Posts

Fathers Day : जाणून घ्या फादर्स डे चा इतिहास आणि महत्व

Image
  “कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात, हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात माया बाबांची असते कस्तुरीपरी दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी” या ओळी कुठे तरी वाचनात आल्या होत्या. या ओळींचा मतितार्थ इतका सुंदर आणि मनास भिडणारा आहे की, त्या ओळी थेट मनाच्या भिंतीवर कोरल्याचं गेल्या. आपल्या आयुष्यातील ‘वडील’ रुपी देवाला शब्दात मांडायचा अतिशय उत्तम प्रयत्न आहे हा. कायम आईबद्दल, आईच्या प्रेमाबद्दल, आईच्या त्यागाबद्दल, आईच्या महतीबद्दल बोलले जाते. आईच्या कोणत्याही गोष्टीबद्दल कधीच शंका नसते. मात्र कधी कधी आईच्या पुढे बाप काहीसा मागे पडतो. जरी वडिलांचे प्रेम, कष्ट, माया, त्याग स्पष्ट दिसत नसले तरी त्यांच्या अस्तित्वाशिवाय सर्वच नगण्य असते. प्रत्येक घरातला खरा आधार हे वडीलच असतात. वरवर कितीही कठोर, शिस्तप्रिय दिसणारे वडील प्रत्यक्षात मात्र सर्वात जास्त हळवे आणि प्रेमळ असतात. (Fathers Day) Top Marathi Headlines मात्र जबाबदाऱ्यांमध्ये, कर्तव्यांमध्ये दबलेल्या वडिलांना त्यांची दुसरी बाजू कधी दाखवताच येत नाही. अशा या वडिलांचा आपल्याल...

Plane Crash : विमान, हेलिकॉप्टर अपघातात भारतातील ‘या’ दिग्गज लोकांचा झाला मृत्यू

Image
  गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान गुरुवारी १२ जून रोजी दुपारी १.३० च्या सुमारास कोसळून भीषण अपघात झाला होता. या एअर इंडियाच्या बोइंग 787 या प्रवासी विमानातून क्रू मेंबर्ससह 244 प्रवासी प्रवास करत होते. यातला फक्त एकच प्रवासी वाचला बाकी सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच मेघानी परिसरात मेडिकल स्टुडंटन्सच्या होस्टेलवर कोसळले. या अपघातामध्ये मृत झालेल्या लोकांना ओळखणे देखील कठीण झाले आहे. डीएनए टेस्ट करून मृतांची ओळख पटवली जात आहे. सध्या हे काम खूपच जोरात सुरु आहे.(Plane Crash) Marathi News या मोठ्या दुर्दैवी अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्याआधीच त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात होता. यापूर्वी भारतात अनेक मोठे विमान अपघात झाले, ज्यात अनेक नामचीन व्यक्तींनी , नेत्यांनी आपले प्राण गमावले जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… (Marathi News) संजय गांधी संजय गांधी भारताच्या पहिला म...

Vat Purnima : वडाच्या झाडाचे आरोग्यदायी आणि आध्यात्मिक फायदे

Image
  उद्या सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या आणि कुटुंबाच्या आनंदी जीवनासाठी केल्या जाणाऱ्या व्रतांपैकी महत्वाचे व्रत म्हणजे ‘वटपौर्णिमा’. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सावित्रीने तिचा पती असलेल्या सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत घेतले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. या झाडाला धार्मिक महत्व खूप आहे. वडाच्या झाडामध्ये देवांचा वास असल्याची मान्यता आहे. (Vat Purnima) धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षात ब्रह्मा, श्री हरीविष्णू आणि शिव यांचा वास असतो. वडाच्या झाडांचे आयुष्य जास्त असल्याने त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हटले जाते. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवाने वटवृक्षाखाली बसून तपश्चर्या केले असल्याचे सांगितले जाते. शिवाय मार्कंडेयांना वटवृक्षाच्या पानांवरच भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले असल्याचे सांगितले जाते. देवी सावित्रीचाही वृक्षात वास असतो....

Jawaharlal Nehru : ब्रिटिशांनी पंडित नेहरूंवर लावलेल्या आरोपांबद्दल माहितेय का?

Image
  Jawaharlal Nehru  : आधुनिक भारताचे शिल्पकार आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आपल्या आयुष्यात एकूण नऊ वेळा तुरुंगवास पत्करला. त्यांनी ३२५९ दिवस, म्हणजेच नऊ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला. 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या पंडित नेहरूंचे प्राथमिक शिक्षण खाजगी शिक्षकांकडून झाले. वयाच्या 15 व्या वर्षी ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी हॅरो येथे शिक्षण घेतले आणि पुढे केंब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी थेट ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारला, ज्यासाठी त्यांना वारंवार तुरुंगात जावे लागले. Todays Marathi News स्वातंत्र्यचळवळीकडे ओढ विद्यार्थीदशेतच नेहरू परकीय सत्तेखाली असलेल्या देशांच्या स्वातंत्र्य लढ्यांत रस घेऊ लागले होते. त्यांना आयर्लंडमधील ‘सिन फेन’ चळवळ खूप आवडत होती. भारतात परतल्यावर त्यांनी बंकीपूर परिषदेत प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. 1919 मध्ये ते अलाहाबादच्या होमरूल लीगचे सचिव झाले आणि 1916 मध्ये महात्मा गांधींशी पहिली भेट झाली. 1920 मध्ये त्यांनी उत...

Ashok Saraf : पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना पायलट भाची कडून मिळाले सरप्राइज

Image
  महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना २७ मे रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात संपन्न झालेल्या सोहळ्यात पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांना भारत सरकारचा हा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली. नाटकं, चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमधून अतुलनीय कामगिरी करत त्यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फक्त कॉमेडीच नाही तर खलनायकी, गंभीर, रोमॅंटिक आदी सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. आज या दिग्गज कलावंताचा पद्मश्री देऊन केला गेलेला गौरव म्हणजे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर लावलेली सर्वात मोठी मोहर आहे. (Ashok Saraf) अशोक मामांना पद्मश्री दिल्यानंतर त्यांचे फॅन असलेले सर्वच लोकं विविध मार्गाने आपला आनंद, आपले त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. अशातच एक सुंदर योगायोग देखील घडून आला. अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्यानंतर ते दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले. ते मुंबईला येत असलेल्या फ्लाईटमध्ये त्यांना एक गोड आणि भावनिक सरप्राइज मिळाले. झाले असे की, अशोक मामा यांची भाची अदिती ही पा...

अशोक सराफ म्हणाले, “मला विसरले असते तर मी…

Image
  मराठी मनोरंजनविश्वासाठी २७ मे हा दिवस ऐतिहासिक आणि सोबतच अभिमानाचा देखील ठरला. याच दिवशी मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे बेताज बादशहा असलेल्या अशोक सराफ यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जानेवारी २०२५ रोजी अशोक सराफ यांना पदमश्री मिळाल्याची घोषणा झाली होती त्यानंतर २७ मे रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Ashok Saraf) Top Marathi Headlines २७ मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वत्र फक्त अशोक सराफ यांचीच चर्चा आहे. अभिनय सम्राट अशोक सराफ यांच्या बहारदार अभिनय कारकिर्दीला पद्मश्री पुरस्कारामुळे एक नवी झळाळी आली आहे. कला क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अशोक सराफ यांना हा मोठा पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील अशोक स...