Operation Tiger: अगा जे कधी घडलेची नाही??
सध्या देशाच्या तसेच राज्याच्या पातळीवर ‘पक्षांतर’ हा विषय एकदम ‘हॉट’ झाला आहे. सगळी माध्यमे यावरच काथ्याकुट करत आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणि उद्धव सेनेत होऊ घातलेली ‘गद्दारी’ या दोन प्रमुख घटनांचा उहापोह करताना सर्वच विश्लेषकांनी असा ‘आव’ आणला आहे की हे सर्व काही नवीन आहे आणि पूर्वी असे कधीच घडत नव्हते. हे सर्व जण भाजपने ही नवीनच संस्कृती रुजवली असा आरोप करत आहेत. या सर्वाना ‘कान खोलके सुन लो ‘ म्हणताना अगदी रामायण काळापासून ते आधुनिक काळापर्यंत घडलेल्या काही प्रमुख घटनांची आठवण करून देणे क्रमप्राप्त ठरते. रामायणातील वाली सुग्रीव संघर्ष सर्वाना माहित आहे. प्रभू रामचंद्रानी वालीचा वध केला. मरण्याआधी वालीने आपला पुत्र अंगद याला रामाच्या हवाली केले. वास्तविक त्यावेळी वालीचा रावणाशी मैत्री करार होता. तर्कदृष्ट्या वालीने अंगदला रावणाच्या स्वाधीन करायला हवे होते. पण तसे झाले नाही. पुढे रामाने अंगदला हा वानर सेनेचा सेनापती बनवले. रावणाचा ‘सद्वर्तनी’ भाऊ विभीषण हा रामाच्या पक्षाला जाऊन मिळाला. विभीषणामुळे रामाला रावणाचा पराभव करणे सुकर झाले. रावणाचा वध केल्यावर रा...