Posts

Vastu Tips : देवघरामध्ये शुभप्राप्तीसाठी ‘या’ गोष्टी ठेवाच

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या धर्मात दैवीय अंश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपला धर्म हा नेहमीच वेगळा ठरत असतो. आपल्यासाठी आपले घर हे खूपच महत्वाचे असते. आपले घर आपल्यासाठी स्वर्ग असते. तिथे एक वेगळाच आनंद, शांती आपल्याला मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या घरात देवघराला एक वेगळेच महत्व आणि जागा असते. आपल्या देशात कोणाच्या घरात देवघर नाही असे घर शोधूनही सापडणार नाही. घरात देव असले की घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. काहींच्या घरात मोठे देवघर असते, तर काहींच्या घरात लहान मात्र देव घर हे असतेच असते. भारतीय लोकांचे घर देवघराशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. देव घर छोटे असले तरी त्यात काही मुख्य देव हे ठेवलेच जातात. मात्र या या देवांसोबतच अजून काही गोष्टी जर आपण देवघरामध्ये ठेवल्या तर नक्कीच त्याचा शुभ फायदा आपल्या घरावर आणि घरातील लोकांच्या जीवनावर होतो.   मात्र तुम्हाला माहित आहे का, वास्तुशास्त्रामध्ये देवघराबद्दल, देवघरात ठेवल्या जाणाऱ्या देवांबद्दल आणि वस्तूंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ज्यांचा वास्तुशास्त्...

Operation Tiger: अगा जे कधी घडलेची नाही??

  सध्या देशाच्या तसेच राज्याच्या पातळीवर ‘पक्षांतर’ हा विषय एकदम ‘हॉट’ झाला आहे. सगळी माध्यमे यावरच काथ्याकुट करत आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणि उद्धव सेनेत होऊ घातलेली ‘गद्दारी’ या दोन प्रमुख घटनांचा उहापोह करताना सर्वच विश्लेषकांनी असा ‘आव’ आणला आहे की हे सर्व काही नवीन आहे आणि पूर्वी असे कधीच घडत नव्हते. हे सर्व जण भाजपने ही नवीनच संस्कृती रुजवली असा आरोप करत आहेत. या सर्वाना ‘कान खोलके सुन लो ‘ म्हणताना अगदी रामायण काळापासून ते आधुनिक काळापर्यंत घडलेल्या काही प्रमुख घटनांची आठवण करून देणे क्रमप्राप्त ठरते.   रामायणातील वाली सुग्रीव संघर्ष सर्वाना माहित आहे. प्रभू रामचंद्रानी वालीचा वध केला. मरण्याआधी वालीने आपला पुत्र अंगद याला रामाच्या हवाली केले. वास्तविक त्यावेळी वालीचा रावणाशी मैत्री करार होता. तर्कदृष्ट्या वालीने अंगदला रावणाच्या स्वाधीन करायला हवे होते. पण तसे झाले नाही. पुढे रामाने अंगदला हा वानर सेनेचा सेनापती बनवले. रावणाचा ‘सद्वर्तनी’ भाऊ विभीषण हा रामाच्या पक्षाला जाऊन मिळाला. विभीषणामुळे रामाला रावणाचा पराभव करणे सुकर झाले. रावणाचा वध केल्यावर रा...

Security : एक्स, वाय, झेड आणि एसपीजी सुरक्षा म्हणजे नक्की काय?

आपण अनेकदा पाहिले असेल की, देशातील अनेक महत्वाच्या व्यक्तींसोबत मोठी सेक्युरिटी असते. मग ते कलाकार असती, राजनेता असतील किंवा उद्योगपती. या सर्वांसोबत एक मोठी सेक्युरिटी यंत्रणा देखील असते. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपण विविध कार्यक्रमांच्या वेळेस अशी मोठी यंत्रणा पाहिली असेल. काही वेळेस झेड सेक्युरिटी, झेड प्लस, वाय सेक्युरिटी आदी शब्द देखील आपण ऐकत असतो. मात्र याबद्दल जास्त काही कोणाला माहिती नसेल. आज आपण विविध प्रकारच्या सेक्युरिटी कोणत्या आणि त्या कोणाकोणाला मिळतात याची माहिती जाणून घेऊया. देशात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना म्हणजे नेते, उद्योगपती, सेलिब्रेटींना सरकारतर्फे सुरक्षा पुरवली जाते. ज्या व्यक्ती देशासाठी अतिमहत्त्वाच्या आहेत किंवा ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही सुरक्षा पुरवली जाते. वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा असते. भारतात पाच प्रकारच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा आहे. यात Z+, Z, Y+, Y आणि X श्रेणीचा समावेश आहे. मात्र या सुरक्षा अशा कधीही, कोणाच्याही सांगण्यावरून देण्यात येत नाही. त्यासाठी अनेक नियम आहेत. त्यांची पूर्तता झाल्यानंतर सरकार या सुरक्षा देतात. झेड प्लस किंव...

