Lord Vitthal : भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात अवतरले तरी कसे?
वर्षभरातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी म्हणजे, आषाढी एकादशी. आषाढ महिन्यात येणारी ही एकादशी म्हणजे, पंढरपूरची वारी. आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी हे समीकरण मागील अनेक दशकांपासून चालत आले आहे. वारीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे वास्तव करणारा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पांडुरंग म्हणजे खुद्द भगवान कृष्ण. दर आषाढी एकादशीला येथे वैष्णवांचा मेळा भरतो आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकं पंढरपूरमध्ये जमतात. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून हे सर्व वारकरी एकादशीला आपल्या देवाचे दर्शन घेतात. मात्र पंढरपूरमध्ये विठ्ठल आले कसे याबद्दल एक कथा सांगितली जाते. आई-वडिलांच्या निस्सीम सेवेमुळे पुंडलिकाच्या भेटीसाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पंढरपुरात आले. मात्र आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त असलेल्या पुंडलिकाने देवाला मी आईवडिलांची सेवा करून झाली की येतो असे सांगून त्यांना उभे राहण्यासाठी एक विट दिली. याच विटेवर देव अजूनही उभा आहे. याची कथा म्हणजे, सहाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील पं...