Posts

Mahavir Jayanti : भगवान महावीर यांनी जगाला दिलेली पंचशील तत्त्व कोणती?

  आज महावीर जयंती. तीर्थंकर भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर आहेत. संपूर्ण भारतामध्ये जैन धर्माचे अनुयायी महावीर जयंती मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा करतात. भगवान महावीर यांना वर्धमान, सन्मती, वीर, अतिवीर इत्यादी नावांनीही ओळखले जाते. जैन समुदाय मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. यंदा भगवान महावीरांची 2626 सावी जयंती आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान महावीर यांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस जैन समुदायातील लोक महावीर जयंती म्हणून साजरा करतात.   महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांच्या शिकवणीचे स्मरण केले जाते. महावीर जयंती ही भगवान महावीरांना समर्पित आहे, महावीरजींनी समाजकल्याणाचे संदेश दिले आणि मोक्ष मिळविण्यासाठी 5 नियमही बनवले. या पाच नियमांना महावीरांचे पंचसिद्धांत म्हणून ओळखले जाते. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, क्षमा यांवर सर्वाधिक भर दिला. भगवान महावीरांनी चतुर्विध संघाची स्थापना केली. भगवान महावीरांनी देशाच्या विविध भागात फिरून आपला पवित्र संदेश प्रसारित केला. भगवान महावीरांनी आपल्या ...

Norwegian Crown Princess Mette-Marit : अखेर राजकुमारीनं मौन सोडलं

  इराणबरोबरच्या युद्धामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगाचे लक्ष एपस्टाईन फाईलवरून दूर करण्यास यशस्वी ठरले असले तरी, या फाईलसंदर्भात तपास सुरू आहे. जेफ्री एपस्टाईन या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे कुख्यात झालेल्या गुन्हेगाराने जगभरातील राजकारणी, शास्त्रज्ञ आणि सेलिब्रिटी यांचे एक मोठे जाळे विणले होते. या जाळ्यात अडकलेल्यांना तेव्हा आपण काय करत आहोत, याची जाणीव नव्हती.  मात्र आता जेफ्रीच्या या काळ्या फाईली उघड होताच या सर्वच मान्यवरांच्या चेहऱ्यावरील बुरखा फाटला आहे. यातच एक नाव आहे ते मेटे-मारिट हिचे.  मेटे-मारिट ही नॉर्वेची राजकुमारी आहे. ही राजकुमारीही जेफ्री एपस्टाईनच्या जाळ्यात होती आणि त्याच्या बेटावर तिचा कायम मुक्काम असायचा. मात्र एपस्टाईन फाईल उघड झाल्यानंतर संपूर्ण नॉर्वेमध्ये राजकुमारीच्या या वर्तनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लोकांचा रोष एवढा होता की, राजघराण्याला माफी मागावी लागली.  खुद्द मेटे-मारिट यांनीही लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनसोबतच्या मैत्रीबद्दल नागरिकांची माफी मागितली.  त्यानंतर मेटे-मारिट बराच काळ सो...

Global Internet Infrastructure : इराण आता इंटरनेटवर घाला घालणार

  अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणमधील सर्वच प्रमुख नेते मारले गेले आहेत. मात्र त्यानंतरही इराणने युद्धातून माघार घेतल्याची घोषणा केलेली नाही. उलट या युद्धाची दाहकता वाढली आहे. अमेरिकेचे मित्र असलेल्या आखाती देशांमधील तेल प्रतिष्ठाने आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले एवढे मोठे आहेत की, इराण हे युद्ध थांबवणार नाही, उलट ते अधिक काळ चालवणार हे उघड होत आहे.   २८ फेब्रुवारी रोजी युद्धाला सुरुवात झाली. आता युद्धाला सुरुवात होऊन २१ दिवस झाले आहेत. यात संपूर्ण जगावर गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.   मात्र इराण एवढ्यावरच शांत राहणार नाही. कारण आता संपूर्ण जगातील इंटरनेटवरच घाला घालण्याची योजना इराणमध्ये होत असल्याचा संशय आहे.   होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जवळपास २०० फूट खोल पाण्यातून इंटरनेटच्या केबल्स जात आहेत.  या केबल्स जर तोडल्या, तर जगातील इंटरनेट बंद होण्याचा धोका आहे. होर्मुझ मार्गावरून जगाची तेल आणि गॅससाठी कोंडी करणारा इराण आता जिद्दीला पेटला आहे.  अमेरिका आणि इस्रायलचा बदला घेण्यासाठी इराण या केबल्सला हानी पोहोचवण्याच्या विचारात असल्याची बात...