Mystery of China: ३००० वर्षांपूर्वीचे रहस्य आणि एका गायब झालेल्या जमातीची गोष्ट!

डोंगरांच्या भिंतींवर रहस्यमय पद्धतीने लटकवलेल्या या शवपेट्यांमध्ये एका प्राचीन जमातीची अनेक रहस्ये लपलेली आहेत. या पेट्यांमध्ये आहेत 3,000 वर्षे जुनी प्रेते आणि काही रहस्यमयी वस्तू! पण मुळात प्रश्न असा आहे की, या शवपेट्या इतक्या उंच डोंगरांच्या भिंतींवर लटकवल्या कोणी आणि कशा? या शवपेट्यांचे रहस्य जाणून घेऊया.    (Mystery of China) China च्या Yunnan आणि Sichuan प्रांतातल्या दुर्गम डोंगरांमध्ये जेव्हा कोणी या लटकलेल्या शवपेट्या पाहते, तेव्हा पहिल्यांदा वाटते की हे एखादे स्मशान आहे. पण हे काही साधे स्मशान नाही, कारण येथे मृतदेह जमिनीमध्ये पुरलेले नसून उंच डोंगरांच्या कड्यांवर लटकवलेले आहेत. फक्त एका डोंगरावर नाही, तर येथील अनेक डोंगरांवर आणि छोट्या-मोठ्या कड्यांवर अशा शवपेट्या दिसतात—कुठे 100 फुटांवर, तर कुठे 400 फुटांच्या प्रचंड उंचीवर! आता विचार करा, एवढ्या उंचीवर चढणे, तिथे लाकडी फळ्या बांधणे आणि त्यावर शेकडो किलो वजनाच्या शवपेट्या चढवणे… आजच्या आधुनिक काळातसुद्धा हे काम करायचे म्हटले तर खूप अवघड पडेल. मग हजारो वर्षांपूर्वी लोकांनी हे कसे केले असेल? आणि त्याहून मोठा प्रश्न म...

The Last Battle : छत्रपती शिवाजी महाराजांचं अखेरचं युद्ध !

Chatrapati Shivaji Maharaj एका योद्ध्याच्या वेशात कसे दिसत असतील ? कधी विचार तरी केलाय का ? म्हणजे आपण त्यांना पांढरे शुभ्र, स्वच्छ वस्त्र, डोक्यावर मंदिल असे अनेक फोटो, चित्र पाहिलेच असतील. पण मस्तकावर शिरस्त्राण घातलेले युद्धसज्ज वेशात रौद्ररूपी शिवराय पांढऱ्याशुभ्र घोड्यावर बसून या युद्धाचं नेतृत्व करत आहेत, म्हणजे असं अंगावर काटा आणणाराच हा प्रसंग असेल. शिवरायांनी आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात जवळपास ३० युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, असं काही इतिहास अभ्यासकांचं मत आहे. कदाचित हा आकडा जास्तही असू शकतो. पण तुम्हाला माहितीये की, शिवरायांनी आपली अखेरची लढाई कधी लढली होती. आज याच युद्धाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.  हा काळ १६७९ दरम्यानचा… दक्षिण दिग्विजयानंतर शिवरायांच्या एका पूर्वनियोजित योजनेनुसार शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले होते. दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर शंभू राजे खानाच्या फौजेतून माघार घेऊन विजापूरला आले. यावेळी शिवरायांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना सांगितलं की तुम्ही शंभू राजेंना सुखरूप पन्हाळगडावर घेऊन या. याचवेळी शिवराय जालन्यामध्ये मुघलांवर चाल कर...

Adhik Maas : अधिक महिन्यात का आहे तुळशी पूजनाला महत्त्व?

  सध्या अतिशय पवित्र असा अधिक महिना सुरु आहे. १७ मे पासून सुरु झालेला हा अधिक मास १५ जूनपर्यंत असणार आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याला आणि विष्णू उपासना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अनेक लोकं या काळात विष्णुसहस्रनाम पठण आणि तुळशीची देखील पूजा करतात. अधिक महिन्यामध्ये तुळशी पूजन देखील लाभदायक मानले गेले आहे. अधिक महिन्यामध्ये अनेक महिला तुळशीशी संबंधित काही उपाय, पूजा देखील करतात. या महिन्यात धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला पाणी वाहणे, तुळशीसमोर दिवा लावणे आदी उपाय करता. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो. तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते. तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्य...

