Posts

Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज

Image
  मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतामध्ये नानाविध प्रकारचे असंख्य मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे भारतातील सर्वच मंदिरांची जगामध्ये भरपूर चर्चा होताना दिसते. आपल्याकडील प्रत्येक मंदिर हे खूपच खास आणि वैशिट्यपूर्ण आहे. प्रत्येक पुरातन मंदिराला एक खास पौराणिक इतिहास देखील आहे. याचमुळे या मंदिरांचे महत्त्व अधिकच वाढते. अनेक मंदिरं तर त्यांच्या रहस्यमयी गोष्टींसाठी चर्चेत येत असतात. जुन्या मंदिरांबद्दल बोलायचे झाले तर या मंदिरांचे बांधकाम आणि अचंभित करणाऱ्या गोष्टी कायम सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यातलेच एक प्रसिद्ध आणि आकर्षक मंदिर म्हणजे, जाटोली शिव मंदिर. (Lord shiva) Top Marathi Headlines भारताच्या सर्वात उंच टोकावर अर्थात हिमाचल प्रदेश राज्यात हे जाटोली शिव मंदिर स्थित आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर रहस्यमयी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य आहे ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. जटोली शिव मंदिर, जे आशियातील सर्वात उंच शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात आहे. या मंदिराच्या दगडांवर आघात केल्यास डमरूसारखा आवाज ये...

Gajalakshmi : घरात गजलक्ष्मीची पूजा केल्याने होतात ‘हे’ लाभ

Image
  प्रत्येक व्यक्तीला जीवनात आर्थिक भरभराट हवीच असते. त्यासाठीच तो कायम मेहनत घेतो आणि प्रयत्नही करत असतो. मात्र मनुष्याच्या प्रयत्न आणि मेहनतीसोबतच दैवी आशीर्वाद देखील फार आवश्यक असतो. त्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. आता आर्थिक प्रगतीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना हिंदू धर्मामध्ये धनाची देवता म्हणून ओळखले जाते. यांची विधिवत पूजा केल्यास नक्कीच त्यांची कृपा होते आणि आर्थिक सुबत्ता लाभते. मात्र जर गजलक्ष्मीची पूजा केली तर त्याचा अधिक फायदा होतो. आजवर आपण कमळात बसलेली, उभी असलेली लक्ष्मी, खाली बसलेली लक्ष्मी अशा विविध लक्ष्मीच्या रूपांची पूजा करत असतो. मात्र यांसोबतच गजलक्ष्मीची पूजा करणे देखील लाभदायक आहे. (Gajlakshmi) Marathi News गजलक्ष्मी म्हणजे हत्तीवर आरूढ झालेली लक्ष्मी. गजलक्ष्मी ही ऐरावत हत्तीवर स्वार असते तर हत्ती मुखात कलश घेऊन उभा असतो. देवीच्या या स्वरूपातील लक्ष्मीला गजलक्ष्मी असे म्हटले जाते. तुम्ही घरात सुख-शांती नांदण्यासाठी आणि लक्ष्मीचा आशिर्वाद सैदव राहण्यासाठी देवी गजलक्ष्मीचा फोटो ठेवून त्याची पूजा ...

Technology : कधी आणि कोणत्या स्थितीत सोशल मीडियावरील कंटेट सरकारकडून ब्लॉक केला जातो?

Image
  Technology : सोशल मीडियाचा वापर आजच्या डिजिटल युगात खूप प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर लोक आपले विचार, माहिती, व्हिडिओ, फोटो आणि लेख शेअर करतात. मात्र, काही वेळा सरकारकडे काही कंटेंट अशा प्रकारे येते ज्यामुळे सामाजिक तणाव, असुरक्षितता किंवा कायद्याचे उल्लंघन होऊ शकते. अशा परिस्थितीत सरकारकडे डिजिटल कंटेंट ब्लॉक करण्याचा अधिकार असतो, आणि यासाठी विशेष कायदे आणि नियम तयार केलेले आहेत. International News ब्लॉक होण्याची प्रमुख कारणे सरकार सोशल मीडियावर कंटेंट ब्लॉक करण्याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक सुरक्षेची धोकादायक माहिती, अश्लीलता, त्रस्त करणारी माहिती,फेक न्यूज, हिंसक प्रचार किंवा धर्मीय आणि जातीवर्गीय भावनांचा भडकाव होणे. उदाहरणार्थ, जर एखाद्या पोस्टमुळे देशातील शांतीत गडबड, दंगली, आतंकवादाची भीती किंवा हिंसक क्रियाकलापांना प्रोत्साहन मिळाले, तर अशा कंटेंटवर तातडीने कारवाई केली जाते. कायदे आणि नियम भारतामध्ये IT Act, 2000 आणि त्यातील Section 69A ही सरकारकडे कंटेंट ब्लॉक करण्याची अधिकृत अधिकार देणार...

