Posts

Showing posts from August, 2024

मुंबईतील ‘या’ आहेत प्रसिद्ध दहीहंडी

Image
  यावर्षी आपण भगवान श्रीकृष्णाची ५२५१ वी जयंती साजरी करत आहोत. दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला दहीहंडीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ ऑगस्ट रोजी सगळ्यांनी जल्लोषात कृष्ण जन्म साजरा केला. मध्यरात्री १२ ला श्रीकृष्णाला पाळण्यात टाकून त्याचा जन्मोत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदाने आणि प्रेमळ भावनेने केला. marathi news . आता आज २७ ऑगस्ट रोजी सगळीकडे धूम असणार आहे ती दहीहंडीची. सर्व गोविंदांना आज जास्तीत जास्त दहीहंडी कशा फोडता येतील याचाच विचार असणार आहे. तसे पाहिले तर दहीहंडी भारतात अनेक ठिकाणी साजरी केली जाते. मात्र मुंबईमध्ये या दिवशी एक वेगळेच वातावरण असते. हवेमध्ये एक नवा जल्लोष, आनंद, उत्साह असतो. मुंबईमधील दहीहंडी ही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अतिशय उंच उंच दहीहंडी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात. इथे दहीहंडी फोडण्यासाठी अतिशय प्रसिद्ध पथकं आहेत. ज्यांच्यामध्ये सर्वात उंच दहीहंडी फोडण्यासाठी नेहमी चढाओढ पाहायला मिळते. आज सर्वच मुंबईतील पथकं या दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. खास या दहीहंडी पाहण्यासाठी

महाराजांचा पूल कोसळल्यानंतर किरण मानेंची संतप्त पोस्ट

Image
  अभिनेते किरण माने हे अभिनयासोबतच राजकारणात देखील सक्रिय आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्या राजकारणातील प्रवासाला सुरुवात केली आहे. किरण माने यांचा अभिनयाचा प्रवास देखील चढ उतारांनी भरलेला होता. अचानक त्यांना एका मालिकेतून काढण्यात आले आणि ते खूपच प्रकाशझोतात आले. त्यानंतर बिग बॉस मराठीने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. Top stories. उत्तम आणि प्रभावी अभिनयासोबतच किरण माने हे त्यांचे विचार परखडपणे मांडण्यात देखील प्रसिद्ध आहे. मुद्दा कोणताही असो, त्याला सोशल मीडियावर ते अतिशय उत्तम पद्धतीने मुद्देसूद मांडताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट देखील कमालीच्या गाजतात. अशातच पुन्हा एकदा किरण माने यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यामुळे त्यांचा रोष व्यक्त केला आहे. किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना

उत्तराखंडची संरक्षक धारी देवी, दिवसातून 3 वेळेस बदलते रुप

Image
  उत्तराखंडमध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथसह काही प्रमुख प्रसिद्ध मंदिरे आहेत. यापैकीच एक मंदिर म्हणजे धारी देवीचे आहे. याचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि अनोखा आहे. Dhari Devi Temple  : भारतात अनेक प्रसिद्ध आणि अद्भूत मंदिरे आहेत. काही मंदिरे मानवनिर्मित तर काही स्वयंभू आहेत. भारतातील काही मंदिरे आपल्या इतिहास आणि अद्भूत कथांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. अशातच उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथसह धारी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. धार्मिक मान्यतेनुसार, धारी देवीला उत्तराखंडची संरक्षक मानले जाते. धारी देवी उत्तराखंडमधील चार धामांचे संरक्षण करते. उत्तराखंडातील धारी देवी मंदिर देशातील 108 शक्ती स्थळांपैकी एक आहे. याच मंदिराबद्दल सविस्तर जाणून घेऊया… Marathi news धारी देवी मंदिराचा इतिहास पौराणिक कथेनुसार, धारी देवीचे मंदिर उत्तराखंडात आलेल्या पुरात वाहून गेले होते. यामध्ये देवीची मुर्ती देखील वाहून गेली होती. पण पाण्याच्या प्रवाहातील मुर्ती एका डोंगराला आदळली गेल्यानंतर तेथेच थांबली. असे म्हटले जाते की, मुर्ती ज्या ठिकाणी थांबली त्यानंतर त्यामधून एक दैवीय आवाज ऐकू आला होता. यानंतर धारो गावातील नागरिकांन

