Posts

Showing posts from May, 2024

जपानमुळे व्हेल माशाच्या अस्तित्वावरच संकट

Image
  बुरी डायकोन ,  शिओयाकी सकाना ,  कात्सुओ-नो-टाटाकी ,  सनमा-नो-नित्सुके ,  मिसो-झुके सॅल्मन ,  नानबान-झुक ,  अजी फुराई ,  शिरासू डोनबुरी ,  टेकचिरी ,  नामेरू ,  हिमोनो    ही कसली नावं आहेत, हा प्रश्न पडला असेल तर ही नावं आहेत, जपानमधील खाद्य पदार्थांची.  जपानमध्ये माशांचा वापर करुन हे पदार्थ बनवले जातात.   हे सर्वच पदार्थ जपानच्या सर्वच भागात प्रसिद्ध आहेत. विशेषतः यातील काही पदार्थ हे व्हेल माशाच्या मासांपासून तयार केले जातात.   जगातील सर्वात मोठ्या माशांमध्ये या व्हेल माशाचा समावेश होतो. हा मासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानला जातो. जन्माच्या वेळीही ,  निळा व्हेल इतर प्राण्यांपेक्षा मोठा असतो. फक्त हा मासाच काय पण या ब्लू व्हेल माशाचे पिल्लूही सर्वात मोठे असते, त्याचे वजन ८८०० पौंड म्हणजेच चार हजार किलोच्या आसपास असते. (Japan Whale Fish) या एवढ्या अवाढव्य व्हेल माशाच्या मासांचे पदार्थ जपानमध्ये एवढे खाल्ले जात आहेत की, समुद्रातील हा सर्वात मोठा मासाच नष्ट होईल की काय ? अशी भीती पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. जपानमध्ये या व्हेल माशाच्या मासांचे पदार्थ मोठ्याप्रमाणात विकले ज

राष्ट्रध्यक्षांच्या निधनानंतर इराणमध्ये आनंदोत्सव का झाला ?

Image
  इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री प्रवास करीत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून या अपघातात राष्ट्राध्यक्ष रायसी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला.  ही बातमी आली आणि जगभर हळहळ व्यक्त करण्यात आली.  मात्र ज्या इराणचे राष्ट्राध्यक्ष विमान अपघातात गेले, त्या इराणमध्ये काय परिस्थिती होती, हे जाणून घ्याल तर आश्चर्यचकीत व्हाल.  कारण इराणच्या काही भागात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या मृत्यू झाल्याची बातमी आली आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  इराणमध्ये अनेक ठिकाणी लोक उत्सव साजरा करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत.  राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यानं या नागरिकांनी आनंद व्यक्त करीत फटाकेही फोडले आहेत. (Iran)   इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे निकटवर्तीय असलेले इब्राहिम रायसी यांच्या अपघाती मृत्युने अनेकांना धक्का बसला आहे.  हा अपघात की घातपात अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली आहे.  यातील पहिली शंका इस्त्रायलवर घेण्यात आली.  मात्र इब्राहिम रायसी यांना त्यांच्याच देशातूनही टोकाचा विरोध होता.  ‘ गंभीर मानवाधिकारांचे उल्लंघन ‘  केल

चला महाकुंभ मेळ्याची तयारी करु या..!