Ramayana : रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली कुठे?

Image
  दसरा, विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच विजय. दृष्ट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणजे विजयादशमी. या दिवसाला अनेक अर्थाने महत्व आहे. आदिशक्तीच्या महिषासुराचा वध याच दिवशी केला. रामाने देखील युद्धात विजयादशमीलाच रावणाचा वध केला. याच मुले दसऱ्याचे दुसरे नाव विजयादशमी असे असावे. विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. या दिवसाचे रामायणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेताना रामाची हनुमान आणि वानरसेनेशी भेट झाली. सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाशी युद्ध करून पुन्हा सीतेला मिळवण्यासाठी याच वानरसेनेने मदत केली. मुख्य म्हणजे एकीकडे रावणासारख्य बलाढ्य राक्षसाची असुरी सेना, तर दुसरीकडे युद्धाचे कोणतेही प्रशिक्षण नसलेली आणि पहिल्यांदाच एवढे मोठे युद्ध करणारी रामाची वानरसेना. रामाची ही वानरसेना जवळपास एक लाखाच्या आसपास होती. (Navratri) Top stories रामाला युद्धात प्रत्येक वेळी मदत करण्यासाठी वानर सेना तत्पर होती. अगदी सीतेचा शोध घेण्यापासून ते तिला संदेश देण्यापर्यंत, रावणाशी चर्चा करण्यासाठी देखील याच वानर सेनेने मोठी भूमिका बजावल...

Hindu Festival : हिंदू सणांवेळी मास-मीटची दुकाने बंद करायचा हा मुघल बादशाह

Image
  Hindu Festival :  मुघल साम्राज्य हे भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विविधतेने समृद्ध राज्य होते. या काळात मुस्लिम सम्राट असले तरी त्यांनी हिंदू लोकांच्या धार्मिक भावना आणि सणांचे महत्त्व जाणून त्यांचा आदर केला. त्यातीलच एक उल्लेखनीय निर्णय म्हणजे, हिंदू सणांच्या दिवशी मास-मांस विक्री करणाऱ्या दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देणे. या निर्णयामुळे हिंदू लोकांना सणाच्या काळात उपास्याची आणि धार्मिक कृतीची सोय झाली. Top stories इतिहासकारांच्या नोंदींनुसार, अकबर हा मुघल सम्राट आपल्या राज्यातील सर्व धर्मांप्रती संवेदनशील होता. त्याने विविध धर्मातील लोकांशी संवाद साधला आणि त्यांची परंपरा जाणून घेतली. हिंदू सण, जसे की दिवाळी, होळी, नवरात्री, आदि या काळात लोक उपास करीत किंवा विशेष धार्मिक विधी करीत असत. त्या काळात मास-मांस विकणे किंवा त्याचा वापर करणे अनेक धार्मिक विश्वासांनुसार वर्ज्य मानले जात असे. अकबराने या धार्मिक भावना जपून सणांच्या काळात मास-मांस विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले. हा निर्णय केवळ धार्मिक भावना जपण्यासाठी नव्हे, तर सामाजिक शांतता राखण्यासाठीही महत्त्वाचा होता...

Heart Health : हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी कोणत्या दररोज सवयी फॉलो केल्या पाहिजेत?

Image
  Heart Health : हृदय हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या हृदयाचे आरोग्य नीट राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. Latest Marathi News १. संतुलित आहार घ्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहार हा महत्त्वाचा घटक आहे. दररोज आहारात ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, सुकामेवा आणि कमी फॅट असलेले प्रथिनयुक्त पदार्थ यांचा समावेश असावा. तळलेले, जास्त तेलकट, जास्त साखर असलेले पदार्थ टाळावेत. विशेषतः फास्ट फूड, कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ हृदयावर विपरीत परिणाम करतात. दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणेही महत्त्वाचे आहे. २. नियमित व्यायाम करा दररोज किमान ३० मिनिटे चालणे, धावणे, सायकलिंग किंवा योगासन करणे हृदयासाठी उपयुक्त ठरते. शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होते. बसून राहण्याची सवय टाळा आणि दिवसभर थोडीफार...

