Posts

Showing posts from April, 2025

उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे

Image
  Heat Stroke Symptoms : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरलेली आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार गेला आहे. सकाळच्या सुमारास कडाक्याच्या उन्हाचा त्रास अनेकांना होत आहे. अशातच उष्माघाताच्या समस्येपासन बचाव करणे महत्वाचे आहे. यावेळी बॅलेंस डाइट घेणं, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, लिंबू सरबत, नारळ पाणी, ज्यूस आणि हेल्दी ड्रिंक्स प्या. जेणेकरुन हाइड्रेट राहण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या दिवसात काही समस्यांपासून दूर राहण्यासाठी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा. खासकरुन दुपारी 12-3 वाजल्यादरम्यान जाणे टाळा. तरीही उष्माघाताचा त्रास होत असल्यास काही गोष्टींची काळजी घ्यावी. उष्माघाच्या काही लक्षणांकडे वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागू शकतो. याबद्दलच पुढे जाणून घेऊ… Top Marathi Headlines हिट स्ट्रोकची लक्षणे -शरीरातलं तापमान उन्हामुळे अत्याधिक वाढणे – नाडी आणि श्वच्छोश्वास घेण्याची क्रिया वेगाने होणे -तीव्र डोकेदुखी होऊन चक्कर येणे -मळमळ आणि उलटी होणे, अस्वस्थ वाटणे -गोंधळ्यासारखे वाटणे आणि अस्पष्टपणे बोलणे -चेहेरा लालसर होणे -बेशुद्धी येणे ...

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Image
  Mental Health Care Tips : वाढत्या वयासह आपल्या फिजिकल आणि मानसिक आरोग्यामध्ये काही बदल होत असतात. खरंतर, वाढत्या वयासह हार्मोनल बदल होत असल्याने याचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. वयाच्या 20 व्या वर्षानंतर स्वभाव थोडा बदललेला दिसतो. यावेळीच मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यावश्यक आहे. मानसिक आरोग्याची काळजी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने घेतली पाहिजे. मात्र 20 व्या वर्षात का असे करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया. Latest Marathi News आयुष्य वेगाने बदलते वयाच्या 20 व्या वर्षात आयुष्य वेगाने बदलत असते. यावेळी व्यक्तीवर काही जबाबदाऱ्या येण्यास सुरुवात होते. अशातच काहींना घर सोडावे लागते, कमाई करावी लागते तर काही नवे नातेसंबंध प्रस्थापित होतात. अशा काही गोष्टींमुळे स्ट्रेस, एंग्जायटी आणि आत्मविश्वास कमी होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. मानसिक विकास होतो वयाच्या 20 व्या वर्षात व्यक्तीचा मानसिक विकास वेगाने होतो. अशातच आयुष्यात काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. यावेळी स्वत:ला सांभाळणे फार महत्वाचे असते. या वयादरम्यान मानसिक आणि भावनिक आरोग्य अधिक प्रभावित होते. ================================...

Gondeshwar Temple : जाणून घ्या शैवपंचायतन समूहातील प्रसिद्ध गोंदेश्वर मंदिराबद्दल

Image
  सध्या मुलांच्या सुट्टीचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनत असतील. मुलांना जरी सुट्टी लागली असली तरी पालकांना मात्र ऑफिसमधून सुट्टी नाही. त्यामुळे लांब कुठे तरी न जाता विकेंडला दोन दिवसांसाठी जाता येईल असे जवळचे मात्र अतिशय चांगले पाहण्याजोगे ठिकाण कोणते यावर अनेक लोकं रिसर्च करत असतील. माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर आदी तीच तीच ठिकाणं पाहून जर तुम्हाला कंटाळा आला असेल. तर आज आम्ही तुम्हाला वीकेंडला फिरण्यासाठी अतिशय सुंदर आणि आकर्षक एक ठिकाण सांगणार आहोत. जे पाहून नक्कीच तुमची सुट्टी आणि तुमचा वेळ सत्कारणी लागेल. (Gondeshwar Temple) Top Marathi Headlines मंदिरांचे शहर म्हणून सर्वात आधी नाव येते ते नाशिकचे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात अनेक जुनी आणि नवीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आज आम्ही जे ठिकाण सांगणार आहोत ते नाशिक शहरामधले नाही तर जिल्ह्यातले आहे. हो, नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Marathi Top News) तसे पाहिले तर महाराष्ट्रात हजारो वर्ष ...

