Posts

Showing posts with the label Latest Marathi Headlines

Ekadshi : भाद्रपदामध्ये येणाऱ्या परिवर्तिनी एकादशीचे महात्म्य

Image
  श्रावणानंतर येणार भाद्रपद महिना देखील हिंदूंसाठी अतिशय महत्वाचा असतो. याच महिन्यात गणेशोत्सव, राधाराणी अष्टमी, पितृपक्ष येतात. याच भाद्रपद महिन्यात येणाऱ्या एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. भाद्रपदामध्ये शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी किंवा जलझुलणी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसे पाहिले तर वर्षभरामध्ये २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्व असते. असेच महत्व परिवर्तिनी एकादशीचे देखील आहे. जाणून घेऊया याच एकादशीबद्दल. (Bhadrapad) Top stories पंचांगानुसार, परिवर्तिनी एकादशी तिथीची सुरुवात बुधवार, ३ सप्टेंबर रोजी पहाटे ३.५३ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.२१ वाजता होईल. उद्यतिथीनुसार परिवर्तिनी एकादशीचे व्रत बुधवार, ३ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते, यामुळे भक्तांची पाप नष्ट होतात आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. परिवर्तिनी एकादशीला पद्मा एकादशी, पार्श्व एकादशी किंवा जयंती एकादशी असेही संबोधले जाते. पुराणानुसार, भगवान विष्णू...

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

Image
  सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे गाजत आहे. मुंबईच्या दादरमधील कबुतरखान्यावरील बंदी उठवण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोकावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर ही बंदी उठवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. दिवसाचा ठराविक वेळ कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. याच मागणीसंदर्भात न्यायालयाने निर्णय देताना आपला याआधीचा निर्णय कायम ठेवला असून तुर्तास तरी कबुतरखान्यांवरील बंदी कायम राहणार आहे. (Marathi) तर आता दुसरीकडे दिल्लीमधील भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ८ आठवड्यात या सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवावे आणि या कारवाईमध्ये कोणी अडथळा आणल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ( Marathi News ) दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते....

Kolhapuri Chappal: राज्या-महाराजांच्या पायाची शोभा वाढवणाऱ्या कोल्हापुरी चप्पलेचा जाज्वल्य इतिहास

Image
  सध्या संपूर्ण जगात कोल्हापुरी चप्पल कमालीची गाजत आहे. इटलीच्या प्रादा या ब्रँडने त्यांचे समर कलेक्शन लाँच केले. या दरम्यान झालेल्या रॅम्प वॉकमध्ये कोल्हापुरी चप्पल घातलेल्या मॉडेल्सने चांगलेच लाइमलाईट मिळवले. या मॉडेल्सने घातलेल्या कोल्हापुरी चप्पलला जगभरातून कमालीचे प्रेम मिळत आहे. मात्र असे असूनही प्रादा ब्रँड आणि कोल्हापुरी चप्पल यावरून एक मोठा वादंग निर्माण झाला आहे. झाले असे की, प्रादाने कोल्हापुरी स्टाईलने तयार करण्यात आलेल्या चप्पला त्यांच्या मॉडेल्सला घालायला लावल्या आणि कंपनीकडून याचे कोणतेच श्रेय कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांना दिले नाही. यावरूनच एक अनोखा वाद रंगला आहे. कोल्हापूरच्या कारागिरांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (Kolhapuri Chappal) Top Marathi Headlines कोल्हापूरची चप्पल ही फक्त कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्राची आणि पर्यायाने भारताची शान आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेली एक देणगी आहे. सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा हीच या चपलांची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापुरी चप्पला म्हणजे भारतीय परंपरा आणि...