Posts

Babasaheb Ambedkar: म्हणून बाबासाहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत!

Image
  मराठी माणूस आजपर्यंत पंतप्रधान झाला नाही… भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत अनेकदा हे म्हटलं गेलय. तशी मराठी माणसाकडे पंतप्रधान होण्याची संधी अनेकदा आली होती. Yashwantrao Chavan, Madhu Dandavate, Sharad Pawar या नेत्यांकडे ही संधी होती. काही लोकं असंही म्हणतात की जर आज Pramod Mahajan जिवंत असते, तर Narendra Modi पंतप्रधान नसते, तर महाजनच असते. (Babasaheb Ambedkar) पण हा झाला इतिहासाचा भाग… याच इतिहासात असंही एक नाव होतं जे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलं असतं, ते म्हणजे महामानव Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar! अफाट बुद्धिमत्ता, कायद्याचं विलक्षण ज्ञान, अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास, प्रचंड संघर्ष करण्याची तयारी पण तरीही स्वतंत्र भारताचे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत याची खंत आजही अनेकांना वाटते. यामागच कारण त्यांच्याकडे क्षमता नव्हती असं नाही, तर त्या काळाच्या राजकीय लढाईत त्यांच्या विचारांना मोठा विरोध होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारं देशव्यापी राजकीय संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नव्हतं. बाबासाहेबांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाकडे पाहिलं, तर...

Health : पावसाळ्यात सतत सर्दी-खोकला होतोय? मग ‘हे’ उपाय करून पाहाच

Image
सर्वत्र पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पाऊस हा सर्वांनाच आनंद देणारा ऋतू आहे. या पावसावरच आपले मनुष्याचे जीवन पूर्णपणे अवलंबून आहे. असे असले तरी या पावसाचे अनेक दुष्परिणाम सर्व सामान्य लोकांच्या आरोग्यवर मोठ्या प्रमाणात होतात. दमट वातावरण निर्माण होत असल्याने या काळात आजारपण बऱ्यापैकी वाढते. या दिवसांमध्ये विविध साथीच्या रोगांचे प्रमाण देखील मोठ्या स्वरूपात वाढलेले दिसते. सर्दी खोकला तर पावसाळ्यात होणे खूपच सामान्य समजले जाते. पावसाळ्यात प्रत्येक घरात एक तरी रुग्ण सर्दी खोकल्याचा आढळून येतो. आता सर्दी खोकल्यासाठी लगेच डॉक्टरकडे जाणे अनेक लोकं टाळतात आणि घरच्याघरी सोपे आणि सहज करता येणारे उपाय आहे का हे बघता. आज आम्ही तुम्हाला सर्दी खोकल्यासाठी घरच्या घरी करण्याजोगे सोपे उपाय सांगणार आहोत. (Health) वाफ घेणे सर्दी-खोकल्यापासून दूर जायचे असेल तर सर्वात जास्त चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ केल्याने नाक उघडते आणि श्वास घेणे शक्य होते. तुम्ही पाणी गरम करून त्यात टी ट्री ऑईल, लवंग तेल, युकेलिप्टस ऑईल, लेमनग्रास ऑईल, निलगिरी मिक्स करून वाफ घेतली तर सर्दी – खोकला लवकर कमी होण्यास फायदा मिळतो...

