Posts

Showing posts from July, 2024

शरद पवार अजितदादांना जागा देतील ?

Image
    Marathi news लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या बेतात आहे. राज्यात सहा प्रमुख पक्ष (काँग्रेस, भाजप, दोन राष्ट्रवादी काँग्रेस व दोन शिवसेना) असले तरी खरी उत्सुकता एकाच पक्षाच्या दोन गटांबाबत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, कारण शिवसेना फुटून तिचे दोन गट झाले असले तरी त्या गटांमध्ये आता स्पष्ट सीमा रेखा ओढली गेली आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाने जोरदार यश मिळविले असले, तरी खरी शिवसेना मिळालेल्या एकनाथ शिंदे यांनाही अगदीच नामुष्की पत्करावी लागलेली नाही. त्यांनाही बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना आपले चंबुगबाळे आवरून परत शिवसेनेत जावे लागणार का, असा प्रश्न कोणी विचारत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण मात्र वेगळे आहे. (Pawar vs Pawar) तिथे अजित पवार यांना पक्षाची ताबेदारी आणि चिन्ह मिळाले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यश शरद पवार यांना मिळाले. नुसते यश नाही मिळाले तर अजित पवार यांना अत्यंत नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्यांची स्वतःची पत्नी बारामतीत पराभूत झाली, तर पक्षाचा केवळ एक खासदार निव

जाणून घ्या मंगळसूत्राबद्दलची खास माहिती

Image
    Top stories आपली भारतीय पर्यायाने हिंदू संस्कृती खूपच प्रगल्भ आणि समृद्ध आहे. या संस्कृतीमध्ये कोणतीच अशी गोष्ट नाही जी विनाकारण आहे. प्रत्येक गोष्टीला एक धार्मिक, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ लाभला आहे. यामुळेच आपला देश, आपला धर्म जगात वेगळा ठसा उमटवताना दिसतो. आता हेच बघ आपल्या धर्मात लग्नाला अनन्यसाधारण महत्व आहे. लग्न, त्यातले प्रत्येक विधी याला एक वेगळा अर्थ आहे. त्यामुळेच बहुतकरून लोकं कोर्ट मॅरेज करण्यापेक्षा वैदिक लग्न करण्यासाठी प्राधान्य देतात. याच लग्नात प्रत्येक नववधू घालण्यात येणारा महत्वाचा दागिना म्हणजे ‘मंगळसूत्र’. सौभाग्याचा लेणं असलेले मंगळसूत्र म्हणजे सर्वच विवाहित स्त्रियांचा आवडता आणि महत्वाचा दागिना आहे. आता अनेक लोकं हे मंगळसूत्र फक्त एक फॅशन म्हणून किंवा दागिना म्हणून देखील घालताना दिसतात. मात्र मंगळसूत्र हा फक्त एक दागिना नाही तर ती एक भावना आहे. जिला धार्मिक आणि वैज्ञानिक असे विशेष महत्व आहे. मंगळसुत्रा शिवाय कोणतेही लग्न मान्य होत नाही. देवा-ब्राम्हणाच्या, वडीलधाऱ्यांच्या साक्षीने हे मंगळसूत्र लग्नात वर आपल्या वधूला सगळ्यांसमोर घालतो. ज्यानंतर महिला ते

वेटिंग तिकिटाच्या माध्यमातून प्रवास केल्यास भरावा लागेल दंड, जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम

