Posts

Trending Meaning : “ट्रेंडिंग” म्हणजे नेमकं काय? त्याचा खरा अर्थ समजून घ्या

Image
  Trending Meaning : आजच्या सोशल मीडियाच्या युगात “ट्रेंडिंग” हा शब्द आपण रोज ऐकतो. कुठे तरी नव गाणं रिलीज झालं की ते ट्रेंडिंग नंबर वन होतं, एखादी reels व्हायरल झाली की ती ट्रेंडिंगमध्ये जाते, किंवा एखादा फॅशन स्टाईल, हेअरकट, मेकअप लुक लोकप्रिय झाला की सगळे म्हणतात  “हे सध्या ट्रेंडिंग आहे!” पण “ट्रेंडिंग” म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा आपल्या जीवनावर खरा परिणाम काय होतो? हे समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे.याबदद्लच खाली सविस्तरपणे जाणून घेऊ. Marathi News Trending Meaning ट्रेडिंग म्हणजे काय? “ट्रेंडिंग” या शब्दाचा अर्थ साधा आहे. ट्रेडिंग म्हणजे जे सध्या लोकप्रिय आहे, जे बहुतेक लोक करत आहेत, बघत आहेत किंवा बोलत आहेत असा विषय, वस्तू किंवा कल्पना. म्हणजेच ट्रेंड म्हणजे काळाच्या ओघात लोकांच्या पसंतीत आलेला तात्पुरता बदल. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी सेल्फी घेणं हा एक मोठा ट्रेंड होता; त्यानंतर Instagram filters, reels, minimalist fashion, किंवा skin cycling सारखे ट्रेंड्स आलेत. प्रत्येक काळात नवे ट्रेंड्स जन्म घेतात आणि काही काळानंतर ते बदलतात. याचं कारण म्हणजे माणसाचं मन...

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

Image
  जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या जगातील काही मोजक्याच लोकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार मिळणे अतिशय मानाची आणि भाग्याची गोष्ट समजली जाते. यंदाचा शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार कमालीचा गाजत होता. याचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. (Nobel Peace Prize) International News कारण मागील काही महिन्यांपासूनच ते शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना स्वतःला मिळावा यासाठी ते दावा करत होते. मात्र आज डोनाल्ड ट्रम्प हे तोंडावर पडले आहेत. याचे कारण म्हणजे नुकताच शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारीया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीनं शुक्रवारी ही घोषणा केली. या घोषणेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र एवढा मोठा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकलेल्या मारिया कोरिना मचाडो यांची संपूर्ण जगामध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आह...

World Mental Health Day 2025 : स्वतःचे मानसिक आरोग्य हेल्दी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणते नियम फॉलो करावे?

Image
  World Mental Health Day 2025 : आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. काम, घर, जबाबदाऱ्या, सोशल मीडियाचा ताण या सर्वांमुळे मनावर अनावश्यक दडपण येते. मानसिक आरोग्य म्हणजे केवळ दुःख किंवा चिंता नसणे नव्हे, तर मन प्रसन्न, आत्मविश्वासपूर्ण आणि स्थिर ठेवणे हे खरे आरोग्य होय. त्यामुळे रोजच्या आयुष्यात काही सोपे पण परिणामकारक नियम पाळल्यास मानसिक स्थैर्य टिकवता येते. International News पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे “स्वतःसाठी वेळ काढणे” दिवसभरात किमान १५-२० मिनिटे फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. त्या वेळेत मोबाइलपासून दूर राहून मन शांत करा, ध्यानधारणा (Meditation) करा किंवा आवडती गोष्ट वाचा. हा वेळ मनाला विश्रांती देतो आणि विचारांना स्थिर करतो. महिलांसाठी हे विशेषतः आवश्यक आहे, कारण त्या बहुतेक वेळा कुटुंबासाठी सर्वकाही करतात पण स्वतःसाठी वेळ ठेवत नाहीत. स्वतःकडे लक्ष दिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि भावनिक संतुलन राखता येते. दुसरा नियम म्हणजे “शरीर आणि मनाचा समतोल राखणे” नियमित व्यायाम केल्याने शरीरात एंडोर्फिन्स (happy hor...

NATO Dating : नाटो डेटिंग म्हणजे काय आणि त्याचे संकेत कसे ओळखावे?

