Anandibai Joshi : एका सामान्य स्त्रीची असामान्य यशोगाथा – डॉक्टर आनंदीबाई जोशी

 

आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही, जे स्त्रीने पादाक्रांत केले नाही. ज्या क्षेत्रांमध्ये कधी काळी केवळ पुरुषांचे वर्चस्व होते, त्या क्षेत्रांमध्ये आज महिला मोठ्या संख्येने काम करताना आपल्याला दिसत आहे. मात्र आजच्या महिला असे असामान्य कर्तृत्व करत आपला डंका वाजवत आहे, असे नाही. पूर्वीच्या काळी अर्थात ब्रिटिश काळात देखील आपल्या भारतीय महिलांनी त्यांच्या असलेल्या असामान्य कर्तृत्वाचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले. आज आपण अशाच एका सामान्य स्त्रीची असामान्य गौरवगाथा जाणून घेणार आहोत. (Anandibai Joshi) Latest Marathi News

आज आपण डॉक्टरांशिवाय आपल्या समाजाचा विचारच करू शकत नाही. डॉक्टर आपल्या समाजाचा पर्यायाने आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अगदी सध्या सर्दी खोकल्यापासून ते अनेक गंभीर आजारांपर्यंत डॉक्टर कायमच आपल्यावर उपचार करत आपल्याला बरे करतात. आपल्यासाठी देवासमान असणाऱ्या या डॉक्टरांचे समाजात स्थान कायम वर असते. आज पुरुष, महिला दोघेही या क्षेत्रात सामान स्थानावर काम करत रुग्ण सेवा करतात. या क्षेत्रात कदाचित पुरुषांपेक्षा महिलाच जास्त असतील. आपल्या देशातील अनेक महिला डॉक्टरांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अटकेपार झेंडे लावत देशाचे नाव रोशन केले आहे. मात्र आज ज्या क्षेत्रात महिला मोठ्या अभिमानाने वावरताना दिसतात, त्याच क्षेत्रात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळाला होता डॉक्टर आनंदीबाई गोपालदास जोशी यांना. (Marathi Latest News)

आनंदीबाई यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितींवर मात करत एक सामान्य स्त्री ते भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा खडतर प्रवास केला. नवऱ्याच्या भक्कम साथीने त्यांनी ही पदवी संपादन केली. समाजातील अनेक रुढी, परंपरांना मोडता घालत त्यांनी हे यश मिळवले. आज आपण या लेखातून आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल आणि त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. (Marathi Top Headline)

आनंदीबाई यांच्या जन्म ३१ मार्च १८६५ रोजी रूढवादी ब्राह्मण कुटुंबात कल्याणमध्ये झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणार्‍या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. त्या काळात मुलींना जास्त शिकवण्याची प्रथा नव्हती. बंदिस्त चार भिंतींच्या आत मुलींचे जग होते. मुलींचा बालवैव्ह करण्याची प्रथा खूपच प्रसिद्ध होती. समाजरीतीप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी आनंदीबाई यांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोपाळ जोशी यांच्याशी झाला. गोपाळ जोशी हे पोस्टात नोकरीला होते. (Marathi Top Headline)

लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे जुने नाव बदलून आनंदीबाई असे नवीन नामकरण केले. वयाच्या १४ व्या वर्षीच आनंदीबाई या एका मुलाची आई झाल्या, परंतु ते बाळ आजारी पडले आणि दुर्दैवाने योग्य उपचार न मिळाल्यामुळे केवळ १० दिवसातच त्या बाळाचे निधन झाले. कोणत्याही आईच्या आयुष्यात हा क्षण अतिशय वाईट आणि दुर्दैवी आहे. पुत्र वियोगापेक्षा कोणतेही मोठे दुःख आईसाठी असूच शकत नाही. या घटनेचा आनंदीबाई यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांच्या डोक्यात क्षणात एक विचार आला की, जर मी डॉक्टर असते तर आज हा दुःखाचा प्रसंग माझ्यावर ओढवला नसता. (Top Stories)

ज्या काळात मुलींचे बालविवाह व्हायचे, ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, महिलांना एकटीने घराबाहेर जाणेही वर्ज्य होते, केवळ चूल आणि मुलं अशा खडतर काळात आनंदीबाईंनी एकटीने परदेशात जाऊन डॉक्टरकीची पदवी संपादन केली. हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबातच सोपा नव्हता. यासाठी आनंदीबाईंनी आणि त्यांच्या पती गोपाळरावांनी सर्वात जास्त परिश्रम घेतले. गोपाळरावांच्या हट्ट होता की, त्यांच्या पत्नीला उत्तम शिक्षण मिळावे आणि त्यांना इंग्रजी भाषा यावी. त्यासाठी जितकी मेहनत आनंदीबाईंनी घेतली. तितकीच मेहनत गोपाळरावांनीही घेतली. यासाठी गोपाळरावांनी सर्वांचाच तिरस्कार पत्करला. कधी कधी आनंदीबाई स्वतःच समाजाचा, कुटूंबाचा विचार करुन शिकण्यास नकार देत. त्यांचा स्वभाव खूपच विक्षिप्त आणि चिडखोर होता. असे असले तरी आपल्या पत्नीला शिकवण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. (Scoail News/ Updates)