Image
  वेटिंग तिकीटाच्या माध्यमातून आता प्रवास केल्यास दंडात्मक कार्यवाही केली आहे. याबद्दलचा नवा नियम नुकताच भारतीय रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...  Marathi news   Indian Railway New Rule  : भारतीय रेल्वेने नुकत्याच आपल्या वेटिंग तिकीटाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी नवा नियम जाहीर केला आहे. आतापर्यंत ज्या व्यक्तींकडे कंन्फर्म तिकीट नसायचे अथवा आरएसी असायचे ते स्लीपर अथवा एसी कोचच्या माध्यमातीन वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करायचे. यामुळे कोचमध्ये आरक्षित तिकीटावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागायचा. याशिवाय कोचमध्ये गर्दीही वाढली जायची. अशातच रेल्वेने वेटिंग तिकीटासंदर्भात नवा नियम काढला आहे. दंडात्मक कार्यवाही होणार भारतीय रेल्वेकडून कंन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास केल्यास प्रवाशाच्या विरोधात दंडात्मक कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. व्यक्तीवर 440 रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो. याशिवाय टीटी प्रवाशाला गंतव्य स्थानकाच्या आधी कुठेही कोचचा खाली उतरवू शकतो याशिवाय टीटीकडून प्रवाशाला जनरल डब्यातही पाठवले जाऊ शकते. एवढेच नव्हे वेटिंग तिकी

पावसाळ्यात हात-पाय काळवंडलेत? करा हे घरगुती उपाय

Image
  पावसाळ्यात हात-पाय काळवंडलेल्या समस्येवर घरगुती उपाय काय हे आज जाणून घेणार आहोत. Marathi news Tan Skin in Monsoon  : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा टॅन होण्याची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. हीच समस्या पावसाळ्यातही काहींना होते. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी होण्यासह हात-पायही काळवंडले जातात. अशातच चारचौघांमध्ये जाताना मेकअप अथवा फूल हँड कपडे परिधान करावे लागतात. याच समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…. बेसनच्या पीठाचा वापर ब्युटी एक्सपर्ट्सच्या मते, बेसनाच्या पीठाचा वापर करुन तुम्ही हात-पाय काळवंडले असतील तर या समस्येपासून दूर राहू शकता. बेसनाच्या पीठात नारळाचे तेल आणि दूधाची मलई मिक्स करुन पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट काळवंडलेल्या त्वचेच्या येथे लावा. बेसनाच्या पीठाच भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने तुम्ही त्वचेसाठी त्याचा वापर करू शकता. नारळाच्या तेलामुळे त्वचा मऊसर होण्यास मदत होते. केसांसाठी खरंतर, नारळाचे तेल उत्तम मानले जाते. याशिवाय मलई त्वचेला मऊ करण्यास मदत करते. सामग्री -2 चमचे बेसनाचे पीठ -2 चमचे नारळाचे तेल -1 चमचा मलई अशाप

जहाल नेता ‘लोकमान्य टिळक’

Image
   Latest marathi news “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना टिळकांनी केली आणि भारतीय जनतेला एक स्वातंत्र्याची एक नवी आशा मिळाली. टिळकांनी दिलेला हा स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेमध्ये जाऊन पोहोचला. लोकमान्य टिळक म्हणजे एक महान स्वातंत्र्यसेनानी, उत्कृष्ट आणि परखड वक्ते, समाजसुधारक, आदर्शवादी नेते, हिंदू धर्म, खगोलशास्त्र, संस्कृत आणि गणित या विषयांचे गाढे अभ्यासक. आपल्या महाराष्ट्राचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान होते बाळ गंगाधर टिळक. (Lokmanya Tilak Jayanti) स्पष्ट विचार, देशहित आचार, जहाल बोली, सेवाभावी गुण असलेल्या लोकमान्य टिळकांची आज १६८ वी जयंती. अतिशय महान आणि मोठे कार्य असणाऱ्या टिळकांबद्दल किती लिहावे, काय लिहावे, सुरुवात कुठून करावी तेच समजत नाही. जवळपास १५० वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही लोकांसाठी प्रेरणादायी ठरताना दिसत आहे. आपल्या लोकांसाठी स्वराज्य मिळवणे आणि त्यांची ब्रिटिशांच्या जाचातून मुक्तता करणे हेच टिळकांचे एकमेव आणि अंतिम उदिष्ट होते. लोकमान्य टिळक हे अतिशय हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी होते. टिळकांशिवाय भारतीय स्व

पाकिस्तान हिंदूसाठी नरक !

