Posts

Ganpati Bappa : जाणून घ्या गणेश मूर्ती आणि बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भातील ‘या’ खास गोष्टी

Image
श्रावण महिना लागला की, लगबग सुरु होते ती गणेशोत्सवाची. बाप्पा येणार म्हणून अनेक महिने आधी त्यांच्या आगमनाची, स्वागताची तयारी वेग घेऊ लागते. आता आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन आता तोंडावर आले आहे. येत्या सोमवारी अर्थात 14 सप्टेंबर रोजी सगळीकडे बाप्पांचे आगमन होत आहे. त्यामुळे सध्या गणेशाची मूर्ती घेण्यासाठी सगळ्यांचीच लगबग असेल. यंदा बाप्पाची मूर्ती कशी घ्यायची? यावर आता कुटुंबांमध्ये देखील चर्चा रंगत आहे. सोबतच बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त, बाप्पाची पूजा आदी अनेक बऱ्याच विषयांवर घराघरांमध्ये चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला गणेश मूर्तीशी संबंधित काही नियम सांगणार आहोत. सोबतच प्राणप्रतिष्ठेच्या आधी देखील काय करावे काय करू नये हे देखील जाणून घेऊया. (Ganesh Chaturthi) बाजारात आपल्याला गणेशाच्या विविध रूपातील मूर्ती भुरळ घालतात. कुठे बाप्पा गाडीवर बसून गाडी चालवतात, तर कुठे बाप्पा शिक्षक बनलेले दिसतात, कुठे बाप्पा तर आधुनिक कपड्यांमध्ये स्टायलिश वाटतात. एकूणच काय तर काळाप्रमाणे आता गणेशच्या मुर्त्यांमध्ये देखील अनेक बदल होऊ लागले आहेत...

Haritalika Vrat :अखंड सौभाग्यासाठी केल्या जाणाऱ्या हरितालिका व्रताची माहिती

Image
  प्रत्येक स्त्री आपला पती कायम आपल्यासोबत राहावा आणि त्याला उदंड निरोगी आयुष्य मिळावे यासाठी देवाला प्रार्थना करत असते. यासोबतच आपले सौभाग्य अखंड टिकून राहावे यासाठी प्रथेनुसार विविध व्रत वैकल्य देखील मनापासून करते. याच व्रतांमधील एक अतिशय फलदायी आणि मोठे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भाद्रपद महिना लागला की सगळ्यांना चाहूल लागते ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. मात्र बाप्पांच्या आधी येणारा पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे हरतालिका. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिका व्रताचे विशेष महत्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका व्रत साजरे केले जाते. काही भागात या व्रताला हरतालिका तीज असेही म्हटले जाते. (Haritalika Vrat) हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित तरुणी मनासारखा आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. यादिवशी महिला आणि तरुणी रात्रभर जागरण करत झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ खेळतात. हरतालिका तृतीया फक्त महाराष्ट्रात नाही तर इतरही अनेक भागात साजरी केली जाते. नेपाळच्या टेकडी प्रदेशात, उत्तर भारताच्या बहुतांश...

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी नक्की कधी 14 की 15 सप्टेंबर? जाणून घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त

Image
  ज्या सणाची आपण सर्वच वर्षभर अगदी डोळ्यात तेल घालून वाट बघत असतो तो गणेशोत्सव आता अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बुद्धीची देवता, 64 कलांचा अधिपती, प्रथमपुज्य असलेल्या बाप्पांचे आपण सर्वच मोठे भक्त आहोत. लहान असो किंवा मोठे प्रत्येक कामाची सुरुवात गणेशाचे नाव घेऊनच केली जाते. गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्याच जीवनाचा, कुटुंबाचा एक भाग आहेत. आता बाप्पा लवकरच येणार असून, त्यांच्या आगमनाची, स्वागताची सगळीकडे जोरदार तयारी चालू आहे. बाजारपेठा देखील बाप्पांच्या मुर्त्यांची, सजावटीच्या सामानाने भरल्या आहेत. यंदा तर बाप्पा तब्बल 10 दिवसांसाठी आपल्याकडे येणार असून, आपला पाहुणचार घेणार आहेत. (Marathi) पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०६ वाजता सुरू होईल. चतुर्थी तिथी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७:४४ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर, २०२६ रोजी साजरी केली जाईल. १० दिवसांचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशीपर्यंत चालेल. अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करण्यास...