History Of Elephants: हत्ती जर वाचले नाहीत तर माणसाची हालत…

Image
जपासून ६ कोटी वर्षांपूर्वी… नाही म्हणजे खरंच ६ कोटी वर्षांपूर्वी तसे पुरावे आहेत, तर ६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक प्राणी राहायचा, Moeritherium नावाचा! असा दिसायला थोडा पाणगेंड्यासारखा होता. तो सस्तन प्राणी होता. उंचीने माणसापेक्षा कमी… तोंड थोडं सोंडेसारखं पुढे आलेलं…दोन मोठे दात आणि हा फक्त आफ्रिकेत होता. म्हणजे एक सिद्ध होतंय की, आफ्रिकेतच हा जन्माला आला होता. आता इतक्या वर्षांनंतर त्याची उत्क्रांती होत गेली. वातावरण बदललं, कोटी वर्ष सरली, प्राण्यांची जीवनशैली बदलली. या Moeritherium ची हाईट वाढली, पाय आणि अंग तगडे झाले… पुढचे जे ओठ होते तीन हलकीशी सोंडेसारखी झाली, दात छोटे पण सुळे झाले आणि मग हा थोडा या रुपात आला… हा होता Palaeomastodon ! पुढे हा प्राणी आफ्रिकेतून बाहेर पडला. प्रवासाला लागला… तो आफ्रिकेतून आशिया खंडात आला, युरोपात गेला. आता पुन्हा काही कोटी वर्ष सरली…आणि दुसरं वातावरण लाभल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी बदल झाले…आणि तो थोडा झाला असा… याला म्हटलं गेलं Gomphothere ! चार सुळे आणि एक सोंड असलेला प्राणी… (History Of Elephants) परत काही कोटी वर्ष उलटली आणि हा प्राणी भाई...

School Bus : पिवळ्या रंगाची स्कुल बस असण्यामागे आहे खास वैज्ञानिक कारण

  आजच्या काळात मुलांना शाळेत घालणे मोठे अवघड काम झाले आहे. मुलांना शाळेत घालतांना आई वडिलांनीच परीक्षा असते. त्यांना कोणत्या शाळेत घालायचे, कोणत्या मीडियममध्ये, कोणत्या बोर्डला असे नानाविध अनेक प्रश्न मुलांना शाळेत घालताना पालकांसमोर असतात. योग्य शाळा निवडल्यानंतर जर शाळा लांब असेल तर मुलांना शाळेत कसे सोडायचे हा प्रश्न देखील असतोच असतो. कारण आज आई आणि वडील दोघेही नोकरी करतात. त्यामुळे मुलांना शाळेत कोण सोडेल हा मोठा प्रश्न असतो. पण यावर एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे, स्कुल बस. स्कुल बस ही संकल्पना काही नवीन नाही. बऱ्याच वर्षांपासून स्कुल बस ही मुलांना शाळेत नेण्याचे आणि घरी सोडण्याची सेवा देत आहे.   मुलांसाठी एक सुरक्षित प्रवासाचं साधन म्हणून स्कूल बसकडे पाहिलं जातं. मुलाला शाळेत जाण्यासाठी स्कूल बस लावल्यास पालकांची देखील मोठी चिंता दूर होते, आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी शाळेत जाण्याचं टेन्शन राहतं नाही. सकाळच्या किंवा शाळांच्या वेळेला जर आपण रोडवर पाहिले तर तर विविध शाळांच्या अनेक बस आपल्याला पाहायला मिळतात. दुरवरूनच आपल्याला समोरून येणारी स्कुल बस ल...

Maharshi Vyas : पांडव आणि कौरव यांच्याशी जवळचा संबंध असलेल्या महर्षी व्यासांची जन्मकथा

आज गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या, अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आध्यात्मिक आणि प्रापंचिक गुरूंचे पूजन केले जाते. आई-वडिलांना मुलांचे पहिले गुरु मानले जाते, त्यामुळे या दिवशी आई-वडिलांचा व मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जातो. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हटले जाते. याच दिवशी द्वापर युगात याच तिथीला महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळेच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. महाभारताचे लेखन केलेले महर्षी व्यास म्हणजे ज्ञानाचा सागर. व्यास ऋषींना भगवान विष्णूचा अवतार देखील मानले जाते. याच महर्षी व्यास यांच्या जन्माची कथा देखील खूपच रंजक आहे. कौरव आणि पांडवांच्या जन्मांच्या अगोदर पासून महाभारतात त्यांचे अस्तित्व आहे. व्यास हे कौरव आणि पांडवांचे आजोबा तर पांडू आणि धृतराष्ट्राचा वडील आहेत.  पितामह भीष्म हे आठ शापित वसुंपैकी एक होते. राजा शंतनू आणि गंगा यांना पुत्रप्राप्तीमध्ये भीष्म झाले होते. पुत्रप्राप्ती होताच गंगा त्यांना मारून टाकायची पण शेवटचा वसू उरला...