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

Image
  उत्तर कोरिया आणि तिथला हुकुमशहा किम जोंग उन हे जगासाठी आकर्षणाचा विषय आहेत. किम कधी कुठला निर्णय जाहीर करेल याचा नेम नसतो. पण त्यानं जाहीर केलेले निर्णय हे, उत्तर कोरियामध्ये त्याची किती दहशत आहे, याचे प्रतिक असतात. मात्र यावेळी किमनं जे आदेश जाहीर केले आहेत, त्यामुळे किमनं अप्रत्यक्षपणे अमेरिका आणि युरोपियन देशांना इशारा दिला आहे का, हा प्रश्न विचारला जात आहे. कारण किम जोंग उन याने आपल्या देशातील नित्याच्या काही शब्दांवर बंदी घातली आहे. यामध्ये आईस्क्रीमचा समावेश आहे. शिवाय हॅम्बर्गर आणि कराओके या मनोरंजन साधनाच्या नावावरही किमनं बंदी घातली आहे. (North Korea) International News किमच्या मते, आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके हे पाश्चात्य शब्द आहेत. यामुळे उत्तर कोरियामधील संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे किमनं आता हे तीन शब्द बोलण्यास उत्तर कोरियामध्ये बंदी घातली आहे. अर्थात किमचा बंदीचा आदेश तोडणा-याला काय शिक्षा होते, हे उघड आहे, त्यामुळे त्यानं त्याचा हा आदेश तोडणा-याला काय शिक्षा करणार हे जाहीर केलेले नाही. पण किमचा हा आदेश आल्यावर चर्चा सुरु झाली आहे. आईस्क्रीम, हॅम्ब...

Uttarakhand : हरिद्वार अर्धकुंभमेळ्याचा खर्च उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांना !

Image
  हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ असे होणारे हे कुंभमेळे ज्योतिषशास्त्रीय गणनेवर आधारित असतात. पवित्र नद्यांच्या संगमस्थानावर त्यांचे आयोजन केले जाते. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यामध्ये तर जागतिक स्वरुपाचे विक्रम झाले. संपूर्ण जगभरातून भाविक या महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये आले होते. आता 2027 मध्ये उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अर्धकुंभमेळा होणार आहे. (Uttarakhand) Latest Marathi News या अर्धकुंभ मेळ्याची तारीख नुकतीच साधुसंत आणि आख्याड्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. 6 मार्च 2027 रोजी महाशिवरात्री उत्सवाच्या पवित्र दिवशी या अर्धकुंभ मेळ्याचा प्रारंभ हरिद्वारमध्ये होणार आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद वर्धन यांनी हरिद्वारच्या प्रमुख देवता मायापूर, देवी मायादेवी मंदिर आणि भैरव मंदिरात पूजा करुन या अर्धकुंभ मेळा आणि लवकरच सुरू होणाऱ्या छडी यात्रेची तारीख जाहीर केली. यासोबत हरिद्वारमध्ये होणाऱ्या या मेळ्यामध्ये महत्त्वाच्या दोन घोषणा करण्यात आल्या, त्यामुळे सर्वत्र अर्धकुंभ मेळा आयोजनात महत्त्वाची भूमिका पार...

Asha Bhosle : ‘मेलोडी क्वीन’ आशा

Image
  आज संगीत क्षेत्रातील अतिशय बुलंद आवाज असणाऱ्या आशा भोंसले यांचा आज ९२ वा वाढदिवस. आशा भोंसले यांच्याबद्दल काय आणि किती सांगावे असे होते. भारतीय संगीतसृष्टी या नावाशिवाय कायम अपूर्ण राहील असे महान कर्तृत्व आशा भोंसले यांनी गाजवले. आजही वयाच्या ९२ वर्षी त्यांचा उत्साह, एनर्जी, काम करण्याची इच्छा भल्याभल्याना मागे टाकताना दिसते. (Marathi News) आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. ‘मेलोडी क्वीन’ नावाने ओळखल्या जाणारी आशा ताईंनी १००० हून अधिक चित्रपटांमध्ये २० भाषांमध्ये १२००० हून अधिक गाणी गेली आहेत. हिंदी मराठीच नाही तर बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन या भाषांमधील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली. त्यांनी विविध जॉनर्सची हजारो गाणी गायली आहेत. आज आशाताईंच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात… (Asha Bhosle Birthday) आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांचे पहिले गाणे गायले. या पहिल्या गाण्याचा देखील एक किस्सा होता. हा किस्सा आशा ताईंनी...