Haritalika Vrat :अखंड सौभाग्यासाठी केल्या जाणाऱ्या हरितालिका व्रताची माहिती
प्रत्येक स्त्री आपला पती कायम आपल्यासोबत राहावा आणि त्याला उदंड निरोगी आयुष्य मिळावे यासाठी देवाला प्रार्थना करत असते. यासोबतच आपले सौभाग्य अखंड टिकून राहावे यासाठी प्रथेनुसार विविध व्रत वैकल्य देखील मनापासून करते. याच व्रतांमधील एक अतिशय फलदायी आणि मोठे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भाद्रपद महिना लागला की सगळ्यांना चाहूल लागते ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. मात्र बाप्पांच्या आधी येणारा पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे हरतालिका. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिका व्रताचे विशेष महत्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका व्रत साजरे केले जाते. काही भागात या व्रताला हरतालिका तीज असेही म्हटले जाते. (Haritalika Vrat) हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित तरुणी मनासारखा आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. यादिवशी महिला आणि तरुणी रात्रभर जागरण करत झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ खेळतात. हरतालिका तृतीया फक्त महाराष्ट्रात नाही तर इतरही अनेक भागात साजरी केली जाते. नेपाळच्या टेकडी प्रदेशात, उत्तर भारताच्या बहुतांश...