गेलय. तशी मराठी माणसाकडे पंतप्रधान होण्याची संधी अनेकदा आली होती. Yashwantrao Chavan, Madhu Dandavate, Sharad Pawar या नेत्यांकडे ही संधी होती. काही लोकं असंही म्हणतात की जर आज Pramod Mahajan जिवंत असते, तर Narendra Modi पंतप्रधान नसते, तर महाजनच असते. (Babasaheb Ambedkar) पण हा झाला इतिहासाचा भाग… याच इतिहासात असंही एक नाव होतं जे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलं असतं, ते म्हणजे महामानव Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar! अफाट बुद्धिमत्ता, कायद्याचं विलक्षण ज्ञान, अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास, प्रचंड संघर्ष करण्याची तयारी पण तरीही स्वतंत्र भारताचे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत याची खंत आजही अनेकांना वाटते. यामागच कारण त्यांच्याकडे क्षमता नव्हती असं नाही, तर त्या काळाच्या राजकीय लढाईत त्यांच्या विचारांना मोठा विरोध होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारं देशव्यापी राजकीय संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नव्हतं. बाबासाहेबांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाकडे पाहिलं, तर...