रात्री झोपताना चुकूनही जवळ ठेवू नका या वस्तू, होईल मोठे नुकसान

Image
  रात्री झोपताना वास्तुच्या नियमांनुसार काही गोष्टींचे पालन करावे. यामुळे आयुष्यात नेहमीच आनंदाचे क्षण येतात. याशिवाय झोपेत अडथळाही निर्माण होत नाही. Marathi news. Vastu Tips  : वास्तुनुसार आपण ज्या ठिकाणी राहतो, उठतो-बसतो अथवा झोपते त्याचा परिणाम आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. अशातच वास्तुनुसार, रात्री झोपताना काही गोष्टी स्वत: जवळ कधीच ठेवू नयेत. खरंतर असे मानले जाते की, रात्री झोपताना आपल्या आजूबाजूला ठेवलेल्या काही गोष्टी झोपेत अडथळा आणू शकतात. अथवा वास्तुदोषाचा देखील सामना करावा लागू शकतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया… झोपताना इलेक्ट्रिक वस्तू जवळ ठेवू नका वास्तुनुसार, खोलीतील वातावरण उत्तम राहण्यासाठी सर्वप्रथम झोपेच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नये. स्मार्टफोन, टॅबलेट अथवा लॅपटॉपसारख्या वस्तूंच्या माध्यमातून चुंबकीय विकिरण बाहेर पडतात. यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. अशातच झोपताना इलेक्ट्रिक वस्तू काही अंतरावर ठेवाव्यात. झोपताना पुस्तक अथवा कागदपत्र जवळ नको वास्तुनुसार, झोपण्याच्या ठिकाणी पुस्तके अथवा कागदपत्रे ठेवू नयेत. याशिवाय बिल्स किंवा कागदावर लिहिले

सुरेखा कुडची यांची जान्हवीबद्दल संतापजनक पोस्ट

Image
  मराठी बिग बॉस हा शो सध्या खूपच रंगात आला आहे. रोजच विविध टास्क आणि भांडणांमुळे या शोमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत येत असतो. सोशल मीडियावर या शोच्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मराठी बिग बॉसचे हे पाचवे पर्व खऱ्या अर्थाने वेगळे ठरताना दिसत आहे. अनेक दिग्गज आणि नावाजलेले कलाकार यावेळी घरात उपस्थित आहे. आणि यांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करतोय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख. Top stories. रितेश पहिल्यांदाच बिग बॉसचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. बिग बॉस सुरु होऊन आता चौथा आठवडा लागला आहे. त्यामुळे आता घाबरतील सगळ्याचे खरे रूप समोर यायला सुरुवात झाली आहे. घरातील सदस्यांमध्ये आता दोन ग्रुप तयार झाले असून, ते ग्रुप सतत एकमेकांवर शाब्दिक हल्ला करताना दिसतात. यातील ग्रुप ‘ए’मध्ये सर्वाधिक तोंडाळ आणि भांडकुदळ सदस्य पाहायला मिळत आहे. अशातच आता घरामध्ये जान्हवीने पुन्हा एकदा तिचे तोंड उघडले आहे. जान्हवीने तिथे दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंगळवारच्या झालेल्या भागामध्ये ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क खेळ चालू होता. यादरम्यान निक्की आणि अरब

अजित पवार – हताश की हुशार?

Image
  तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू व्हायला हवी होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या, परंतु कायदा व सुव्यवस्था तसेच अतिवृष्टीचा हवाला देत महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीला काहीसा वेळ मिळाला आहे. Top stories . समजा निवडणुका लागल्या असत्या तर सगळ्या पक्षांनी कुठल्या भूमिका घेतल्या असत्या? आताच्या घडीला पाहिलं तर भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांची भूमिका पक्की दिसते. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश धुऊन काढण्यासाठी भाजपला विधानसभा निवडणुकांची प्रतीक्षा आहेस तर त्याच लोकसभा निवडणुकीत हाताला लागलेले यश आणखी वाढवून राज्याची सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस उतावीळ झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये चाललेली लठ्ठलठ्ठी पाहून त्यानुसार निर्णय घेण्याचे शरद पवार यांनी ठरविलेले दिसते, तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे अडून बसले आहेत. (Ajit Pawar VS Sharad Pawar) या सर्वांमध्ये सगळ्यात गोंधळलेला आणि कुठल्या द

जाणून घ्या मिलिंद गवळींच्या आठवणींचा अमूल्य ठेवा

Image
   Marathi News मराठी टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते?. या मालिकेने अनेक कलाकारांना एक नवीन ओळख मिळवून दिली. मराठी सिनेविश्वात ९० चा आणि २००० चा काळ गाजवणारे अनेक कलाकार या मालिकेत अभिनय करताना दिसत आहे. याच कलाकरांना एक नवीन ओळख आता मिळाली आहे. यातलेच एक अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. ‘अनिरुद्ध’ या मालिकेतील नावाने ओळखले जाणारे अभिनेते मिलिंद गवळी नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. मिलिंद यांना या पिढीने आता या मालिकेत जरी बघितले असले तरी, ते मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय दिग्गज आणि जुने अभिनेते आहेत. मिलिंद यांनी ९० आणि २००० च्या दशकात मराठी आणि हिंदीमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक हिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांचे अनेक सिनेमे हे तुफान गाजले आहेत. बहुतकरून ग्रामीण भागात तर त्यांचे आजही असंख्य चाहते आहेत. मिलिंद यांचे सिनेमे ग्रामीण भागात जत्रेत दाखवले जायचे. त्यांचे सिनेमे जत्रेत तुफान चालायचे. त्यांना भेटायला, त्यांची सही घ्यायला, त्यांना पाहायला खूपच गर्दी व्हायची. अगदी रांग लावून सर्व प्रेक्षक त्यांना भेटायचे. मिल

