Posts

Showing posts from June, 2025

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांनी अवकाश मोहिमेसाठी गाजर हलव्यासोबतच घेतल्या ‘या’ खास गोष्टी

Image
  मोठया प्रतिक्षेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज एक्सिओम-4 मिशनसाठी रवाना झाले. दुपारी १२.०१ मिनिटांनी मिशन लॉन्च झाले. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकात जात आहेत. सर्व अंतराळवीर स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान सुमारे २८.५ तासांनंतर २६ जून रोजी दुपारी ४:३० वाजता आयएसएसशी जोडले जाईल. नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. X-4 संघात पोलंडच्या स्लावोज उझ्न्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीच्या टिबोर कापू यांचाही समावेश आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. (Shubhanshu Shukla) International News शुभांशू अवकाशात १४ दिवस राहतील आणि भारतीय शैक्षणिक संस्थांनी डिझाइन केलेले ७ प्रयोग करतील. अ‍ॅक्स-४ मोहिमेचा मुख्य उद्देश अवकाशात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे आहे. हे अभियान खाजगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील आहे आणि अ‍ॅक्सियम स्पेस नियोजनाचा एक भाग आहे. याशिवाय, ते नासासोबत आणखी ५ प्रयोग करतील, जे...

America : अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये इराणचे अणू प्रकल्प उध्वस्त, काय आहे बंकर बस्टर बॉम्ब?

Image
  इस्राएल आणि इराण यांच्यामध्ये होणाऱ्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मागील अनेक दिवसांपासून या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले मात्र हे युद्ध काही शमण्याचे नाव घेत नाही. अशातच आता या युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतली आहे. या युद्धामध्ये अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत असून, इराणच्या विरोधात उभी आहे. शनिवारी अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केला आहे. अमेरिकेने इराणच्या या तीन अणुऊर्जा केंद्रांना उद्ध्वस्त करण्यासाठी १४ टन वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वापरले आहेत. (America) International News शनिवारी मध्यरात्री अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला असून, यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांचा समावेश आहे. हे हल्ले अमेरिकन हवाई दलाच्या सर्वात प्रगत समजल्या जाणाऱ्या फायटर जेट बी२ बॉम्बर्सने केले गेले आहेत. सांगितले जात आहे की, या बॉम्बर्सनी या तीन ठिकाणी हजारो किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब टाकले. हे बॉम्ब बंकर बस्टर बॉम्ब म्हणून प्रसिद्ध आहेत. या बॉम्बला एमओपी अर्थात मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर असेही म्...

Aamir Khan : ‘सितारे जमीन पर’ सिनेमाने पहिल्या तीन दिवसातच वसूल केले सिनेमाचे अर्धे बजेट

Image
  नुकताच आमिर खानचा बहुप्रतीक्षित असा ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आमिरने देखील या सिनेमाचे भरपूर प्रमोशन केले. विविध ठिकाणी, विविध पद्धतीने त्याने या सिनेमाला प्रमोट केले. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या होत्या. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आणि सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यश मिळवले. (Aamir khan) Latest Entertainment News काही वर्षांपूर्वी आमिर खानचा सुपरहिट असा ‘तारे जमीन पर’ सिनेमा आला होता. या सिनेमाने चित्रपटसृष्टीत एक वेगळी छाप सोडली आहे. आजही या सानमचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. या सान्मातून आमिर खानने डिस्लेक्सिया आजार असलेल्या मुलांच्या भावविश्वावर भाष्य केले होते. आता प्रदर्शित झालेला ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाद्वारे आमिर खान एक पाऊल पुढे जात डाउन सिंड्रोम आणि न्यूरो डायव्हर्जन्स सारख्या गंभीर आणि महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. (Marathi Latest News) Marathi News ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळ...

