Posts

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Image
  राजस्थान   म्हटलं की समोर येतात, ते तेथील  भव्य किल्ले.   जयपूर  येथील  जलमहल ,  जोधपूर  येथील  मेहरानगढ ,  उदयपूरचा  भव्य  कुंभलगड  आणि  पुष्कर मधील जगातील  एकमेव ब्रह्माजी मंदिर.  याच राजस्थानच्या  दालबाटीच्या  चवीची भूल अवघ्या जगाला आहे. येथील  मिर्चीबडा ही सर्वत्र चवीनं खाल्ला जातो. पण याच राजस्थानची आणखी एक ओळख आता होऊ लागली आहे. या राजस्थानमधील  अ‍ॅपल बोरांनी  अवघ्या देशातील बाजारपेठ काबीज केल्याचे दृश्य आहे. राजस्थानच्या वाळवंटी भागात या अ‍ॅपल बोरांची शेती मोठ्याप्रमाणत होत आहे. सोबतच येथे  लहान बोरांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत  आहे.  (Rajasthan) Top Stories या बोरांच्या वाढत्या उत्पादनानं राजस्थानमध्ये बोरांपासून  लोणचे, जॅम, सरबत  तयार कऱण्यात येत आहे. अशा छोट्या फॅक्टरी या भागात सुरु झाल्या असून  राजस्थानमधील महिलांनी या उद्योगात पुढाकार घेतला  आहे. राजस्थानमधील बोरं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किंमतीला विकली जात आहेत. विशेष म्हणजे...

India : भारतीय खेळण्यांचे नवे युग !

Image
  पंतप्रधान  नरेंद्र मोदी   यांनी  लोकसभेत आणि राज्यसभेत  राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तवावर बोलतांना देशातील उद्योगाची माहिती दिली. त्यात  पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाचे  उदाहरण प्रामुख्यानं दिले. या दोन्ही सभागृहात पंतप्रधानांनी बोलतांना  भारतातील खेळणी उद्योग हा नव्यानं भरारी घेत असल्याचे  सांगितले. खेळण्याच्या उद्योगात तरुणांचा अधिक भरणा असून भारतीय खेळण्यांना आता  परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी  आहे. यात खेळण्यांची निर्यांत मोठ्या प्रमाणात होत असून चीनमधील खेळण्यांना रोखण्यात भारताला यश आल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी  भारतातील खेळणी उद्योगाचे वास्तव जनतेसमोर  मांडले.  (India) पंतप्रधान  नरेंद्र मोदी   यांनी  लोकसभेत आणि राज्यसभेत  राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तवावर बोलतांना देशातील उद्योगाची माहिती दिली. त्यात  पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाचे  उदाहरण प्रामुख्यानं दिले. या दोन्ही सभागृहात पंतप्रधानांनी बोलतांना  भारतातील खेळणी उद्योग हा नव्यानं भरारी घेत ...

Healthy Nails नखांचे सौंदर्य जपण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Image
  प्रत्येक मुलीसाठी, महिलांसाठी तिचे सौंदर्य खूपच आवश्यक आणि महत्वाचे असते. ती नेहमीच आपल्या चेहऱ्याची, सौंदर्याची विविध पद्धतीने काळजी घेत असते. मात्र तुम्हाला माहित आहे का? महिलांसाठी त्यांच्या चाऱ्यासोबतच अजून एक गोष्ट खूपच जवळची आणि जिव्हाळ्याची आहे. आणि ती म्हणजे त्यांची नखे. अनेकांना हे वाचून हसायला आले असेल. मात्र हे खरे आहे. प्रत्येक मुलगी आणि स्त्रियांसाठी त्यांची  नखे   (Nails)  खूपच जवळचे असतात. काही महिलांसाठी तर चेहऱ्यापेक्षा जास्त नखेच महत्वाची असतात.  (Healthy Nails) आजकाल तर नखांचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी अतिशय सुंदर आणि हटके असे नेल आर्ट देखील केले जाते. अनेकांना हे नेल आर्ट करण्याची इच्छा असते, मात्र नखेच सुंदर किंवा आकर्षक नसतात. असे देखील अनेकदा घडते की, आपण नखांची आपापल्या परीने काळजी घेत असतात, मात्र असे असूनही अनेकदा आपली नखे छोटी असली तरी तुटतात. त्यांची चमक कमी होते.  (Tips For Healthy Nails) काहींची नखे पिवळसर दिसतात. अशावेळेस आपण आपल्या चेहऱ्यासोबतच नखांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. केवळ मॅनिक्यूर करून चालत नाही. यासोबतच आपले ...

Space Waste And Volcano : या ज्वालामुखीचा स्फोट झाला तर !

Image
  मानवजातीवर येऊ घातलेल्या दोन मोठ्या धोक्यांनी शास्त्रज्ञ चिंतेत सापडले आहेत. त्यातील एक धोका हा आइसलॅंड येथील  बारदारबुंगा  ज्वालामुखीपासून आहे. तर दुसरा धोका अंतराळातील कच-यापासून आहे. या दोन्हीही धोक्यांचा प्रकोप केव्हा होईल, हे सांगता येणार नाही. तसेच त्यांच्यापासून माणसाचा बचाव कसा करायचा याचाही उपाय अद्याप हाती लागला नसल्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत सापडले आहेत. आइसलँडमधील सर्वात मोठ्या ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक असलेल्या बारदारबुंगा ज्वालामुखीत  14 जानेवारी पासून मोठ्या प्रमाणात भूकंप येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत  130 हून भूकंप येथे झाले  आहेत. तज्ञांच्या मते ज्वालामुखीचा स्फोट येण्यापूर्वीची ही परिस्थिती आहे. हा स्फोट एवढा मोठा असेल की त्यामुळे  हिमनदी  फुटू शकते. असे झाले तर जमिनीतून कधीही आगीचा पूर येऊ शकतो.  (Space Waste And Volcano) यामुळे मोठा विनाश होण्याची भीती शास्त्रज्ञांना आहे. आइसलँडमधील बारदारबुंगा ज्वालामुखीभोवती भूकंपाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यात  5.1 रीक्टर स्केलचा भूकंप ही असल्यामुळे शास्त्रज्ञ...

Black Pepper Water Benefits : थंडीत काळीमिरीचे पाणी प्यायल्याने दूर होतात या समस्या

Image
  Black Pepper Water Benefits   आयुर्वेदातील औषधांमध्ये काळीमिरीचा वापर केला जातो. काळीमिरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. याचे सेवन केल्याने काही आजारांपासून दूर राहण्यासही मदत होते. खरंतर, काळीमिरी डोळ्यांसाठी ते सूज कमी करण्यासाठी मदत करते. काळीमिरीमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फोरस, कॅरोटिन आणि थायमनसारखी पोषण तत्त्वे असतात. पण तुम्हाला माहितेय का, काळीमिरीच्या पाण्याचे सेवनाने आरोग्यासाठी कोणते फायदे होतात? काळीमिरीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. यामुळे आरोग्य हेल्दी राहते. काळीमिरीमुळे पदार्थांची चवही वाढली जाते. जाणून घेऊया काळीमिरीच्या पाण्याचे सेवन करण्याचे फायदे सविस्तर… ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात राहतो काळीमिरीची पाणी प्यायल्याने ब्लड शुगरचा स्तर कंट्रोल राहण्यास मदत होते. काळीमिरीचे पाणी शरिरात ग्लुकोजचे प्रमाण कमी करते. यामुळे ब्लड शुगरचा स्तर कमी होण्यास मदत होते. काळीमिरीचे पाणी प्यायल्याने हेल्दी राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर काळीमिरीचे पाणी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. यामध्ये असणारी तत्त्वे शरिरात...

Kinkrant संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या क्रिक्रांतबद्दलची माहिती

Image
आज सगळीकडे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संक्रांतीचा सण साजरा होत आहे. १४ जानेवारीला दरवर्षी संक्रांतीचा सण संपूर्ण देशात साजरा होतो. (काही अपवादात्मक वर्षांमध्ये १३ किंवा १५ जानेवारीला संक्रांत येते.) जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा  मकरसंक्रांती चा सण साजरा केला जातो.  (Makarsankranti) संक्रांती चा सण हा सगळीकडे तीन दिवस साजरा होतो. संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. यादिवशी भोगीची भाजी, खिचडी, वांग्याचे भरीत, भाकरी असे जेवण करून देवाला नैवैद्य दाखवतात. तर संक्रांतीच्या दिवशी गुळपोळी बनवली जाते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते.  किंक्रांत ला अनेक ठिकाणी कर असे देखील म्हटले जाते.  (Kinkrant) किंक्रांत हा दिवस अशुभ समजला जातो. पौष शुक्ल षष्ठीचा दिवस हा किक्रांत म्हणजेच करदिन मानला जातो. यादिवशी चांगले काम किंवा शुभ कार्य केले जात नाही, अशी मान्यता आहे. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासूराचा वध केला होता, त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते; त्यामु...

