Posts

Showing posts from June, 2025

Fathers Day : जाणून घ्या फादर्स डे चा इतिहास आणि महत्व

Image
  “कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात, हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात माया बाबांची असते कस्तुरीपरी दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी” या ओळी कुठे तरी वाचनात आल्या होत्या. या ओळींचा मतितार्थ इतका सुंदर आणि मनास भिडणारा आहे की, त्या ओळी थेट मनाच्या भिंतीवर कोरल्याचं गेल्या. आपल्या आयुष्यातील ‘वडील’ रुपी देवाला शब्दात मांडायचा अतिशय उत्तम प्रयत्न आहे हा. कायम आईबद्दल, आईच्या प्रेमाबद्दल, आईच्या त्यागाबद्दल, आईच्या महतीबद्दल बोलले जाते. आईच्या कोणत्याही गोष्टीबद्दल कधीच शंका नसते. मात्र कधी कधी आईच्या पुढे बाप काहीसा मागे पडतो. जरी वडिलांचे प्रेम, कष्ट, माया, त्याग स्पष्ट दिसत नसले तरी त्यांच्या अस्तित्वाशिवाय सर्वच नगण्य असते. प्रत्येक घरातला खरा आधार हे वडीलच असतात. वरवर कितीही कठोर, शिस्तप्रिय दिसणारे वडील प्रत्यक्षात मात्र सर्वात जास्त हळवे आणि प्रेमळ असतात. (Fathers Day) Top Marathi Headlines मात्र जबाबदाऱ्यांमध्ये, कर्तव्यांमध्ये दबलेल्या वडिलांना त्यांची दुसरी बाजू कधी दाखवताच येत नाही. अशा या वडिलांचा आपल्याल...

Plane Crash : विमान, हेलिकॉप्टर अपघातात भारतातील ‘या’ दिग्गज लोकांचा झाला मृत्यू

Image
  गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान गुरुवारी १२ जून रोजी दुपारी १.३० च्या सुमारास कोसळून भीषण अपघात झाला होता. या एअर इंडियाच्या बोइंग 787 या प्रवासी विमानातून क्रू मेंबर्ससह 244 प्रवासी प्रवास करत होते. यातला फक्त एकच प्रवासी वाचला बाकी सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच मेघानी परिसरात मेडिकल स्टुडंटन्सच्या होस्टेलवर कोसळले. या अपघातामध्ये मृत झालेल्या लोकांना ओळखणे देखील कठीण झाले आहे. डीएनए टेस्ट करून मृतांची ओळख पटवली जात आहे. सध्या हे काम खूपच जोरात सुरु आहे.(Plane Crash) Marathi News या मोठ्या दुर्दैवी अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्याआधीच त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात होता. यापूर्वी भारतात अनेक मोठे विमान अपघात झाले, ज्यात अनेक नामचीन व्यक्तींनी , नेत्यांनी आपले प्राण गमावले जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… (Marathi News) संजय गांधी संजय गांधी भारताच्या पहिला म...

Vat Purnima : वडाच्या झाडाचे आरोग्यदायी आणि आध्यात्मिक फायदे

Image
  उद्या सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या आणि कुटुंबाच्या आनंदी जीवनासाठी केल्या जाणाऱ्या व्रतांपैकी महत्वाचे व्रत म्हणजे ‘वटपौर्णिमा’. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सावित्रीने तिचा पती असलेल्या सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत घेतले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. या झाडाला धार्मिक महत्व खूप आहे. वडाच्या झाडामध्ये देवांचा वास असल्याची मान्यता आहे. (Vat Purnima) धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षात ब्रह्मा, श्री हरीविष्णू आणि शिव यांचा वास असतो. वडाच्या झाडांचे आयुष्य जास्त असल्याने त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हटले जाते. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवाने वटवृक्षाखाली बसून तपश्चर्या केले असल्याचे सांगितले जाते. शिवाय मार्कंडेयांना वटवृक्षाच्या पानांवरच भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले असल्याचे सांगितले जाते. देवी सावित्रीचाही वृक्षात वास असतो....