Health : उभं राहून पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने आहे धोकादायक

  पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. अन्न मिळाले नाही तरी माणूस काही दिवस जगू शकतो, मात्र पाण्याशिवाय माणसं काही तास देखील राहू शकत नाही. कदाचित म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हटले जाते. भरपूर पाणी पिणे हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, चयापचय सुधारते, आणि डिहायड्रेशन होत नाही. निरोगी राहण्यासाठी दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. आपल्या शरीरात 70-75% पाणी आहे आणि ते आपल्या जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे.   मात्र केवळ पाणी पिणे म्हणजेच उत्तम आरोग्य प्राप्त करणे असे नाही. तर पाणी योग्य पद्धतीने पिण्याला देखील महत्त्व आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर नक्कीच त्या पाणी पिण्याचा तुमच्या शरीरावर कोणताच सकारात्मक फायदा होणार नाही, याउलट तुम्हाला त्याचा त्रासच सहन करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्याची कोणती पद्धत आहे. पाण्याचा ग्लास तोंडाला लावूनच तर पाणी प्यायले जाते. मात्र अनेकांना पाणी उभ्याने पिण्याची सवय असते. उ...

Chanakya : घरात पैसा येतो पण टिकत नाही? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी कायम पाला

आजच्या काळात सर्वच लोकं पैसा कमवण्यासाठी अजोड मेहनत घेताना दिसतात. स्त्री पुरुष कोणीही सगळ्यांनाच जगण्यासाठी पैशाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच आपले काम अधिक चांगले आणि चोख करून यश मिळवून अधिक पैसा कसा कमवता येईल याचाच सर्व विचार करत असतात. मात्र अनेकदा खूप मेहनत घेऊनही आपल्याकडे आलेला पैसा टिकत नाही. अशावेळेस आपल्याला समजतच नाही की, आपले नक्की चुकते कुठे. घरात पैसा तर येतो मात्र तो टिकत का नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याच प्रश्नाचे उत्तर आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे. आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यात त्यांचा हातखंडा होता.   आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, व्यक्तीच्या आयुष्यात जी काही गरीब श्रीमंत परिस्थिती आहे ती त्या व्यक्तीच्या कर्मामुळे आहे. ज्या लोकांना मेहनत करण्यास कंटाळा येतो ते लोकं कधीच प्रगती करू शकणार नाहीत आणि असे लोकं कायम पैशाअभावी आपले जीवन व्यतीत करतात. असे लोकं त्यांच्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत. यास्तहीच आपण आपल्या आयुष्यात का...

Recipe : अधिक मासात जावयाची बनवा खुसखुशीत अनारसे, जाणून घ्या सोपी रेसिपी

  सध्या अधिक महिना सुरु असून, प्रत्येक घरामध्ये जावयाचा मानपान करण्याची तयारी सुरु असेल. अधिक महिन्यामध्ये जावयाचे त्याच्या सासुरवाडीला कोडकौतुक केले जाते. कारण मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हा विष्णूचे स्वरूप असतो. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देण्याची परंपरा आहे. या महिन्यात केलेले दान, जप, व्रत, उपवास आणि सेवा यांना अनेक पटींनी पुण्य मिळते असे धर्मशास्त्र सांगते. विशेषतः या महिन्यात जावयाला 33 अनारसे दान देण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचलित आहे. जावयाला अधिक महिन्याचे वाण हे अनारशाचे दिले जाते. अनारसे तांदूळ, गूळ, तूप यांपासून बनवले जातात. हे तीन पदार्थ सात्त्विक, पवित्र आणि शुभ मानले जातात. म्हणूनच अधिक महिन्यात वाण देण्यासाठी अनारसे उत्तम मानले जातात. शिवाय महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुरणाचे धोंडे देखील वाण म्हणून देण्याची प्रथा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अनारसे आणि पुरणाचे धोंडे करण्याची रेसिपी सांगणार आहोत.   साहित्य तांदूळ – १ वाटी, किसलेला गूळ – १ वाटी, तूप – १ चमचा, खसखस, तेल कृती तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवावे. प्रत्येक दिवशी पाणी बदलले तरी च...

Adhik Mahina : अधिकमास केव्हा सुरु होणार? काय आहे या महिन्याचे महत्त्व?

  आज वैशाख अमावस्या असून, उद्यापासून अधिक महिना सुरु होत आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत महत्त्व आहे. याच महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील म्हणतात. या महिन्याला अतिशय शुभ मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार दर अडीच ते तीन वर्षांनी चंद्र आणि सौर वर्षातील काळाचा ताळमेळ बसवण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त अशा तेराव्या महिन्याला अधिक मास असे म्हणतात. साधारणपणे दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. वर्षात १२ महिने असतात मात्र खगोलीय कारणांमुळे सौर वर्ष जे ३६५ दिवसांचे असते आणि चंद्र वर्ष जे ३५४ दिवसांचे असते यातील ११ दिवसांचा फरक दरवर्षी येतो. सलग तीन वर्षे हा फरक ३३ दिवसांचा म्हणजेच संपूर्ण एक महिन्याचा असतो. त्यामुळे दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. अधिकमास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात. हा महिना जवळपास ३० ते ३३ दिवसांचा असल्याने वर्षातील महिने १३ होतात. यामुळे ज्येष्ठ महिना दोनदा गणला जातो.   यंदा अधिक महिन्याची सुरुवात यंदा 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की, 2026 मध्ये दोन ज...