Thyroid ‘ही’ लक्षणे दिसताय सावधान ! कदाचित तुम्हाला थायरॉईड असू शकतो…

Image
  आजच्या आधुनिक काळात कोणालाच आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वेळ असला तरी दुसऱ्या कामांमध्ये तो निघून जातो. त्यातही आपली बदलती आणि चुकीची जीवनशैली, अयोग्य खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्बवतांना दिसत आहे. यामुळे  खासकरून महिलांमध्ये  थायरॉईड ची (Thyroid) समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. पुरुषांपेक्षा जास्त महिला  थायरॉईड   सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात आयोडीनची कमतरता असते. भारतात थायरॉईडच्या आजाराचे निदान झालेल्या लोकांची संख्या भरपूर आहे. भारतात अंदाजे ३२ टक्के लोकं थायरॉईडच्या विविध प्रकारच्या विकारांनी ग्रस्त आहेत. थायरॉईड हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटात होऊ शकतो.  थायरॉईडचे दोन प्रकार आहेत,  त्यातील एक म्हणजे ‘हायपरथायरॉईडीझम’ (Hyperthyroidism) आणि ‘हायपोथायरॉईडीझम’ (Hypothyroidism)   (Thyroid) हा आजार शरीरातील हार्मोनल असंतुलित झाल्यानंतर उद्भवतो. घशामध्ये  थायरॉईड   ग्रंथी असते, जी हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करते...

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !

Image
तिर्थराज प्रयाग  आता देश विदेशातील भाविकांच्या जयघोषांनी दुमदुमून गेले आहे.  महाकुंभ 2025   चा प्रारंभ कधी होणार याची उत्सुकता भाविकांना होती आणि महाकुंभ सुरु झाल्यापासून दिवसाला करोडो भाविक येतात  अमृत स्नान  करीत आहेत. पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाच्या दिवशी,  1.65 कोटी भाविकांनी संगमात स्नान  केले. दुस-या  अमृत स्नानाच्या दिवशी संगमामध्ये 3.5 कोटी लोकांनी स्नान  केले. संगमात स्नान केल्याची नोंद झाली आहे. सर्व आखाड्यातील साधूंनीही संगम स्नान केल्यावर अन्य भाविकांची अधिक गर्दी झाली. त्यामुळे प्रयागराज येथील आठही रेल्वे स्थानकांवर भाविकांचा महापूर आल्यासारखी परिस्थिती होती. तसेच बस स्टॅंडकडे जाणा-या रस्त्यावरही पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती होती. अनेक भाविक स्नान करुन प्रयागराजमधून बाहेर पडत असले तरी करोडो भाविक याच नगरीमध्ये राहून येथील अन्य  पवित्र स्थानांचे दर्शनही घेण्यासाठी गर्दी करीत  आहेत.  (Prayagraj) हर हर महादेवचा जयघोष प्रयागराजमधील पवित्र संगम स्थानावर करोडो भाविक स्नान  करत आहेत. यानंतर प्रयागराजमधील ...

Bhogi Bhaji भोगीच्या भाजीची पद्धत आणि महत्व

Image
  आज सर्वत्र भोगीचा सण साजरा केला जात आहे. संक्रांतीच्या आधीच एक दिवस हा भोगी (Bhogi) म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये भोगीची खास पद्धतीचे जेवण बनते. यात सर्वात जास्त आकर्षणाचा पदार्थ असतो तो, भोगीची भाजी. भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टीक पदार्थ तयार तयार केले जातात. (Bhogi Bhaji) या दिवशी भोगीची भाजी केली जाते. भोगी हा सण हिवाळ्यात येतो म्हणून या काळात मिळणाऱ्या अनेक भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकून ही भोगीची चविष्ट भाजी बनवली जाते. अनेक भाज्या एकत्र केल्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक आणि सकस बनते. थंडीच्या दिवसात प्रत्येक जणं ही भाजी खातोच. भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करुन भोगीची भाजी, भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याचीही पध्दत आहे.  (Makar Sankrant 2025) थंडीच्या दिवसात किंवा हिवाळ्यात भोगीची भाजी खाण्याचे अनेक फायदे शरीराला होतात. मुळातच थंड वातावरण असल्याने आपल्याला थंडीचा आणि याकाळात होणाऱ्य...