Image
   Marathi news देशभर भगवान शंकराचे भक्त कांवड यात्रेमध्ये भक्तीमय झाले आहेत. असे असतांना उत्तर प्रदेशमध्ये कांवड यात्रेदरम्यान घेण्यात आलेल्या एका निर्णयानं देशभरात मोठी खळबळ निर्माण केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी कांवड यात्रा मार्गावरील सर्व दुकानदारांना संबंधित दुकान कुणाचे आहे, त्याचे नाव लिहिणे आवश्यक केले. या आदेशामुळे उत्तरप्रदेश सरकारवर चहूबाजुनं टिका करण्यात आली. दोन धर्मामध्ये दुही करणारा हा निर्णय असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. (Pakistan) मात्र गेल्याकाही वर्षात कांवड यात्रेदरम्यन झालेल्या घटनांचा उल्लेख करत उत्तर प्रदेश सरकारनं आपल्या या आदेशाचे समर्थन केले आहे. या निर्णयाचे पदसाद देशभर उमटत असतांना आता पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोबत आपल्या सात वर्षाच्या मुलीसाठी गेली तीन वर्ष लढा देणा-या आईवडिलांचा टाहो जगापुढे आला आहे. यातून पाकिस्तानात हिंदू कुटुंबियांची अवस्था किती दारुण आहे, हे स्पष्ट होत आहे. पाकिस्तान म्हणजे, हिंदूंसाठी नरक झाल्याचेच त्यातून स्पष्ट होत आहे. उत्तरप्रदेशमध्ये कांवड यात्रेच्या मार्गावरील दुकानदारांचे नाव लिहि

बहिण भावंडाचे भुरेश्वर महादेव मंदिर

Image
  Marathi news हिमाचल प्रदेशमध्ये भगवान शंकराचे असे एक मंदिर आहे जिथून प्रत्यक्ष भगवान शंकर आणि माता पार्वतीनं महाभारत युद्ध पाहिले होते. हिमाचल प्रदेशमधील हे मंदिर बहिण भावांच्या प्रेमासाठीही प्रसिद्ध आहे. आता उत्तर भारतात, श्रावण महिना सुरु झाला असून यानिमित्त भक्तांची मोठी गर्दी या मंदिरात होत आहे. हे मंदिर म्हणजे, भुरशिंग किंवा भुरेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील नाहान येथे आहे. या मंदिराचा इतिहास द्वापार काळाशी संबंधित असून आजही या मंदिरामध्ये अनेक चमत्कार होत असल्याचा दावा भक्त करतात. आता या मंदिरात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आणि भगवान शंकरावर जल अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. (Bhureshwar Mahadev Temple) हिमाचल प्रदेशच्या नाहान-सोलन राज्य महामार्गावरील शिखरावर सुंदर मंदिर आहे. भगवान शंकराच्या या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. शिवाय या मंदिराचे स्थानही अद्दभूत आहे, येथील पुजेची पद्धतही वेगळी आहे. त्यामुळे या मंदिरात वर्षाचे बारा महिने भक्ताची गर्दी असते. मात्र आता श्रावण महिन्यानिमित्त भक्तांचा पूर मंदिरात आला आहे. या मंदिराच

जाणून घ्या कोथिंबीरीचे सेवनाचे चमत्कारिक फायदे

Image
   Top stories  भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर सर्वात शेवट प्रत्येक स्त्री आवर्जून आणि हक्काने फ्रीमध्ये मागते ती कोथिंबीर. आज जरी कोथिंबीर फ्री मिळत नसली तरी छान, फ्रेश कोथिंबीर बघून प्रत्येकालाच ती घ्यायचा मोह होतो. मोठ्या प्रेमाने आपण तिला नीट निवडून ठेवतो. आपला स्वयंपाक कोथिंबीरशिवाय नेहमीच अपूर्ण असतो. प्रत्येक भाजीत शेवट कोथिंबीर जातेच. मोठमोठ्या शेफपासून आपल्या सर्वसामान्य गृहिणींपर्यंत प्रत्येकाचीच पसंती कोथिंबिरीला मिळते. (Coriander Benefits) ही कोथिंबीर फक्त सजावटीसाठी नसते बरं का. तिच्यापासून देखील अतिशय वेगवेगळी चविष्ट पदार्थ बनवले जातात. अशी ही कोथिंबीर चवीला जितकी सुंदर असते तितकीच ती आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी देखील लाभदायक असते. या कोथिंबीरीचे आपल्या शरीरावर होणारे विविध फायदे आपण जाणून घेऊया. कोथिंबीरीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, कार्बोहायड्रेट, चरबी, आहारातील फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, जस्त, सेलेनियम, मॅंगनीज, सोडियम, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, थायामिन, यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. सोबतच कोथिंबीरमध्ये अँटीमायक्रोबिय