Weight Management : वारंवार वजन कमी-वाढले जाते? लाइफस्टाइलमध्ये करा हे 5 बदल, वजन राहील नियंत्रणात

Weight Management :  आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकजण “वेट फ्लक्चुएशन” म्हणजेच वारंवार वजन कमी आणि वाढण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. काही दिवस डाएट आणि व्यायाम करून वजन कमी होते, पण नंतर पुन्हा ते वाढते. यामुळे शरीरावर आणि मनावरही परिणाम होतो. ही समस्या टाळण्यासाठी केवळ डाएट नव्हे, तर संपूर्ण लाइफस्टाइलमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. १. संतुलित आहार ठेवा (Balanced Diet) वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. अचानक खूप कमी खाणे किंवा क्रॅश डाएट करणे टाळा. प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट आणि हेल्दी फॅट्स यांचा समतोल राखा. दिवसातून ठराविक वेळी जेवण केल्यास शरीराचा Metabolism स्थिर राहतो आणि वजन वाढण्याची शक्यता कमी होते. २. नियमित व्यायाम करा (Regular Exercise) दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे, धावणे, योगा किंवा जिम वर्कआउट यामुळे कॅलरी बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहते. विशेषतः स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास स्नायू वाढतात, ज्यामुळे शरीर अधिक ऊर्जा वापरते. यामुळे वजन स्थिर ठेवणे सोपे जाते. ३. पुरेशी झोप घ्या (Proper Sleep) झोपेचा थे...

US–Iran Conflict: Crude Oil Prices Near $120 and Its Possible Impact on India

The rising tensions between the United States and Iran in West Asia are beginning to affect the global economy. Experts warn that crude oil prices in the international market could soon touch $120 per barrel due to disruptions in supply and growing geopolitical uncertainty. For countries like India , which depend heavily on oil imports, this situation could create serious economic challenges. India imports a large portion of its crude oil needs. When global oil prices rise, the impact is quickly felt in the domestic market. Higher crude prices usually lead to an increase in petrol and diesel rates , which then raises transportation costs. As a result, the prices of many everyday goods—from food to manufactured products—can increase, adding pressure on inflation. Economists also point out that rising oil prices can affect the country’s economic growth . According to estimates, a 10% rise in crude oil prices could reduce India’s GDP growth by around 0.20–0.25 percent . Higher oil impor...

Vastu Tips : घरात धन आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करायची आहे? वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी ठेवा जेड प्लांट

  Vastu Tips   : घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अनेकजण Vastu Shastra चे नियम पाळतात. त्यामध्ये काही खास वनस्पतींनाही विशेष महत्त्व दिले जाते. त्यापैकी जेड प्लांट (Jade Plant) हा अत्यंत लोकप्रिय आणि शुभ मानला जाणारा रोप आहे. ‘मनी प्लांट’सारखाच हा प्लांट आर्थिक प्रगती, धनलाभ आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, अशी मान्यता आहे. मात्र, हा प्लांट योग्य दिशेत आणि ठिकाणी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जेड प्लांटला ‘लकी प्लांट’ म्हणूनही ओळखले जाते. वास्तुशास्त्रानुसार हा प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. याची पाने गोल आणि हिरवीगार असतात, जी समृद्धीचे प्रतीक मानली जातात. घरात हा प्लांट ठेवल्यास आर्थिक स्थैर्य, नोकरीत प्रगती आणि व्यवसायात यश मिळते, अशी श्रद्धा आहे. वास्तुशास्त्रानुसार जेड प्लांट घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. मुख्य दरवाजा हा ऊर्जा प्रवेशाचा मार्ग असल्याने येथे जेड प्लांट ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. यामुळे घरात धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. ज...

Clay Pot : मातीच्या भांड्यात करा स्वयंपाक चव आणि आरोग्याचा दुहेरी फायदा

  Clay Pot :   आजच्या आधुनिक जीवनशैलीत स्टील, अॅल्युमिनियम आणि नॉन-स्टिक भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याची पद्धत पुन्हा लोकप्रिय होत आहे. तज्ज्ञांच्या मते, मातीच्या भांड्यात बनवलेले अन्न केवळ चविष्टच नसते, तर ते आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक ठरते. मातीच्या भांड्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते  अन्न शिजवताना नैसर्गिक पद्धतीने उष्णता वितरीत करतात . त्यामुळे अन्न हळूहळू आणि समतोल पद्धतीने शिजते, ज्यामुळे त्यातील पोषक घटक टिकून राहतात. जलद गॅस किंवा उच्च तापमानावर शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेत मातीच्या भांड्यातील अन्न अधिक पौष्टिक असते. याशिवाय मातीच्या भांड्यांमध्ये  अल्कलाइन (Alkaline) गुणधर्म असतात , जे अन्नातील आम्लता कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तज्ज्ञ सांगतात की, मातीतील सूक्ष्म खनिजे अन्नात मिसळून शरीराला आवश्यक पोषण देतात. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने  तेलाचा वापर कमी होतो , कारण अन्न नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते. त्...

Shriram : प्रभू श्रीरामांच्या जन्माची कथा

  आज चैत्र शुक्ल नवमी अर्थात राम नवमी. आजच्या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांचा जन्म झाला. भर दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर श्रीरामांचा अयोध्येमध्ये जन्म झाला होता. रामायण आणि रामचरित मानस हे हिंदू धर्मातील दोन पवित्र ग्रंथ आहेत. तुलसीदास यांनी श्री रामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली आहे परंतू आदिकवि वाल्मीकि यांनी आपल्या रामायणात श्री राम यांना मनुष्य मानले आहे. तुलसीदास यांची रामचरितमानस रामाच्या राज्यभिषेकानंतर समाप्त होते तर श्री वाल्मीकि यांनी आपल्या रामायणात श्री राम यांचे महाप्रयाण पर्यंत वर्णन केले आहे. आज रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामांच्या जन्माची कथा जाणून घेऊया.   महाराज दशरथांनी पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्ण अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषी-मुनींना आणि वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्...