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

Image
  आजकाल मोबाईल आणि त्यातही स्मार्ट फोनशिवाय कोणाचेही पान हलत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याचा मूलभूत गरजा होत्या. मात्र आता यात मोबाईल ही चौथी गरज नकळतपणे ऍड झाली आहे. लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वच मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. मोबाईलचे जेवढे दुष्परिणाम आहेत, तेवढीच आजच्या काळात त्याची गरज. त्यामुळे प्रत्येक जणं या मोबाईलची गरज ओळखून आपला मोबाईल जपत असतो.(Mobile) Marathi News मात्र कधी कधी अशी परिस्थिती येते की, चुकून आपला फोन पाण्यात पडतो किंवा पाण्यात भिजतो. आता फोन भिजल्यावर सगळेच पॅनिक नक्कीच होतात. एकतर फोन चालू होईल की नाही ही भीती, टेन्शन असते आणि दुसरे म्हणजे आपला महत्वाचा डाटा त्यात असतो. शिवाय फोनशिवाय कसे राहायचे हा देखील एक मोठा प्रश्न असतोच की. त्यामुळे सगळेच आपल्या फोनची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतात. पण चुकून फोन भिजला तर काय करावे? अनेक लोकं फोन ओपन करून तांदुळामध्ये ठेवतात? मग असे करणे योग्य आहे का? यासोबतच अजून काय उपाय करता येतील, जेणेकरून फोन खराब होणार नाही? चला जाणून घेऊया. (Social News) स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास काय करावे? स्मा...

Sweating : जास्त घाम येण्यामुळे चिडचिड होते मग करा ‘हे’ सोपे उपाय

Image
  उन्हाळा म्हटले की, आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावू लागतात. अति ऊन आपल्या शरीरासाठी अजिबातच चांगले नाही. आपणही जर कडक उन्हात गेलो तर आपल्याला अनेक त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यातील त्रास विविध उपाय करून आपल्याला कमी करता येतात. मात्र याच उन्हाळ्यात सगळ्यांना सर्वात जास्त भेडसावणारी आणि डोकेदुखी ठरणारी समस्या म्हणजे ‘घाम’.(Sweating) Marathi News उन्हाळ्यात घाम येणे खूपच सामान्य बाब आहे. सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात घाम येत असतो. मात्र हा घाम खूप त्रासदायक देखील असतो. अति घाम येण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते, लवकर थकवा जाणवतो, चिडचिड होते. घाम न येण्यासाठी आपण २४ तास एसीमध्ये नाही बसू शकत. मग घाम कमी यावा किंवा येऊच नये यासाठी काही उपाय असतात का? जरी घाम आला तरी त्याचा आपल्याला त्रास होता कामा नये. त्याआधी जाणून घेऊया घाम का येतो? आणि घाम येण्याची कारणं. (Summer News) घाम का येतो? आपल्या त्वचेवर असणाऱ्या घामाच्या ग्रंथी घाम तयार करतात. घामाच्या ग्रंथी ह्या संपूर्ण शरीरावर असतात. मात्र त्यातही प्रामुख्याने त्या कपाळावर, काखेत, हातापायांचे तळव्यांवर जास्त असतात....

Dr. Ambedkar : भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

Image
  आज सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी इंदोरमध्ये झाला. या दिवसाला भीम जयंती असेही म्हणतात. ‘भारतीय संविधानाचे जनक’ डॉ. भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार नव्हे तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. डॉक्टर आंबेडकर हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते. ते एक कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक देखील होते. (Dr. Ambedkar) Todays Marathi News डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांविरुद्धचा भेदभाव दूर करण्यासाठी आणि महिला व कामगारांच्या हक्कांच्या लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, म्हणूनच त्यांच्या जयंतीला ‘समानता दिन’ म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी ‘शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हा महत्वाचा संदेश लोकांना दिला ज्यामुळे आजही अनेकांना प्रेरणा देखील मिळते. (Dr. Ambedkar Jayanti) आंबेडकरांनी जात, वंश, धर्म आणि संस्कृतीचा विचार न करता लोकांना समान अधिकार दिले. त्यांनी दलितांच्या शिक्षण आणि मूलभूत कल्याणासाठीही काम केले. पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक उपलब्ध...