ड्रायवर ते ‘किंग ऑफ़ कॉमेडी’ मेहमूद यांचा प्रवास

Image
  Marathi news हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणजे ‘मेहमूद’. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर नावलौकिक कमावला. मेहमूद यांनी हिंदी सिनेसृष्टीमधे जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. त्यांनी अनेक उत्तम सिनेमे तयार केले. आपल्या प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रत्येक भूमिका पडद्यावर अक्षरशः जिवंत केली. मेहमूद यांच्या नावाशिवाय कायमच हिंदी सिनेसृष्टी अपौर्ण राहील. असे मोठे आणि बहारदार काम त्यांनी करून ठेवले आहे. (Mahmood Journey ) एक उत्तम विनोदी अभिनेता कसा असावा?, टायमिंग, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन, डायलॉग डिलिव्हरी आदी सर्वच बाबींनी त्यांनी प्रेक्षकांना प्रभावित केले, त्यांचे काम आजही नवीन कलाकारांसाठी एक चांगले विद्यापीठ समजले जाते. अशा या ‘किंग ऑफ़ कॉमेडी’ असलेल्या मेहमूद यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध नर्तक मुमताज अली होते, जे बॉम्बे टॉकीजमध्ये काम करायचे. मेहमूद हे लहान असताना त्यांची आर्थिक परिस्थिती अजिबातच चांगली नव्हती. घराला थोडा हातभार लावण्यासाठी ते लहान असताना

पावसाळ्यातील स्किन केअर रुटीन करताना या गोष्टी ठेवा लक्षात

Image
  पावसाळ्यात स्किन केअर रुटीन फॉलो करणे अत्यावश्यक असते. अन्यथा त्वचेसंदर्भात काही समस्या उद्भवू शकतात. Skin Care Routine in Monsoon  : पावसाळ्यात बाहेरील वातावरण अत्याधिक ओलसर राहत असल्याने त्वचा तेलकट होण्याची समस्या बहुतांश महिलांना उद्भवते. यामुळेच त्वचेवर पिंपल्सही येतात. अशातच पावसाळ्यात त्वचेची खास काळजी करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन तुम्ही त्वचेसंदर्भातील काही समस्यांपासून दूर राहू शकता. पावसाळ्यात स्किन केअर रुटीन फॉलो करताना कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षत ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर… माइल्ड क्लिंजरचा वापर करा चेहऱ्यावरील चिकटपणा दूर करण्यासाठी माइल्ड फेस वॉशचा वापर करू शकता. या फेस वॉशचा दररोज वापर केल्याने चेहऱ्यावरील धूळ आणि घाण दूर होण्यास मदत होईल. याशिवाय क्लिजिंगच्या कारणास्तव चेहऱ्यावरील पोर्सही खुले होतात, जे आपल्या त्वचेसाठी महत्वाचे आहे. क्लिजिंगमुळे चेहऱ्यावरील तेलकट आणि चिकटपणा दूर होऊ शकतो. माइल्ड क्लिंजरचा वापर दररोज करू शकता. रोज वॉटर आणि टोनरचा वापर फेस वॉश केल्यानंतर चेहऱ्यावरील रोमछिद्र खुले होतात. यामुले धूळ आणि घाण दूर होण्यास मदत होते. अशातच