Health : शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे जवस; फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल चकित

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य उत्तम राखण्याचे अतिशय महत्त्वाचे आणि कठीण काम आपल्याला पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. अनेकांच्या मते उत्तम आरोग्य तेव्हाच राखले जाते जेव्हा तुम्ही नियमित योग्य व्यायाम करतात. पण निरोगी आरोग्यासाठी जेवढा व्यायाम गरजेचा आहे, त्याहून थोडा जास्त गरजेचा योग्य आणि सकस आहार आहे. जर तुम्ही पौष्टिक आणि सकस आहार घेतला तर नक्कीच तुम्ही निरोगी राहण्याच्या दिशेने वाटचाल करू शकता. आपला भारतीय आहार बऱ्याच लोकांना जड आणि अस्वास्थ्यकर, हानिकारक वाटतो. मात्र हे चुकीचे आहे. कारण भारतासारखा शरीराला आवश्यक असलेल्या सर्व सकस गोष्टींनी समृद्ध आणि परिपूर्ण आहार दुसऱ्या कोणत्याच देशात मिळणार नाही. भारतीयांच्या जेवणाच्या ताटातील तशी बऱ्यापैकी दुर्लक्षित गोष्ट म्हणजे, जवस. तरुण पिढी आणि आजची जेनझी पिढी तर जवस पाहूनच नाक मुरडते. अनेकांना जवस म्हणजे काय? हे देखील माहिती नसेल. आज आपण याच जवस खाण्याचे शरीराला होणारे विविध लाभ कोणते हेच जाणून घेणार आहोत. जवसाला सुपरफूड मानले जाते. त्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जवस अतिशय उष्ण असतात, त्यामुळे खाताना त्याचं प्रमाण नेहमी लक...

Jagannath Puri : जग्गनाथ मंदिरात अविवाहित जोडप्यांना का आहे प्रवेश निषिद्ध?

  काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. चारधामपैकी एक महत्त्वाचे धाम असलेल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दरवर्षी महाप्रभु जगन्नाथ त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना रथामध्ये बसून शहराची सफर घडवली जाते. हा रथोत्सवाचा सोहळा बघणे नशिबाचाच एक भाग समजला जातो. संपूर्ण वर्षभर भाविक या रथयात्रेची वाट बघत असतात. रथयात्रेच्या अनेक दिवस आधीच या भव्य यात्रेची तयारी सुरु होती. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवसापासून ही रथयात्रा आयोजित केली जाते. या काळात भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर विराजमान असतात. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातूनआणि परदेशातूनही भाविक येतात. मान्यता आहे की, या जगन्नाथ रथयात्रेत भाग घेतल्याने १०० यज्ञ केल्यासारखे फळ मिळते. मात्र या जग्गनाथ मंदिराबाबत अनेक मान्यता आणि रीती प्रचलित आहेत. या मंदिरातील अनेक जुन्या परंपरा आजही तेवढ्याच नेटाने पाळल्या जातात. यातलीच एक प्रथा म्हणजे भगवान जग्गनाथ यांच्या मंदिरामध्ये अविवाहित जोडप्यांना जाण्यात बंदी आ...

