Posts

नियमित आलं खा आणि ‘या’ आजारांपासून दूर राहा

Image
हिवाळ्यात अनेक आजार पटकन होतात. हा ऋतू आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला मानला जातो. कारण या ऋतूमध्ये आपण जो काही पोषक, सकस आहार घेतो तो आपल्याला वर्षभर टिकेल एवढी ऊर्जा देतो. त्यामुळे हिवाळ्यात चार महिने सगळ्यांनीच उत्तम आहार घेतलाच पाहिजे. हिवाळ्यात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आलं. आलं हे बाराही महिने भारतामध्ये वापरले जातात. कधी कधी भाज्यांसोबत फ्रीमध्ये मिळणारं आलं, आता खूपच महाग झाले आहे. आलं म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो, आल्याचा चहा. आपल्या देशात आल्याच्या चहाला अनन्यसाधारण महत्व आहे. चहासोबतच आलं भाज्यांमध्ये, विविध प्रकारांच्या डाळींमध्ये देखील वापरले जाते. आल्याची पेस्ट किंवा आलं जसे आपल्या जेवणाला चहाला चव देते तसे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे. आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते. पोटासाठी उत्तम असणाऱ्या आल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाहीत. आयुर्वेदिक औषधांमध्येही आल्याच्या वापर महत्त्वाचा मानला जातो. आलं झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे. आरोग्यासाठी फायदेशीर मस...

नांदा सौख्य भरे! अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात

Image
  मराठी टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली आहे. मागील अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. अखेर २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रेश्माने पवनसोबत पुण्यात लग्नगाठ बांधली. तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. top stories रेश्माच्या लग्नापुर्वीच्या विधींचे देखील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आयुष्याची नवीन सुरुवात…असे कॅप्शन देत रेश्माने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. रेश्माने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत नवविवाहित जोडप्यास शुभेच्छा दिल्या आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रेश्मा आणि पवन यांनी लग्नासाठी पारंपरिक मराठी पेहरावाला पसंती दिली. त्यांनी रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी साडी हिरवा चुडा, चंद्रकोर, नाकात नथ,गजरा आणि मोत्यांचे दागिने परिधान केले होते तर रेश्माच्या नवऱ्याने ऑफ व्हाईट कुर्ता, धोतर आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान करत रेश्माच्या लुकला साजेसा लूक घेतला होता. रेश्माच्या मित्रांनी अचानक तिच्या केळवणाचे फोट...

जाणून घ्या मधाला Expiry डेट असते का?

Image
  मध आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज मिळणारा पदार्थ आहे. मध हे अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. साखरेला किंवा गुळाला उत्तम पर्याय म्हणून मध जेवणात वापरले जाते. याशिवाय मध हे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच लाभदायक आहे. हिवाळ्यात तर मध आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अमृत मानले गेले आहे. सर्दी खोकला किंवा घशाची खवखव कमी करण्यासाठी मध हा घरगुती उपायांपैकी प्रामुख्याने वापरला जाणारा एक उपाय आहे. top stories मधाची उपयुक्तता पाहून प्रत्येक घरामध्ये मध हे वर्षानुवर्षे ठेवलेले असते. मात्र कधी घर साफ करताना अचानक जुनी मधाची बाटली सापडली की ती फेकायची की ठेवायची हे समजत नाही. बाटलीवर असणारी एक्सपायरी डेट उलटून गेलेली असताना देखील मध चांगल्या स्थितीमध्ये दिसत असते. मग द्विधा मनस्थिती होते आणि ते फेकावे की नाही असा प्रश्न पडतो. चला मग आज जाणून घेऊया मधला एक्सपायरी डेट असते का? आणि मध जास्त काळ घरात ठेवले तर ते खराब होते का? आयुर्वेदामध्ये मधाला अमृत म्हटले आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज मध खाणे चांगले मानले जाते. प्रत्येक वातावरणात आणि ऋतूमध्ये मधाचे सेवन फायदेशीर आहे. मध चांगल्या प्रकारे ठेवल्य...