गोपाळरावांनी आनंदीबाईंना घरीच प्राथमिक शिक्षण दिले, मात्र शालेय शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी आनंदीबाईंना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरला खास मुलीची शाळा आहे हे गोपाळरावांना समजलं तेव्हा त्यांनी स्वतःची बदली कोल्हापूरला करून घेतली आणि इंग्रजी मिशनरी स्कुलमध्ये आनंदीबाईंचे शिक्षण सुरु केले. मात्र त्यांचा हा प्रवास काट्याकुट्यांनी भरलेला होता. शाळेतील ख्रिस्ती मुली आनंदीबाईंना अतिशय हीन वागणूक देत असत. शाळेत त्यांचा खूपच छळ केला जाई. मात्र हार मानतील त्या आनंदीबाई कसल्या. अशा परिस्थितीतही त्या कणखर राहिल्या. एकीकडे रूढीवादी हिंदू आणि दुसरीकडे ख्रिस्ती सह विद्यार्थिनी यांच्या कडून होणारा त्रास त्यांच्या संयमाची परीक्षा पाहत होता. (Latest Marathi News)

Anandibai Joshi

बाळ गमावल्याच्या घटनेने आनंदीबाईंना केवळ शिक्षण नाही तर डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याची प्रेरणा दिली. यानंतर आनंदीबाईंचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याकाळात परदेशी जाऊन शिक्षण घेणे सोपे नव्हते अशा वेळी सुरुवातीला आनंदीबाईंना यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल असे सांगण्यात आले. गोपाळराव कट्टर हिंदुत्ववादी होती. त्यामुळे धर्मांतर न करता त्यांनी आनंदीबाईंना परदेशात शिकण्यासाठी पाठवण्याचे प्रयत्न केले.

हे प्रयत्न चालू असतानाच गोपाळरावांची सरकारी नोकरी गेली. ख्रिस्ती धर्म न स्विकारता परदेशी शिक्षण घेण्याची शक्यता दिवसांगणिक धूसर होऊ लागली. मात्र अशातच अमेरिकेतून कार्पेंटर बाईचं पत्र आलं. आनंदीबाईंची शिक्षणाप्रती ओढ पाहून केवळ मासिकातील छापील पत्र पाहून अमेरिकेत शिक्षणाचा खर्च, राहण्याची सोय यांसाठी यांनी तयारी दाखवली. Woman’s Medical College of Pennsylvania मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. आनंदीबाईंना १८८३ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी ख्रिस्ती धर्म न स्विकारता पेन्सिल्व्हिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर त्यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. मात्र प्रवासातील दगदग यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. यात त्यांना अमेरिकेतील काही नागरिकांनीही चांगलीच मदत केली. तत्कालिन व्हाईसराय यांनीही आनंदीबाई यांना २०० रुपयाचा निधी दिला होता. (Todays Marathi News )

===========

हे देखील वाचा : Sarah and Yaron : बुंदुकीच्या दोन गोळ्यांनी संपवली एक प्रेमकहाणी !

Tata Altroz : टाटाची अल्ट्रोझ फेसलिफ्ट कार भारतात लाँच ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये

===========

आनंदीबाई यांना १८८६ मध्ये एमडीची पदवी प्रदान करण्यात आली. आनंदीबाई यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम डीच्या पदवीसाठी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र या विषयावर आपला प्रबंध सादर केला. अमेरिकेमध्ये वैद्यशास्त्राची पदवी मिळवणार्‍या आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांचं कौतुक अमेरिका, भारतमध्ये झालंच मात्र त्यासोबत लंडनची राणी व्हिक्टोरिया यांनीदेखील आनंदीबाईचं कौतुक केलं होतं.

एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला. मात्र अमेरिकेतून परतल्यावर काही दिवसातच त्यांना क्षयरोगाची लागण झाली. त्यातच वयाच्या केवळ २० व्या वर्षी २६ फेब्रुवारी १८८७ ला आनंदीबाईंचा मृत्यू झाला. कायम आपल्या जिद्दीने आणि कष्टाने आजही महिलेला प्रेरित करणाऱ्या आनंदीबाई यांचे समाजातील स्थान कायम अबाधित राहील. त्यांचे आयुष्य आजच्या आणि येणाऱ्या काळातील महिलांसाठी एक आदर्श ठरणारे आहे. Top Marathi Headlines

Original content is posted on https://gajawaja.in/anandi-gopal-joshi-know-about-first-indian-woman-doctor-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !