Posts

Shravan : तुम्हाला माहिती आहे का महादेवांचे विविध अवतार?

Image
  सध्या संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घर आपले आराध्य शिवाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. श्रावण महिना म्हणजे शिव पूजेसाठी अतिशय चांगला आणि महत्वाचा समजला जातो. सृष्टीचे संहारक असलेले भगवान शिव चतुर्मासात भगवान विष्णूंच्या निद्राधीन झाल्यानंतर याच सृष्टीचे पालकत्व घेतात आणि तिचा सांभाळ करतात. भगवान शिवाची महती खूपच मोठी आणि अतुलनीय आहे. आजवर आपण कायम भगवान विष्णूंच्या विविध अवतारांबद्दल ऐकत असतो, वाचत असतो, पाहात असतो. मात्र महादेवांनी देखील विविध अवतार घेत आपले कर्तव्य पार पाडले आहे. (Marathi News) महादेवाने देखील काळानुसार अनेक अवतार घेतले. त्यांच्या काही अवतारांना कालभैरव तर काही अवतारांना बीजपत्र असे म्हणतात. आपल्या धार्मिक पुराणांनुसार भगवान शंकराचे एकूण १९ अवतार झाले आहेत. भगवान शिव हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या देवतांपैकी एक आहेत. शिवपुराणानुसार भगवान शंकराचे एकूण १९ अवतार आहेत, तर कूर्म पुराणात त्यांचे २८ अवतार सांगितले आहेत. शिवपुराणात भगवान शिवाच्या विविध अवतारांच्या कथा सांगितल्या आहेत. आज आपण शिवाच्या काही अवतारांबद्दल जाणून ...

Shravan : सूर्यदेवाच्या रथाला असलेल्या 7 घोड्यांचे रहस्य

Image
आज श्रावणातील रविवार. तसे पाहिले तर आपल्या सर्व सामान्य लोकांसाठी रविवार हा आरामासाठी राखीव असतो. या दिवशी शाळा, ऑफिसेसला सुट्टी असल्याने हा दिवस अतिशय संथ असतो. पण हा दिवस धार्मिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचा मानला जातो. याचे कारण म्हणजे यादिवशी सूर्य उपासनेला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्मात सूर्यदेवांना प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जाते, जे आरोग्य, तेज आणि सकारात्मक ऊर्जा देतात. त्यांची पूजा केल्याने आरोग्य लाभतो, असे मानले जाते, आणि सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. धार्मिक मान्यतेनुसार आणि पौराणिक कथांनुसार सूर्यदेव कायम त्यांच्या रथावर स्वार होऊन प्रवास करत असतात. सूर्य देवांचा रथ हा घोड्यांचा असून त्यांच्या रथाला सात घोड्यांची साथ असते. मात्र आपण कधी याचा विचार केला आहे का की सूर्यदेवाच्या रथाला ७ घोडेच का असतात? (lord Surya) पुराणांमधील माहितीनुसार सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात घोडे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आहेत. याचा अर्थ असा की सूर्यदेव सतत गतीमध्ये राहून काळाचे चक्र नियंत्रित करतो. सात घोड्यांच्या रंगात सूक्ष्म फरक आहे,अरुण देव त्यांचा लगाम सांभाळतात. ...

Titus The Gorilla: आफ्रिकेच्या जंगलातील ‘Gangs of Wasseypur’

Image
  एका 4 वर्षांच्या पोरासमोर त्याच्या बापाची हत्या केली जाते, त्याच्या लहान बहिणीचा गळा आवळला जातो आणि त्याचे संपूर्ण घर उद्ध्वस्त केले जाते… पण मग हा 4 वर्षांचा मुलगा असा बदला घेतो की अख्खं Africa चं जंगल थरथर कापतं! ही गोष्ट आहे जंगलातल्या खऱ्या Gangs of Wasseypur ची! (Titus The Gorilla) गोष्ट सुरू होते 1978 च्या आसपास. Africa च्या घनदाट जंगलात Uncle Bert नावाच्या एका नर गोरिल्लाचा प्रचंड दबदबा होता. त्याची ताकद अशी होती की समोर आलेला शत्रू त्याचं नाव ऐकूनच गार व्हायचा. याच Uncle Bert चा मुलगा होता 4 वर्षांचा Titus ! बाप शक्तिशाली असल्यामुळे Titus ला कसलीच भीती नव्हती. पण एक दिवशी जंगलात काही शिकारी घुसले आणि त्यांनी Uncle Bert च्या कुटुंबावर अचानक हल्ला केला! (Titus The Gorilla) आपल्या 4 वर्षांच्या Titus ला आणि संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यासाठी Uncle Bert पळून न जाता एकटा ढालीसारखा त्या शिकार्यांसमोर उभा राहिला. मात्र त्या शिकार्यांनी Uncle Bert च्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि Titus च्या बापाचा शिरच्छेद केला! 4 वर्षांचा Titus एका झाडामागे लपून हे सर्व बघत होता; त्याच्या डोळ्यांसम...

Babasaheb Ambedkar: म्हणून बाबासाहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत!