Fathers Day : जाणून घ्या फादर्स डे चा इतिहास आणि महत्व

Image
  “कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात, हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात माया बाबांची असते कस्तुरीपरी दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी” या ओळी कुठे तरी वाचनात आल्या होत्या. या ओळींचा मतितार्थ इतका सुंदर आणि मनास भिडणारा आहे की, त्या ओळी थेट मनाच्या भिंतीवर कोरल्याचं गेल्या. आपल्या आयुष्यातील ‘वडील’ रुपी देवाला शब्दात मांडायचा अतिशय उत्तम प्रयत्न आहे हा. कायम आईबद्दल, आईच्या प्रेमाबद्दल, आईच्या त्यागाबद्दल, आईच्या महतीबद्दल बोलले जाते. आईच्या कोणत्याही गोष्टीबद्दल कधीच शंका नसते. मात्र कधी कधी आईच्या पुढे बाप काहीसा मागे पडतो. जरी वडिलांचे प्रेम, कष्ट, माया, त्याग स्पष्ट दिसत नसले तरी त्यांच्या अस्तित्वाशिवाय सर्वच नगण्य असते. प्रत्येक घरातला खरा आधार हे वडीलच असतात. वरवर कितीही कठोर, शिस्तप्रिय दिसणारे वडील प्रत्यक्षात मात्र सर्वात जास्त हळवे आणि प्रेमळ असतात. (Fathers Day) Top Marathi Headlines मात्र जबाबदाऱ्यांमध्ये, कर्तव्यांमध्ये दबलेल्या वडिलांना त्यांची दुसरी बाजू कधी दाखवताच येत नाही. अशा या वडिलांचा आपल्याल...

Plane Crash : विमान, हेलिकॉप्टर अपघातात भारतातील ‘या’ दिग्गज लोकांचा झाला मृत्यू

Image
  गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान गुरुवारी १२ जून रोजी दुपारी १.३० च्या सुमारास कोसळून भीषण अपघात झाला होता. या एअर इंडियाच्या बोइंग 787 या प्रवासी विमानातून क्रू मेंबर्ससह 244 प्रवासी प्रवास करत होते. यातला फक्त एकच प्रवासी वाचला बाकी सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच मेघानी परिसरात मेडिकल स्टुडंटन्सच्या होस्टेलवर कोसळले. या अपघातामध्ये मृत झालेल्या लोकांना ओळखणे देखील कठीण झाले आहे. डीएनए टेस्ट करून मृतांची ओळख पटवली जात आहे. सध्या हे काम खूपच जोरात सुरु आहे.(Plane Crash) Marathi News या मोठ्या दुर्दैवी अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्याआधीच त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात होता. यापूर्वी भारतात अनेक मोठे विमान अपघात झाले, ज्यात अनेक नामचीन व्यक्तींनी , नेत्यांनी आपले प्राण गमावले जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… (Marathi News) संजय गांधी संजय गांधी भारताच्या पहिला म...

Vat Purnima : वडाच्या झाडाचे आरोग्यदायी आणि आध्यात्मिक फायदे

Image
  उद्या सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या आणि कुटुंबाच्या आनंदी जीवनासाठी केल्या जाणाऱ्या व्रतांपैकी महत्वाचे व्रत म्हणजे ‘वटपौर्णिमा’. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सावित्रीने तिचा पती असलेल्या सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत घेतले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. या झाडाला धार्मिक महत्व खूप आहे. वडाच्या झाडामध्ये देवांचा वास असल्याची मान्यता आहे. (Vat Purnima) धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षात ब्रह्मा, श्री हरीविष्णू आणि शिव यांचा वास असतो. वडाच्या झाडांचे आयुष्य जास्त असल्याने त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हटले जाते. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवाने वटवृक्षाखाली बसून तपश्चर्या केले असल्याचे सांगितले जाते. शिवाय मार्कंडेयांना वटवृक्षाच्या पानांवरच भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले असल्याचे सांगितले जाते. देवी सावित्रीचाही वृक्षात वास असतो....