निक्कीने छोटा पुढारीला केले ‘किस’

Image
   Top stories बिग बॉस सुरु झाल्यापासून रोजच या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये दोन गट पडले आणि जोरदार भांडणं पाहायला मिळाली. यासोबतच अगदी पहिल्याच आठवड्यात घरामध्ये मध्ये प्रेमाचे वारे देखील वाहू लागले. आता बिग बॉस आणि प्रेमप्रकरणं हे जणू समीकरणच बनले आहे. प्रत्येक सीझनमध्ये एक तरी जोडी हे बिग बॉसचे घर जमवताना दिसते. आता या पाचव्या पर्वाला सुरु होऊन एवढे काहीच दिवस होत नाही तोवर घरात तिसऱ्या जोडीबद्दल चर्चांना उधाण आले आहे. सर्वात आधी या घरात निक्की आणि अरबाज यांच्या जोडीबद्दल चर्चा सुरु होती. मग वैभव आणि इरिना ही जोडी प्रकाशझोतात आली. आता मात्र निक्की आणि छोटा पुढारी यांची जोडी जमते की काय असे वाटत आहे. अहो असे वाटायला कारण देखील तसेच आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये निक्की चक्क छोटा पुढारीला किस करताना दिसत आहे. घरात आल्यापासून छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरवडेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. घन:श्यामचा खेळ, त्याचे बोलणे, त्याची वक्तव्यं कायम त्याला चर्चेत ठेवताना दिसत आहे. नुकताच घ

जान्हवीने केला वर्षा उसगांवकरांचा अपमान

Image
    Latest Marathi News बिग बॉस मराठीमध्ये रोजच नवनवीन ड्रामा, भांडणं, वाद पाहायला मिळत आहे. पहिला आठवडा निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यात झालेल्या भांडणाने गाजला. हा वाद इतका मोठा होता की, संपूर्ण महाराष्ट्राने, रितेश देशमुखने निक्कीला चांगलेच सुनावले. त्यानंतर आता निक्की जरा शांत झाली आहे. मात्र ती शांत झाली असली तरी तिच्या ग्रुपची तिची मैत्रीण जान्हवी किल्लेकर मात्र निक्कीची जागा भरून काढत आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी ही वर्षा उसगांवकर यांच्याशी जोरदार भांडण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी जान्हवीला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. जान्हवीने घरात आल्यानंतर सूरज चव्हाण, आर्या, अभिजीत सावंत आदी सदस्यांची भांडणं केली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, जान्हवी आर्याला “निर्लज्ज…” म्हणत गार्डन परिसरातून जात असते. तिथे वर्षा उसगांवकर पाठमोऱ्या बसलेल्या असतात. त्यांना असे वाटते की सवयीप्रमाणे जान्हवीने त्यांच्याशी पुन्हा भांडण करायला सुरुवात केली. मात्र जान्हवी त्यांचा गैरसमज दूर न करता थेट वर्षाजींशी

मेघा धाडे जान्हवीवर संतापली

Image
  मराठी बिग बॉस सुरु होऊन आता २ आठवडे पूर्ण होतील. अशातच रोज बिग बॉस विविध कारणांमुळे लाइमलाईट्मधे येत आहे. घरातील भांडणं, टास्क यांसोबतच सदस्यांमधील जवळीक देखील चर्चेचा विषय ठरत आहे. शोच्या पहिल्याच दोन दिवसात घरात निक्की विरुद्ध वर्षा उसगांवकर असे दोन वेगळे गट पडले. पहिला गट निक्की, जान्हवी किल्लेकर, अरबाज, वैभव, घनश्याम दरवडे यांचा तर वर्षा उसगांवकर, आर्या, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत यांचा दुसरा गट पाहायला मिळाला. तर पॅडी, इरीना आणि सूरज यांनी दोन्ही गटातील सदस्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. Latest Marathi News. आताच टेलिकास्ट झालेल्या एका भागामध्ये वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळाले. या भांडणादरम्यान जान्हवी वर्षा उसगांवकरांना बरेच अपशब्द बोलली आणि त्यांचा अपमान देखील केला. हा भाग पाहिल्यानंतर तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी तर तिला घरातून बाहेर काढण्याची मागणी देखील केली. झाले असे की, जान्हवी वर्षा उसगांवकरांबरोबर भांडण करताना त्यांच्या पुरस्कारांबाबत बोलली ती म्हण