Posts

Showing posts from May, 2025

Jawaharlal Nehru : ब्रिटिशांनी पंडित नेहरूंवर लावलेल्या आरोपांबद्दल माहितेय का?

Image
  Jawaharlal Nehru  : आधुनिक भारताचे शिल्पकार आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आपल्या आयुष्यात एकूण नऊ वेळा तुरुंगवास पत्करला. त्यांनी ३२५९ दिवस, म्हणजेच नऊ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला. 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या पंडित नेहरूंचे प्राथमिक शिक्षण खाजगी शिक्षकांकडून झाले. वयाच्या 15 व्या वर्षी ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी हॅरो येथे शिक्षण घेतले आणि पुढे केंब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी थेट ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारला, ज्यासाठी त्यांना वारंवार तुरुंगात जावे लागले. Todays Marathi News स्वातंत्र्यचळवळीकडे ओढ विद्यार्थीदशेतच नेहरू परकीय सत्तेखाली असलेल्या देशांच्या स्वातंत्र्य लढ्यांत रस घेऊ लागले होते. त्यांना आयर्लंडमधील ‘सिन फेन’ चळवळ खूप आवडत होती. भारतात परतल्यावर त्यांनी बंकीपूर परिषदेत प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. 1919 मध्ये ते अलाहाबादच्या होमरूल लीगचे सचिव झाले आणि 1916 मध्ये महात्मा गांधींशी पहिली भेट झाली. 1920 मध्ये त्यांनी उत...

Ashok Saraf : पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना पायलट भाची कडून मिळाले सरप्राइज

Image
  महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना २७ मे रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात संपन्न झालेल्या सोहळ्यात पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांना भारत सरकारचा हा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली. नाटकं, चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमधून अतुलनीय कामगिरी करत त्यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फक्त कॉमेडीच नाही तर खलनायकी, गंभीर, रोमॅंटिक आदी सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. आज या दिग्गज कलावंताचा पद्मश्री देऊन केला गेलेला गौरव म्हणजे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर लावलेली सर्वात मोठी मोहर आहे. (Ashok Saraf) अशोक मामांना पद्मश्री दिल्यानंतर त्यांचे फॅन असलेले सर्वच लोकं विविध मार्गाने आपला आनंद, आपले त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. अशातच एक सुंदर योगायोग देखील घडून आला. अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्यानंतर ते दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले. ते मुंबईला येत असलेल्या फ्लाईटमध्ये त्यांना एक गोड आणि भावनिक सरप्राइज मिळाले. झाले असे की, अशोक मामा यांची भाची अदिती ही पा...

अशोक सराफ म्हणाले, “मला विसरले असते तर मी…

Image
  मराठी मनोरंजनविश्वासाठी २७ मे हा दिवस ऐतिहासिक आणि सोबतच अभिमानाचा देखील ठरला. याच दिवशी मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे बेताज बादशहा असलेल्या अशोक सराफ यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जानेवारी २०२५ रोजी अशोक सराफ यांना पदमश्री मिळाल्याची घोषणा झाली होती त्यानंतर २७ मे रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Ashok Saraf) Top Marathi Headlines २७ मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वत्र फक्त अशोक सराफ यांचीच चर्चा आहे. अभिनय सम्राट अशोक सराफ यांच्या बहारदार अभिनय कारकिर्दीला पद्मश्री पुरस्कारामुळे एक नवी झळाळी आली आहे. कला क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अशोक सराफ यांना हा मोठा पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील अशोक स...

Anandibai Joshi : एका सामान्य स्त्रीची असामान्य यशोगाथा – डॉक्टर आनंदीबाई जोशी

Image
  आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही, जे स्त्रीने पादाक्रांत केले नाही. ज्या क्षेत्रांमध्ये कधी काळी केवळ पुरुषांचे वर्चस्व होते, त्या क्षेत्रांमध्ये आज महिला मोठ्या संख्येने काम करताना आपल्याला दिसत आहे. मात्र आजच्या महिला असे असामान्य कर्तृत्व करत आपला डंका वाजवत आहे, असे नाही. पूर्वीच्या काळी अर्थात ब्रिटिश काळात देखील आपल्या भारतीय महिलांनी त्यांच्या असलेल्या असामान्य कर्तृत्वाचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले. आज आपण अशाच एका सामान्य स्त्रीची असामान्य गौरवगाथा जाणून घेणार आहोत. (Anandibai Joshi) Latest Marathi News आज आपण डॉक्टरांशिवाय आपल्या समाजाचा विचारच करू शकत नाही. डॉक्टर आपल्या समाजाचा पर्यायाने आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अगदी सध्या सर्दी खोकल्यापासून ते अनेक गंभीर आजारांपर्यंत डॉक्टर कायमच आपल्यावर उपचार करत आपल्याला बरे करतात. आपल्यासाठी देवासमान असणाऱ्या या डॉक्टरांचे समाजात स्थान कायम वर असते. आज पुरुष, महिला दोघेही या क्षेत्रात सामान स्थानावर काम करत रुग्ण सेवा करतात. या क्षेत्रात कदाचित पुरुषांपेक्षा महिलाच जास्त असतील. आपल्या दे...