Ashadhi Ekadshi : ‘या’ चविष्ट रेसिपी करून यंदाची आषाढी एकादशी करा अधिकच खास

दोनच दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. महत्वाची एकादशी असल्याने या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरी उपवास केला जातो. एकादशीचा उपवास असल्याने दोन्ही वेळेस फराळाचेच खाल्ले जाते. आता उपवास म्हटल्यावर साबुदाणा, भगर हेच सर्वात आधी डोळ्यासमोर येते. मात्र आता उपवासाच्या पदार्थांमध्ये देखील खूपच व्हरायटी आलेली दिसते. उपवासाच्या गोष्टींचा वापर करून विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ केले जातात. उपवासाच्या दिवशी दोन्ही वेळेला तेचतेच खाऊन कंटाळा येत असले तर यंदाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नवीन उपवासाच्या रेसिपी ट्राय करू शकता.  उपवासाची बटाटा भाजी साहित्य : 1 चमचा तूप/ तेल, 1/2 चमचा जिरे, 2 चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, उकडून सोलून चिरून घेतलेले बटाटे, भाजलेले शेंगदाण्याचे कुट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर कृती : कढईत तूप किंवा तेल गरम करा आणि त्यात जिरे घाला. जिरे तडतडायला लागले की त्यात हिरवी मिरची-आले पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या. बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट पूड, मीठ घाला आणि सुमारे 4-5 मिनिटे परतून घ्या कोथिंबीर घाला आणि उपवासाची बटाटा भाजी तयार आहे....

Lord Vitthal : भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात अवतरले तरी कसे?

वर्षभरातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी म्हणजे, आषाढी एकादशी. आषाढ महिन्यात येणारी ही एकादशी म्हणजे, पंढरपूरची वारी. आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी हे समीकरण मागील अनेक दशकांपासून चालत आले आहे. वारीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे वास्तव करणारा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पांडुरंग म्हणजे खुद्द भगवान कृष्ण. दर आषाढी एकादशीला येथे वैष्णवांचा मेळा भरतो आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकं पंढरपूरमध्ये जमतात. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून हे सर्व वारकरी एकादशीला आपल्या देवाचे दर्शन घेतात. मात्र पंढरपूरमध्ये विठ्ठल आले कसे याबद्दल एक कथा सांगितली जाते. आई-वडिलांच्या निस्सीम सेवेमुळे पुंडलिकाच्या भेटीसाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पंढरपुरात आले. मात्र आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त असलेल्या पुंडलिकाने देवाला मी आईवडिलांची सेवा करून झाली की येतो असे सांगून त्यांना उभे राहण्यासाठी एक विट दिली. याच विटेवर देव अजूनही उभा आहे.   याची कथा म्हणजे, सहाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील पं...

Rathyatra : भगवान जग्गनाथांच्या मोठ्या डोळ्यामागे आहे एक खास कारण

  सध्या जग्गनाथ पुरीमध्ये महाप्रभु जग्गनाथांचा रथोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात सुरु आहे. पुरी मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत जाते. हे मंदिर भगवान जग्गनाथच्या मावशीचे मंदिर असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात प्रभू काही दिवस थांबतात आणि नंतर थोड्या दिवसांनी पुन्हा आपल्या घरी परतात. या उत्सवात भगवान जगन्नाथ (श्रीकृष्ण), त्यांचे बंधू बलभद्र (बलराम) आणि बहीण सुभद्रा हे तीन स्वतंत्र रथांमध्ये विराजमान होऊन गुंडिचा मंदिरात जातात. हिंदू मान्यतेनुसार, तिन्ही रथांपैकी कोणत्याही एका रथाची दोरी हाताने ओढल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते. आपण जर पुरीच्या जग्गनाथ मंदिरातील महाप्रभूंची मूर्ती पाहिली तर आपल्याला ही मूर्ती जरा अपूर्ण वाटते आणि मूर्तीचे डोळे देखील मोठे आहेत. या दोन्ही गोष्टींमागे एक खास शास्त्र सांगितले जाते ते काय पाहूया.   भगवान जगन्नाथांचे मोठे डोळे त्यांच्या सर्वज्ञता, ज्ञान, करुणा आणि दया यांचे प्रतीक मानले जातात. यातून भगवान सर्वकाही पाहतात. या मोठ्या डोळ्यांनी, जगन्नाथजी त्यांच्या भक्तांना आणि त्यांच्या भावनांना मनापासून पाहू शकतात...