Posts

Showing posts from February, 2026

ITR रिफंड उशीरा आला तरी व्याज मिळालं नाही? करदात्यांचे हक्क

  ITR :   आयकर विवरणपत्र (ITR) भरल्यानंतर अनेक करदाते रिफंडची वाट पाहत असतात. नियमांनुसार रिफंड ठराविक कालावधीत मिळणे अपेक्षित असते. मात्र अनेक वेळा रिफंड उशीरा येतो आणि त्यावर मिळणारे व्याजही खात्यात जमा झालेले दिसत नाही. अशा वेळी करदात्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो—उशीरा रिफंड आल्यास व्याज मिळायलाच हवे का, की काही अटी लागू होतात? आयकर कायद्यानुसार या संदर्भात स्पष्ट नियम आहेत, असे करतज्ज्ञ सांगतात.  (ITR) आयकर कायद्यातील कलम 244A नुसार, करदात्याचा रिफंड उशिरा मिळाल्यास त्यावर व्याज देणे बंधनकारक आहे. साधारणपणे  वार्षिक 6 टक्के दराने  (म्हणजे दरमहा 0.5 टक्के) व्याज दिले जाते. हे व्याज रिफंडची रक्कम देय झालेल्या तारखेपासून ते प्रत्यक्ष रिफंड मिळेपर्यंत मोजले जाते. उदाहरणार्थ, अ‍ॅडव्हान्स टॅक्स किंवा TDS जास्त कापला गेला असल्यास आणि रिफंड देण्यात उशीर झाला, तर करदात्याला व्याज मिळण्याचा हक्क असतो.  (ITR) मात्र प्रत्येक प्रकरणात व्याज मिळेलच असे नाही. काही परिस्थितींमध्ये आयकर विभाग व्याज देत नाही. उदाहरणार्थ, ITR उशिरा भरल्यास किंवा रिटर्नमध्ये चूक असल्या...

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग

  महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. सर्वच मराठी लोकांची आण, बाण आणि शान म्हणजे महाराज. ज्यांनी आपल्याला स्वराजायचे केवळ स्वप्न दाखवले नाही तर ते स्वप्न सत्यात देखील उतरवले आणि स्वराज्यात जगायला शिकवले देखील असा आपला सर्वांचा लाडका राजा म्हणजे शिवाजी महाराज. उत्तम राजा कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले महाराज. १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले.   (Shivaji Maharaj) वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून “हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” असे म्हणत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी आपल्या अफाट बुद्धिमत्ता, शौर्य आणि कुशल प्रशासनाच्या जोरावर गुलामगिरीच्या अंधारात असलेल्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट दाखवली. शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्यच स्थापन केले नाही, तर स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे हित आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला. आज शिव जयंतीच्या निमित्ताने आपण महाराजां...