Image
  आपल्या देशात सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. यातील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले असून १ जून पर्यंत सात टप्प्यातील मतदान पूर्ण होणार आहे.  ४ जून रोजी या मतांची मोजणी होणार असून देशात पुढच्या चार वर्षात कोणाची सत्ता राहिल हे स्पष्ट होणार आहे.  लोकशाहीचा महाकुंभ म्हणून या सर्व निवडणूक प्रक्रियेचे वर्णन करण्यात येते. यासोबत देशामधील सर्वात पवित्र मानल्या जाणा-या महाकुंभ मेळ्याचीही तयारी सुरु झाली आहे. (Maha Kumbh Mela) उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील वर्षी होणारा महाकुंभ  २०२५  संस्मरणीय बनवण्यासाठी योगी सरकारने तयारी सुरु केली आहे.  प्रयागराजच्या संगम स्थळांचा कायापालट करण्यात येत असून प्रयागराजमध्ये होणा-या आधुनिक प्रकल्पांनी त्याचे स्वरुप पलटणार आहे.  यासाठी संपूर्ण प्रयागराजमध्ये विकासकामांचा धडाका सुरु आहे.  येथे डिजिटल कुंभ संग्रहालयाच्या उभारणीचे कामही सुरु आहे. ही सर्व कामे डिसेंबर  २०२४  पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.  महाकुंभ मेळ्यासाठी येणा-या भाविक आणि पर्यटकांसाठी महाकुंभ कायम संस्मरणीय राहील याची काळजी घेण्यात येत आहे. (Maha Kumbh Mela)  भारतातील पवित्र त

बिहारच्या मुजफ्फरच्या लिचीची जगभर गोडी

Image
  काही शहरांची ओळख ही त्यातील फळांवरुन झालेली आहे. जशी नागपूरची संत्री, जळगांवची केळी, नाशिकची द्राक्ष, देवगडचा हापूस, काश्मिरची सफरचंद. अशीच ओळख बिहार मधील मुझफ्फरपूर येथील लिची फळाची झाली आहे. लाल रंगाचे कवच असलेल्या या फळाच्या आत छोटा पाणीदार गोळा असतो. व्हिटामीन सी चे भरपूर प्रमाण असलेल्या या छोट्या फळाच्या मोठ्या बागा मुजफ्फरपूर येथे आहेत.  मे महिना सुरु झाला की या बागा लिचीच्या लाल फळांनी भरुन येतात. मुजफ्फरपूरची ही लिची मग विक्रीसाठी देशभर तर पाठवण्यात येते मात्र अलिकडील काही वर्षात या लिचीला  परदेशातही मोठी मागणी मिळत आहे.  त्यामुळे बिहारच्या मुजफ्फरपूरची ओळख आता लिचीचे शहर म्हणून होऊ लागली आहे. (Bihar Litchi) बिहारच्या मुझफ्फरपूरच्या लिचीची चव देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षापासून या  मुजफ्फरपूरमध्ये लिचीच्या बागा मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या. यामुळे येथील शेतक-यांना उत्पन्नाचा मोठा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. मुजफ्फरपूरमध्ये लिचीच्या बागा लावण्यात एवढी वाढ झाली आहे की, शेती व्यवसायात नसलेल्या अनेकांनीही या लिची लावगवडीमध्ये उत्सुकता दाखवली आहे.  त्यामुळेच

पाकिटबंद फूडच्या लेबलवरील माहिती योग्य आहे की नाही कशी तपासून पहावी?

Image
  इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने पाकिटबंद फूडसंदर्भात आपला एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, पाकिट बंद फूडवर लावण्यात येणाऱ्या लेबलच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती दिली जाते.  आजकाल धावपळीच्या आयुष्यात बहुतांशजणांना जेवण बनवण्यासाठी देखील पुरेसा वेळ नसतो. अशातच मार्केटमधून पाकिट बंद किंवा प्रोसेस्ड फूड आणून घरी तयार केले जाते. खरंतर असे पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याशिवाय पाकिट बंद फूड तयार करणाऱ्या कंपन्या असा दावा करतात की, त्यामधील पदार्थ पूर्णपणे नैसर्गिक आणि फ्रेश आहे. असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू शकत नाही.  बहुतांशजण पाकिट बंद फूडवर लावण्यात आलेला लेबल न वाचताच ते खरेदी करतात. याच संदर्भात एक हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे. ICMR चा दावा  आयसीएमआरने पाकिटबंद फूड संदर्भातील एक रिपोर्ट समोर सादर केला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिटबंद फूडवर लावण्यात आलेल्या लेबलवरील माहिती दिशाभूल करणारी असते. असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशाप्रकारची काही प्रकरणे समोर देखील आली आहेत. आ