Success Story : वडील सैन्यात अधिकारी, मुलगी IAF च्या मागी स्क्वाड्रनची प्रमुख वर्लिन पनवार, आता बॉलिवूडच्या कलाकारांना देतेय ट्रेनिंग

Image
  Varlin Panwar Success Story : लष्करी कुटुंबांची जीवनशैली ही नेहमीच सामान्य कुटुंबांपेक्षा वेगळी असते. अशाच एका लष्करी वातावरणात वाढ झालेल्या व्हर्लिन पनवार यांचे वडील भारतीय लष्करात होते. लहानपणापासून शिस्त, समर्पण आणि दिनचर्येचे संस्कार त्यांच्या मनात इतके खोलवर रुजले की त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैनिकी जीवनाची वाट निवडली. व्हर्लिन पनवार यांनी भारतीय हवाई दलात तब्बल १० वर्षे स्क्वॉड्रन लीडर म्हणून सेवा दिली आणि २०१८ मध्ये त्या निवृत्त झाल्या. Celebrity News निवृत्तीनंतरही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी आपले सैनिकी ज्ञान आणि कौशल्य विविध क्षेत्रांत उपयोगात आणले. आयपीएलमधील तांत्रिक सुरक्षा व्यवस्थेत काम करणे असो, किंवा हवाई दलावर आधारित चित्रपटांमध्ये कलाकारांना प्रशिक्षण देणे असो, त्यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःचे 100 टक्के दिले. त्यामुळेच त्यांची ही यशोगाथा लष्करात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.( Latest Marathi News ) ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत व्हर्लिन पनवार यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांची तैनाती विव...

China : भारताचा कट्टर वैरी असलेल्या चीनमध्ये ‘या’ मराठी माणसाची केली जाते पूजा

Image
  चीन म्हणायला भारताचा शेजारचा देश आहे. मात्र शेजार धर्म तो कधीच पाळताना दिसत नाही. आपण नेहमी असे म्हणतो की, “पहिला नातेवाईक शेजारी” पण चीन भारताचा नातेवाईक सोडा शेजारी देखील होऊ शकला नाही. कायम भारताच्या पाठीत खंजीर खुपसणारा चीन आपला शेजारी असल्याचे दुःख सर्वच भारतीयांना आहे. शेजारी राहून सतत भारतावर कुरघोडी करण्यातच धन्यता मानणाऱ्या चीनचे आणि आपले नाते तर जगजाहीर आहे. पाकिस्ताननंतरचा भारताचा दुसरा मोठा शत्रू म्हणून चीनची ओळख आहे. चीनने नेहमीच पाकिस्तानला भारताविरोधात जाऊन पाठिंबा दिला आहे. कधी पाकिस्तानला त्यांनी उघड पाठिंबा दिला तर कधी छुपा पाठिंबा दिला. (China) International News शिवाय चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा देखील पुरवठा करण्यात येतो , ज्याचा वापर पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांसाठी केला जातो. “शत्रूचा शत्रू आपला मित्र” या वाक्यानुसार भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानचा चीन मित्र बन्सल आणि कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. चीन आणि भारताचे नाते कधी चांगले होईल आणि होईल की नाही हे माहित नाही. मात्र असे असले तरी चीनबद्दल एक हटके गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. (Mar...

RTO : महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्यात होणार नवीन आरटीओ ऑफिस

Image
  महाराष्ट्र्र अतिशय वेगाने विकसित होत आहे. महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्रातील शहरं आणि तालुक्यांचाही झपाट्याने विकास होताना दिसत आहे. या होणाऱ्या विकासामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तालुक्यांचा विकास देखील खूपच वाढत आहे. राज्यातील या वाढत्या विकासामुळे विविध जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये वाहनांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढत आहे. आणि म्हणूनच राज्यात नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत आता महाराष्ट्रातील एका तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. (RTO) Marathi News आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ आरटीओ (RTO) नंबर आहेत. या आरटीओ नंबरचा वापर वाहन नोंदणीसाठी केला जातो. राज्यात विविध प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत, जी MH-1 ते MH-56 पर्यंतच्या क्रमांकांनी ओळखली जातात. मात्र आता यात अजून एका नंबरची भर पडली आहे. १ मार्च २०२५ रोजी मीरा-भाईंदर येथे राज्यातील ५८ वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला MH 59 हा नवीन RTO क्रमांक देण्यात आला आहे. (Marathi Top News) ‘जत’सा...

Career : १० वी नंतर काय करायचे…?

Image
  शाळेत जायला सुरुवात झाल्यापासूनच आई-वडिलांना आणि समजायला लागल्यावर विद्यार्थ्यांना देखील १० वीचे खूपच टेन्शन असते. १० वी बोर्डाची परीक्षा, शिवाय यानंतर मुलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्याची संधी येते. म्हणूनच १० वी आपल्या करियरचा बेस समजला जातो. यासाठी रात्रंदिवस जागून मुलं १० वी चा अभ्यास करतात. १० वी चा निकाल लागणार म्ह्टल्यावरच सगळ्यांच्या मनात धडकी भरते. (Career) पास होणार हे माहित असले तरी किती मार्क्स मिळणार? आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्याला ऍडमिशन मिळेल ना? काहींना तर मी पास होईल ना? हा पण प्रश्न पडतो. तर काही लोकांचे असते निकाल लागल्यानंतर मार्क्स पाहून ठरवू कोणत्या क्षेत्रात करियर करायचे. असे अनेक प्रश्न सगळ्यांना सतावत असतात. आज आम्ही तुमचे हेच काम थोडे सोपे करणार आहोत. १० वी नंतर कोणकोणते करियर ऑप्शन तुमच्यासमोर आहेत हे आज जाणून घेऊया. (Marathi News) Latest Marathi News १० वी नंतर शैक्षणिक पर्याय > इयत्ता अकरावी आणि बारावी > डिप्लोमा कोर्सेस > मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस > पॉलिटेक्निक कोर्सेस > प्रोफेशनल कोर्सेस > आयटीआय कोर्सेस दहावीनंतर...