Image
  NATO Dating : आजच्या डिजिटल युगात डेटिंगचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. ऑनलाइन डेटिंग अॅप्स, सोशल मीडियावर वाढलेली मैत्री आणि आभासी जगातील संवाद या सर्वांमुळे लोक एकमेकांना पटकन भेटतात, बोलतात आणि नातं जोडतात. पण या सगळ्यात एक संकल्पना वाढत चालली आहे नाटो डेटिंग (NATO Dating) NATO म्हणजे No Action, Talk Only म्हणजेच फक्त बोलणे, पण कोणतीही कृती नाही. साध्या भाषेत सांगायचे तर, नातं फक्त संवादापुरतंच मर्यादित असतं; प्रत्यक्ष भेट, बांधिलकी किंवा पुढचं पाऊल कधीच घेतलं जात नाही.(NATO Dating ) Top stories नाटो डेटिंग म्हणजे अशा प्रकारचं नातं जिथे एखादी व्यक्ती सतत संवाद ठेवते, मेसेज करते, काळजी घेत असल्यासारखं दाखवते, पण जेव्हा भेटण्याची, पुढे जाण्याची किंवा नातं दृढ करण्याची वेळ येते, तेव्हा मागे सरकते. अशी नाती सुरुवातीला खूप उत्साहवर्धक वाटतात  कारण समोरची व्यक्ती सतत संपर्कात असते, वेळ देत असते, कौतुक करत असते. पण हळूहळू लक्षात येतं की ते नातं फक्त बोलण्यापुरतंच आहे. अशी स्थिती अनेकदा भावनिक थकवा आणि गोंधळ निर्माण करते अति बोलणे पण कृती नाही  समोरची व्यक्ती सतत आपण भेटू, आपल...

Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज

Image
  मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतामध्ये नानाविध प्रकारचे असंख्य मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे भारतातील सर्वच मंदिरांची जगामध्ये भरपूर चर्चा होताना दिसते. आपल्याकडील प्रत्येक मंदिर हे खूपच खास आणि वैशिट्यपूर्ण आहे. प्रत्येक पुरातन मंदिराला एक खास पौराणिक इतिहास देखील आहे. याचमुळे या मंदिरांचे महत्त्व अधिकच वाढते. अनेक मंदिरं तर त्यांच्या रहस्यमयी गोष्टींसाठी चर्चेत येत असतात. जुन्या मंदिरांबद्दल बोलायचे झाले तर या मंदिरांचे बांधकाम आणि अचंभित करणाऱ्या गोष्टी कायम सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यातलेच एक प्रसिद्ध आणि आकर्षक मंदिर म्हणजे, जाटोली शिव मंदिर. (Lord shiva) Top Marathi Headlines भारताच्या सर्वात उंच टोकावर अर्थात हिमाचल प्रदेश राज्यात हे जाटोली शिव मंदिर स्थित आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर रहस्यमयी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य आहे ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. जटोली शिव मंदिर, जे आशियातील सर्वात उंच शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात आहे. या मंदिराच्या दगडांवर आघात केल्यास डमरूसारखा आवाज ये...

Gajalakshmi : घरात गजलक्ष्मीची पूजा केल्याने होतात ‘हे’ लाभ

Image
  प्रत्येक व्यक्तीला जीवनात आर्थिक भरभराट हवीच असते. त्यासाठीच तो कायम मेहनत घेतो आणि प्रयत्नही करत असतो. मात्र मनुष्याच्या प्रयत्न आणि मेहनतीसोबतच दैवी आशीर्वाद देखील फार आवश्यक असतो. त्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. आता आर्थिक प्रगतीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना हिंदू धर्मामध्ये धनाची देवता म्हणून ओळखले जाते. यांची विधिवत पूजा केल्यास नक्कीच त्यांची कृपा होते आणि आर्थिक सुबत्ता लाभते. मात्र जर गजलक्ष्मीची पूजा केली तर त्याचा अधिक फायदा होतो. आजवर आपण कमळात बसलेली, उभी असलेली लक्ष्मी, खाली बसलेली लक्ष्मी अशा विविध लक्ष्मीच्या रूपांची पूजा करत असतो. मात्र यांसोबतच गजलक्ष्मीची पूजा करणे देखील लाभदायक आहे. (Gajlakshmi) Marathi News गजलक्ष्मी म्हणजे हत्तीवर आरूढ झालेली लक्ष्मी. गजलक्ष्मी ही ऐरावत हत्तीवर स्वार असते तर हत्ती मुखात कलश घेऊन उभा असतो. देवीच्या या स्वरूपातील लक्ष्मीला गजलक्ष्मी असे म्हटले जाते. तुम्ही घरात सुख-शांती नांदण्यासाठी आणि लक्ष्मीचा आशिर्वाद सैदव राहण्यासाठी देवी गजलक्ष्मीचा फोटो ठेवून त्याची पूजा ...

Technology : कधी आणि कोणत्या स्थितीत सोशल मीडियावरील कंटेट सरकारकडून ब्लॉक केला जातो?