Shravan : स्त्री आणि पुरुष एकसमान असल्याची शिकवण देणारे महादेवाचे अर्धनारीनटेश्वर रूप

Image
  आज श्रावण महिन्यातील चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. श्रावण महिना म्हणजे महादेवांचा महिना. या संपूर्ण महिन्यामध्ये दररोज शिवपूजा केली जाते. पण श्रावण महिन्यातील सोमवारचे महत्व औरच आहे. आजच्या दिवशी भोलेनाथांची पूजा करून त्यांना जवस शिवामूठ म्हणून वाहिली जाते. श्रावणात अनेक ठिकाणी शिव आणि पार्वती यांची सोबत पूजा केली जाते. केवळ श्रावणच नाही तर हिंदू धर्मातील अनेक व्रतवैकल्यांमध्ये शिव आणि पार्वती यांची सोबत पूजा केली जाते. शिव आणि पार्वती हे कायम एकमेकांसोबतच आपण पाहिले आहे. पार्वती मातेने कायम वेगवेगळी रूपे घेऊन शिवांना प्राप्त केले. त्यांना कायम शिव आणि शक्ती नावाने देखील ओळखले जाते. आजवर आपण शिव शंकर यांच्या अनेक रूपांबद्दल अनेक अवतारांबद्दल ऐकले असेल, वाचले असेल, पाहिले असेल. मात्र आज श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महादेवांच्या एका अतिशय आगळ्या वेगळ्या रूपाची माहिती सांगणार आहोत. या रूपाबद्दल जवळपास सर्वांनीच ऐकले असेल, पण त्याची माहिती खूप कमी लोकांना असेल. (Shravan) भगवान शिवांनी पृथ्वीवरील मनुष्याचे रक्षण करण्यासाठी कायम अनेक रूपं घेतली. भगवंताने पृथ्वीवर स्त्री आ...

Shravan : तुम्हाला माहिती आहे का महादेवांचे विविध अवतार?

Image
  सध्या संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घर आपले आराध्य शिवाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. श्रावण महिना म्हणजे शिव पूजेसाठी अतिशय चांगला आणि महत्वाचा समजला जातो. सृष्टीचे संहारक असलेले भगवान शिव चतुर्मासात भगवान विष्णूंच्या निद्राधीन झाल्यानंतर याच सृष्टीचे पालकत्व घेतात आणि तिचा सांभाळ करतात. भगवान शिवाची महती खूपच मोठी आणि अतुलनीय आहे. आजवर आपण कायम भगवान विष्णूंच्या विविध अवतारांबद्दल ऐकत असतो, वाचत असतो, पाहात असतो. मात्र महादेवांनी देखील विविध अवतार घेत आपले कर्तव्य पार पाडले आहे. (Marathi News) महादेवाने देखील काळानुसार अनेक अवतार घेतले. त्यांच्या काही अवतारांना कालभैरव तर काही अवतारांना बीजपत्र असे म्हणतात. आपल्या धार्मिक पुराणांनुसार भगवान शंकराचे एकूण १९ अवतार झाले आहेत. भगवान शिव हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या देवतांपैकी एक आहेत. शिवपुराणानुसार भगवान शंकराचे एकूण १९ अवतार आहेत, तर कूर्म पुराणात त्यांचे २८ अवतार सांगितले आहेत. शिवपुराणात भगवान शिवाच्या विविध अवतारांच्या कथा सांगितल्या आहेत. आज आपण शिवाच्या काही अवतारांबद्दल जाणून ...

Shravan : सूर्यदेवाच्या रथाला असलेल्या 7 घोड्यांचे रहस्य

Image
आज श्रावणातील रविवार. तसे पाहिले तर आपल्या सर्व सामान्य लोकांसाठी रविवार हा आरामासाठी राखीव असतो. या दिवशी शाळा, ऑफिसेसला सुट्टी असल्याने हा दिवस अतिशय संथ असतो. पण हा दिवस धार्मिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचा मानला जातो. याचे कारण म्हणजे यादिवशी सूर्य उपासनेला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्मात सूर्यदेवांना प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जाते, जे आरोग्य, तेज आणि सकारात्मक ऊर्जा देतात. त्यांची पूजा केल्याने आरोग्य लाभतो, असे मानले जाते, आणि सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. धार्मिक मान्यतेनुसार आणि पौराणिक कथांनुसार सूर्यदेव कायम त्यांच्या रथावर स्वार होऊन प्रवास करत असतात. सूर्य देवांचा रथ हा घोड्यांचा असून त्यांच्या रथाला सात घोड्यांची साथ असते. मात्र आपण कधी याचा विचार केला आहे का की सूर्यदेवाच्या रथाला ७ घोडेच का असतात? (lord Surya) पुराणांमधील माहितीनुसार सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात घोडे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आहेत. याचा अर्थ असा की सूर्यदेव सतत गतीमध्ये राहून काळाचे चक्र नियंत्रित करतो. सात घोड्यांच्या रंगात सूक्ष्म फरक आहे,अरुण देव त्यांचा लगाम सांभाळतात. ...