वाराणसीला वेध देवदिवाळीचे

Image
उत्तरप्रदेशमधील अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराज येथे पर्यटकांचा महापूर आलेला आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त या तिनही ठिकाणी मोठ्या संख्येनं भक्त दाखल झाले आहेत. त्यातही उत्तरप्रदेशमध्ये पुढच्या वर्षी महाकुंभ होत आहे. या महाकुंभ सोहळ्याची तयारीही सुरु झाली असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. आत्ताच अयोध्या मध्ये जसा दिपोत्सव साजरा झाला. तसाच दिपोत्सव वाराणसी येथेही झाला. बाबा विश्वनाथांची नगरी असलेल्या काशीमध्ये झालेला हा दिपोत्सव आता पुन्हा करण्यात येणार आहे. त्याला कारण म्हणजे, 15 नोव्हेंबर रोजी देवदिवाळी आहे. या देवदिवाळीसाठी वाराणसीमध्ये दिपोत्सव करण्यात येणार आहे. काशीमध्ये अगदी पावलापावलावर मंदिरे आहेत. या सर्व मंदिरात रोषणाई करण्यात येणार असून बाबा विश्वनाथांच्या मंदिरात विशेष लाईट शो चेही आयोजन करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात अहोरात्र भक्तांची ये जा चालू असते. याच भक्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आता लाईट शो ही करण्यात येणार आहे. (Dev Diwali 2024) Top stories वाराणसी हे गंगा नदीच्या काठाव...

हिवाळ्यात ‘या’ सोप्या टिप्स वापरून घ्या ओठांची काळजी

Image
हिवाळा सुरु झाला की, अनेकांना आनंद होतो. कारण हिवाळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला समजला जातो. मात्र याउलट हाच हिवाळा आपल्या त्वचेच्या दृष्टीने खूपच हार्ड ठरतो. त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे अनेक त्वचा रोग देखील सुरु होतात. आपण किती देखील व्हॅसलिन लावले, बॉडी लोशन लावले तरी आपल्याला त्याचा जास्त फायदा होत नाही. यासाठी आपण इतरही अनेक उपाय करू शकतो. काही खाण्यापिण्यामध्ये बदल करून किंवा घरगुती काही छोटे उपाय करून हे नक्कीच बरे करू हुकतो. Top stories याचा जास्त परिणाम दिसतो तो ओठांवर. हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच बऱ्याचदा या ऋतूत लोक ओठ फाटण्याच्या समस्येने त्रस्त असतात. आपले ओठ सर्वात आधी लक्ष वेधून घेतात. त्यामुळे जेव्हा आपले ओठ खराब दिसू लागतात, त्याला तडे जातात, ते कोरडे होतात, त्याची स्किन निघते कधी कधी तर ओठांमधून रक्त देखील येते. यासाठी आपण बरेच उपाय केले तरी पाहिजे तितका फायदा आपल्याला होत नाही. मात्र यासाठीच आता आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, जे करून तुम्हाला नक्कीच त्याचे लाभ होतील. ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असल्य...

तुळशी विवाहाचे महत्व आणि कथा

Image
  आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मास असलेल्या काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य समजले जाते. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्याचा काळ म्हणजेच चातुर्मास समजला जातो. दिवाळी नंतर कार्तिक महिन्यात येणारी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आणि शुभ कार्य करण्यास सुरुवात होते. मात्र त्याआधी या एकादशीच्या दिवशी आपल्याकडे तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. Top stories कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. या दिवसानंतर शुभ कार्य आणि लग्नसराईला सुरुवात होते. असे म्हटले जाते या दिवशी उपवास करुन भगवान विष्णूची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात तसेच दु:ख देखील दूर होते. कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या काळात एका तुळशी विवाहचा कार्यक्रम केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे भगवान विष्णूसोबत लग्न लावले जाते. या तुळशी विवाहाची देखील एक पौराणिक कथा आहे. जाणून घेऊया त्या कथेबद्दल. तुळशी विवाह कथा पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले. त्याच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले. हे बालक पुढ...

इस्कॉनच्या भाविकांची बांगलादेशमध्ये कत्तल !