Image
  Technology : सोशल मीडियाचा वापर आजच्या डिजिटल युगात खूप प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर लोक आपले विचार, माहिती, व्हिडिओ, फोटो आणि लेख शेअर करतात. मात्र, काही वेळा सरकारकडे काही कंटेंट अशा प्रकारे येते ज्यामुळे सामाजिक तणाव, असुरक्षितता किंवा कायद्याचे उल्लंघन होऊ शकते. अशा परिस्थितीत सरकारकडे डिजिटल कंटेंट ब्लॉक करण्याचा अधिकार असतो, आणि यासाठी विशेष कायदे आणि नियम तयार केलेले आहेत. International News ब्लॉक होण्याची प्रमुख कारणे सरकार सोशल मीडियावर कंटेंट ब्लॉक करण्याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक सुरक्षेची धोकादायक माहिती, अश्लीलता, त्रस्त करणारी माहिती,फेक न्यूज, हिंसक प्रचार किंवा धर्मीय आणि जातीवर्गीय भावनांचा भडकाव होणे. उदाहरणार्थ, जर एखाद्या पोस्टमुळे देशातील शांतीत गडबड, दंगली, आतंकवादाची भीती किंवा हिंसक क्रियाकलापांना प्रोत्साहन मिळाले, तर अशा कंटेंटवर तातडीने कारवाई केली जाते. कायदे आणि नियम भारतामध्ये IT Act, 2000 आणि त्यातील Section 69A ही सरकारकडे कंटेंट ब्लॉक करण्याची अधिकृत अधिकार देणार...

Ramayana : रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली कुठे?

Image
  दसरा, विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच विजय. दृष्ट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणजे विजयादशमी. या दिवसाला अनेक अर्थाने महत्व आहे. आदिशक्तीच्या महिषासुराचा वध याच दिवशी केला. रामाने देखील युद्धात विजयादशमीलाच रावणाचा वध केला. याच मुले दसऱ्याचे दुसरे नाव विजयादशमी असे असावे. विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. या दिवसाचे रामायणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेताना रामाची हनुमान आणि वानरसेनेशी भेट झाली. सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाशी युद्ध करून पुन्हा सीतेला मिळवण्यासाठी याच वानरसेनेने मदत केली. मुख्य म्हणजे एकीकडे रावणासारख्य बलाढ्य राक्षसाची असुरी सेना, तर दुसरीकडे युद्धाचे कोणतेही प्रशिक्षण नसलेली आणि पहिल्यांदाच एवढे मोठे युद्ध करणारी रामाची वानरसेना. रामाची ही वानरसेना जवळपास एक लाखाच्या आसपास होती. (Navratri) Top stories रामाला युद्धात प्रत्येक वेळी मदत करण्यासाठी वानर सेना तत्पर होती. अगदी सीतेचा शोध घेण्यापासून ते तिला संदेश देण्यापर्यंत, रावणाशी चर्चा करण्यासाठी देखील याच वानर सेनेने मोठी भूमिका बजावल...

Hindu Festival : हिंदू सणांवेळी मास-मीटची दुकाने बंद करायचा हा मुघल बादशाह

Image
  Hindu Festival :  मुघल साम्राज्य हे भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विविधतेने समृद्ध राज्य होते. या काळात मुस्लिम सम्राट असले तरी त्यांनी हिंदू लोकांच्या धार्मिक भावना आणि सणांचे महत्त्व जाणून त्यांचा आदर केला. त्यातीलच एक उल्लेखनीय निर्णय म्हणजे, हिंदू सणांच्या दिवशी मास-मांस विक्री करणाऱ्या दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देणे. या निर्णयामुळे हिंदू लोकांना सणाच्या काळात उपास्याची आणि धार्मिक कृतीची सोय झाली. Top stories इतिहासकारांच्या नोंदींनुसार, अकबर हा मुघल सम्राट आपल्या राज्यातील सर्व धर्मांप्रती संवेदनशील होता. त्याने विविध धर्मातील लोकांशी संवाद साधला आणि त्यांची परंपरा जाणून घेतली. हिंदू सण, जसे की दिवाळी, होळी, नवरात्री, आदि या काळात लोक उपास करीत किंवा विशेष धार्मिक विधी करीत असत. त्या काळात मास-मांस विकणे किंवा त्याचा वापर करणे अनेक धार्मिक विश्वासांनुसार वर्ज्य मानले जात असे. अकबराने या धार्मिक भावना जपून सणांच्या काळात मास-मांस विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले. हा निर्णय केवळ धार्मिक भावना जपण्यासाठी नव्हे, तर सामाजिक शांतता राखण्यासाठीही महत्त्वाचा होता...