हेल्दी राहण्यासाठी आरोग्याला या व्हिटॅमिन्सची भासते गरज

Image
  हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, काहीवेळेस व्हिटॅमिन्सची गरज जेवणातून पूर्ण केली जात नाही. अशातच काही सप्लिमेंट्सची मदत घेतली जाते. पण सप्लिमेंट्सच्या मदतीने व्हिटॅमिन्सची कमतरता पुर्ण करणे योग्य नाही. हेल्दी राहण्यासाठी व्हिटॅमिन्सची गरज असते. यामुळे शरिराला उर्जा मिळण्यासह काही आजार दूर राहतात. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो आणि काही आजार मागे लागू शकतात.बहुतांशजणांच्या शरिरात व्हिटॅमिन्सची कमतरता दिसून येते. एक-दोन नव्हे आपल्या शरिराला दररोज काही प्रकारच्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. याची पुर्तता काही गोष्टींमधून केली जाऊ शकते. अशातच शरिराला कोणत्या प्रकारच्या व्हिटॅमिन्सची गरज असते याबद्दल जाणून घेऊया सविस्तर… दररोज किती व्हिटॅमिन्सची गरज असते? हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, हेल्दी राहण्यासाठी एका व्यक्तीला प्रतिदिन किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारच्या व्हिटॅमिनची गरज असते हे त्याचे वय, लिंग आणि हेल्थ कंडीशनवर अवलंबून असते. दरम्यान, हे व्हिटॅमिन्स कोणते असावेत याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आङे. व्हिटॅमिन किती प्रकारचे असतात? एकूण 13 प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. त्य

‘मसान’ सह विक्की कौशलचे हे सिनेमे तुम्ही पाहिलेयत का?

Image
  विक्की कौशल इंडस्ट्रीमधील सर्वाधिक टॅलेंडेट अभिनेत्यापैकी एक आहे. अशातच विक्कीने उत्तम भूमिका केलेले सिनेमे एकदा तरी पाहिले पाहिजेत.  बॉलिवूडमधील टॅलेंडेट अभिनेता विक्की कौशलची आज इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओखळ आहे. एका लहान स्तरावरुन आपल्या करियरची सुरुवात करत आज यशाच्या शिखरावर विक्की पोहोचला आहे. अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये येऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात अभिनेत्याने एकापेक्षा एक उत्तम आणि दमदार सिनेमे दिले आहेत. विक्की कौशलच्या चाहत्यांना त्याचे सिनेमे वारंवार पहावेसे वाटतात. पण तुम्ही विक्कीच्या ‘मसान’ सिनेमाव्यतिरिक्त काही गाजलेले सिनेमे पाहिलेत का? विक्की कौशलचे ओटीटीवरील उत्तम सिनेमे मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्की कौशलने अस्टिटेंट डायरेक्टर फिल्म गँग्स ऑफ वासेपुरपासून फिल्मी करियरला सुरुवात केली. यामध्ये विक्कीने अनुराग कश्यपला असिस्ट केले होते. वर्ष 2015 मध्ये आलेल्या मसान सिनेमातून अभिनेत्याने अभिनयात करियर करण्यास सुरुवात केली. मसान सिनेमा वर्ष 2015 मध्ये आलेला मसान विक्की कौशलचा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमात ऋचा चड्ढा आणि संजय मिश्राने मुख्य भूमिका साकारली होती. या स