Image
  ऑगस्ट महिन्यात बांगलादेशमध्ये झालेल्या सरकारविरोधी आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारताचा आश्रय घेतला. त्यानंतरही बांगलादेशमध्ये उसळलेले आंदोलन थंड झालेले नाही. सध्या बांगलादेशाची कमान मोहम्मद युनूस यांच्याकडे आहे. मात्र त्यांनाही बांगलादेशमधील परिस्थिती सामान्य करण्यात यश आले नाही. या आंदोलनात सर्वाधिक नुकसान झाले आहे ते बांगलादेशी हिंदू कुटुंबांचे. अनेक हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत. उद्योग नष्ट करण्यात आले. मुख्यतः हिंदूंची मंदिरे जाळण्यात आली, त्या मंदिरातून उघडपणे लूट करण्यात आली. मात्र या सर्वांवर अंकूश ठेवण्यात मोहम्मद युनूस अपयशी ठरले. उलट त्यांच्याच आशीर्वादानं हे अत्याचार चालत असल्याची परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये आहे. कारण बांगलादेशमध्ये आता इस्कॉन मंदिराना लक्ष करण्यात येत आहे. इस्कॉन मंदिरात जाणा-या भाविकांच्या गळ्यात तुळशीची माळ असते, तसेच त्यांच्या कपाळवर टिळा असतो. असे भाविक दिसले की त्यांना ठार करा, असा इशाराच आता बंगालदेशमधील कट्टरपंथीय देत आहेत. नवरात्रौत्सवात इस्कॉनच्या भाविकांची बांगलादेशमध्ये कत्तलमध्ये देवींच्या मंडपांचेही नुकसान क...

जाणून घ्या तुळशी माळ घालण्याचे फायदे आणि नियम

Image
  आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे . आपली हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे . तुळशीला धार्मिक , पौराणिक आणि वैज्ञानिक असे सर्वच बाजूने मोठे महत्व आहे . आपल्या देशात तर प्रत्येक घरात तुळशीचे रोप , झाड असते म्हणजे असतेच . रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे ही आपल्याकडे परंपराच आहे . प्रत्येक घरातील स्त्रिया ही परंपरा पळतातच . Top Stories . यासोबतच तुळशीची पाने खाणे , तुळशीची माळ घालणे आदी अनेक गोष्टी भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत . तुळशीची माळ देखील प्रत्येकाच्याच घरात असते . या माळेला तुळशीचे मणी किंवा तुळशीची जपमाळ या नावाने देखील ओळखले जाते . या माळेचे देखील मोठे महत्व आहे आणि तिचे अनेक फायदे देखील आहेत . ही तुळशी माळ तुळशीच्या रोपापासून बनवली जाते . आज तुळशी विवाह साजरा होत आहे . त्यानिमित्ताने जाणून घेऊया या तुळशी माळेच्या विविध फायद्यांबद्दल . तुळशीची माळ घातल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे...

वेटरला टीप देण्याची सुरुवात कधीपासून झाली ?

Image
तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत किंवा Friends सोबत रेस्टोरंटमध्ये जातच असाल. मस्तपैकी पोटभर जेवून झाल्यावर जेव्हा बिल द्यायची वेळ येते, तेव्हा एक गोष्ट तुम्ही हमखास केली असेल, ती म्हणजे ज्या वेटरने आपल्याला फास्ट सर्विस दिलीये, त्या वेटरला TIP दिली असेलच. पण तुम्ही कधी विचार केलाय का कि हि TIP नक्की का दिली जाते ? त्यामागची कहाणी काय आहे? ही TIP देण्याची पद्धत नेमकी कुठे आणि कधी सुरु झाली ? ही संस्कृती किंवा ट्रे़डीशन कसं बनलं? ह्याबद्दलच जाणून घेऊया. (Tipping Culture) Top stories तर ही जेवणानंतर टिप देण्याची परंपरा सुरु कोणी केली ? तसं बघायचं झालं तर हा टीप देण्याचा इतिहास फार जुना आहे. या संदर्भात काही गोष्टी समोर येतात. पहिली म्हणजे ही प्रथा ब्रिटिशांनी सुरु केली असं म्हटलं जात. या नुसार ही प्रथा सुमारे 1600च्या दशकात सुरु झाली आहे. योगायोग म्हणजे याच दशकात ब्रिटीश भारतात आले होते. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या वर्षात झाली आणि ती साधारणपणे ब्रिटिशांच्या भारतात येण्याशी संबंधित होती. एका मीडिया वृत्तानुसार,1600मध्ये, ब्रिटीश हवेलीमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना चांगली सेवा दिल्यामुळे थ...