Image
  मराठी माणूस आजपर्यंत पंतप्रधान झाला नाही… भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत अनेकदा हे म्हटलं गेलय. तशी मराठी माणसाकडे पंतप्रधान होण्याची संधी अनेकदा आली होती. Yashwantrao Chavan, Madhu Dandavate, Sharad Pawar या नेत्यांकडे ही संधी होती. काही लोकं असंही म्हणतात की जर आज Pramod Mahajan जिवंत असते, तर Narendra Modi पंतप्रधान नसते, तर महाजनच असते. (Babasaheb Ambedkar) पण हा झाला इतिहासाचा भाग… याच इतिहासात असंही एक नाव होतं जे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलं असतं, ते म्हणजे महामानव Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar! अफाट बुद्धिमत्ता, कायद्याचं विलक्षण ज्ञान, अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास, प्रचंड संघर्ष करण्याची तयारी पण तरीही स्वतंत्र भारताचे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत याची खंत आजही अनेकांना वाटते. यामागच कारण त्यांच्याकडे क्षमता नव्हती असं नाही, तर त्या काळाच्या राजकीय लढाईत त्यांच्या विचारांना मोठा विरोध होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारं देशव्यापी राजकीय संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नव्हतं. बाबासाहेबांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाकडे पाहिलं, तर...

Ekadashi: संतानप्राप्तीसाठी विशेष असणारी श्रावणातली पुत्रदा एकादशी कधी आहे?

Image
एका वर्षात २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशी ही वेगळी आणि अनेक कारणासाठी महत्वाची असते. एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते. यादिवशी भगवान विष्णूची षोडोपचारे पूजा केली जाते आणि संपूर्ण दिवस उपवास केला जातो. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळतात, आणि एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. येत्या रविवारी श्रावण महिन्यातील पहिलीच एकादशी तिथी येत आहे. श्रावणात येणाऱ्या एकादशीला अतिशय खास महत्व असते. या एकादशीला पुत्रदा एकादशी नावाने ओळखले जाते. पुत्रदा एकादशी श्रावणात आणि पौष महिन्यात अशी वर्षातून दोनदा येते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. या एकादशीला पवित्रोपण आणि पवित्र एकादशी असेही म्हटले जाते. (Putrada Ekadshi) पंचांगानुसार, यंदा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी अर्थात पुत्रदा एकादशी 23 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2.00 वाजता सुरू होईल आणि 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजून 18 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत 23 ऑगस्ट रोजी पाळले जाईल. त्यामुळे भक्तांनी 23 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकाद...

Babasaheb Ambedkar: म्हणून बाबासाहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत!

Image
  मराठी माणूस आजपर्यंत पंतप्रधान झाला नाही… भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत अनेकदा हे म्हटलं गेलय. तशी मराठी माणसाकडे पंतप्रधान होण्याची संधी अनेकदा आली होती. Yashwantrao Chavan, Madhu Dandavate, Sharad Pawar या नेत्यांकडे ही संधी होती. काही लोकं असंही म्हणतात की जर आज Pramod Mahajan जिवंत असते, तर Narendra Modi पंतप्रधान नसते, तर महाजनच असते. (Babasaheb Ambedkar) पण हा झाला इतिहासाचा भाग… याच इतिहासात असंही एक नाव होतं जे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलं असतं, ते म्हणजे महामानव Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar! अफाट बुद्धिमत्ता, कायद्याचं विलक्षण ज्ञान, अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास, प्रचंड संघर्ष करण्याची तयारी पण तरीही स्वतंत्र भारताचे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत याची खंत आजही अनेकांना वाटते. यामागच कारण त्यांच्याकडे क्षमता नव्हती असं नाही, तर त्या काळाच्या राजकीय लढाईत त्यांच्या विचारांना मोठा विरोध होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारं देशव्यापी राजकीय संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नव्हतं. बाबासाहेबांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाकडे पाहिलं, तर...

Health : पावसाळ्यात सतत सर्दी-खोकला होतोय? मग ‘हे’ उपाय करून पाहाच

Image
सर्वत्र पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पाऊस हा सर्वांनाच आनंद देणारा ऋतू आहे. या पावसावरच आपले मनुष्याचे जीवन पूर्णपणे अवलंबून आहे. असे असले तरी या पावसाचे अनेक दुष्परिणाम सर्व सामान्य लोकांच्या आरोग्यवर मोठ्या प्रमाणात होतात. दमट वातावरण निर्माण होत असल्याने या काळात आजारपण बऱ्यापैकी वाढते. या दिवसांमध्ये विविध साथीच्या रोगांचे प्रमाण देखील मोठ्या स्वरूपात वाढलेले दिसते. सर्दी खोकला तर पावसाळ्यात होणे खूपच सामान्य समजले जाते. पावसाळ्यात प्रत्येक घरात एक तरी रुग्ण सर्दी खोकल्याचा आढळून येतो. आता सर्दी खोकल्यासाठी लगेच डॉक्टरकडे जाणे अनेक लोकं टाळतात आणि घरच्याघरी सोपे आणि सहज करता येणारे उपाय आहे का हे बघता. आज आम्ही तुम्हाला सर्दी खोकल्यासाठी घरच्या घरी करण्याजोगे सोपे उपाय सांगणार आहोत. (Health) वाफ घेणे सर्दी-खोकल्यापासून दूर जायचे असेल तर सर्वात जास्त चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ केल्याने नाक उघडते आणि श्वास घेणे शक्य होते. तुम्ही पाणी गरम करून त्यात टी ट्री ऑईल, लवंग तेल, युकेलिप्टस ऑईल, लेमनग्रास ऑईल, निलगिरी मिक्स करून वाफ घेतली तर सर्दी – खोकला लवकर कमी होण्यास फायदा मिळतो...