बद्रीनाथ धामकडून आला शुभसंदेश

Image
उत्तराखंडातील चारधाम यात्रा सुरु झाली आहे.  केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री या चारधाम यात्रेसाठी मोठ्यासंख्येनं भाविक उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत. या प्रत्येक चारधामांचे आगळे असे वैशिष्ट आहे.  या चारधामांची जेव्हा दरवाजे उघडले जातात, तेव्हाच्या परिस्थितीवरुन देशाचे भविष्य सांगितले जाते. तशीच एक पद्धत बद्रीनाथ मंदिराचे (Badrinath Dham) दरवाजे जेव्हा उघडले जातात, तेव्हा सहा महिन्यापूर्वी ठेवलेल्या देवाच्या वस्तू कशा आहेत, हे प्रथम बघितले जाते.  यावरुन पुढचे वर्ष कसे जाणार याची भविष्यवाणी केली जाते. यावर्षी बद्रीनाथ धामवरुन देशासाठी खुशखबरी आली आहे.  ती म्हणजे,  देशात यावेळी हवामान चागंले रहाणार असून कुठेही दुष्काळी परिस्थिती येणार नाही. गेली हजारो वर्ष ही परंपरा बद्रीनाथ मंदिरात पाळली जाते.  यासाठी जेव्हा सहा महिन्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात, तेव्हा हजारोंच्या संख्येनं भाविक तेथे उपस्थित असतात.  भाविकांनी ही भविष्यवाणी ऐकल्यावर बद्रीनाथ भगवान की जय असा जयघोष सुरु केला.  (Badrinath Dham) बद्रीनारायण मंदिर हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर असलेल

इराणमधील चाबहार बंदर सध्या चर्चेत

Image
  इराणमधील चाबहार बंदर सध्या चर्चेत आले आहे. कारण पुढची १० वर्ष हे बंदर भारताच्या ताब्यात राहणार आहे. भारतीय मंत्रालयानं तसा करार इराणसोबत केल्याचे जाहीर केले आणि एकच खळबळ उडाली. ही खळबळ व्हाईट हाऊस ते लाहौर पर्यंत होती आणि त्याचे पडसाद चीनमध्येही उमटले. कारण चाबहार बंदराच्या करारानुसार भारताला जनरल कार्गो आणि कंटेनर टर्मिनल १० वर्षांसाठी मिळाले आहे. चाबहार हे भारत सरकारद्वारे व्यवस्थापित केलेले परदेशातील पहिले बंदर बनले आहे.(Chabahar Port) यामुळे भारत पाकिस्तानला टाळून व्यापारी वाहतूक करु शकणार आहे. हे बंदर ताब्यात आल्यामुळे भारताचा इराणद्वारे रशियाशी संपर्क सुलभ होणार आहे. नेमकी हिच गोष्ट पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेलाही त्रासदायक ठरणार आहे.  त्यामुळे व्हाईट हाऊसमधून या घटनेसंदर्भात भारताला, इराणशी व्यापार कराराचा विचार करणाऱ्या कोणत्याही देशाने निर्बंधांच्या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवली पाहिजे अशा शब्दात इशारा दिला आहे.  चाबहार बंदर इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात आहे. भारत आणि इराण संयुक्तपणे या बंदराचा विकास करत आहे. चाबहार बंदराचा करार हा भारताच्या व्

कर्नल वैभव अनिल काळे, एका शूर सैनिकाचा अंत

Image
  युद्धग्रस्त गाझामधील रफाहमध्ये एका भारतीय लष्करी अधिका-याचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला.  हे होते कर्नल कर्नल वैभव अनिल काळे . वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी या दिलदार अधिका-याचा असा मृत्यू झाल्यानं भारतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  कर्नल वैभव अनिल काळे यांनी लष्करातून निवृत्ती स्विकारली होती.  पुण्यामध्ये ते त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह रहात होते. लष्करातून निवृत्ती स्विकारली तरी देशाच्या सेवेसाठी मात्र ते सदैव तत्पर असत. (Col Vaibhav Anil Kale)  त्यातून अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. अत्यंत हुशार आणि समाजभान जपणारे काळे हे युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच दाखल झाले होते. गाझामधील रफाह भागात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ते शहीद झाले.  यावेळी कर्नल काळे संयुक्त राष्ट्राचा झेंडा घेऊन जाणाऱ्या वाहनातून प्रवास करत होते.  इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा हा पहिला मृत्यू आहे. त्यांच्या परिवारासाठी हा मोठा धक्का आहे.  कर्नल काळे यांचे दोन भाऊही लष्करा